Friday, October 19, 2012

पण वास्तव तर वेगळाच आहे न ? म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

 म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...


जिते लोक हमेशा खोटेच बोलतात 
कोणतेही नाते खोटे बोलून ठरवतात 
नन्तर तेच आम्हचावारच आरोप करतात  ..
पण वास्तव तर वेगळाच आहे न ? 
तुम्ही खोटे बोलले नसता तर,  हे झालेच नसते.. आम्ही फसलो नसतो 
दिखावा ? डोंग ? आणि म्हणे आमचे प्रेम आहे तुमच्यावर ...???

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

आज इथे उद्या तिथे...कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.... 

Friday, October 12, 2012

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी


तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले
तूझी माझी भेट एक इतिहास बनला होता

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी
माझ्या हृदयाला आयुष्यभर भिजवणार होते

तू एवढे प्रेम करतेस माझ्यावर
हे तू बोलूनही दाखवायची
पण ...?
नात्यांच्या जाळ्यांतून का तू सोडवू न पहायचीस..
आज तुझी आणि माझी भेट स्वप्नात हि होत नाही

तुझा विचार करतो
पण समोर तू केलेला अंधार बघ जात नाही ..!!
तुझी माझे बोलणेच फक्त जपून ठेवलंय
कुणी ऐकू नये म्हणून तयास हृदयातील स्पंदन बनवून ठेवलंय ..
तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले ..!!

मनामध्ये मन माझे आताच दाटले ...

रंग होळीचे हे कधी रंगलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही...

आसवांचे झरे हे असे वाहत गेले की
अश्रुथेंब कधी हे अटलेच नाही...

वाटेवर या अशा बिकट चालतो मी एकटा
माझ्यासाठी मन तुझे गोठलेच नाही...

मनामध्ये मन माझे आताच दाटले 
पावसासंगे संगे अश्रु कधी टाळलेच नाही...

तिचे माझे रस्ते हे असे दुभंगत गेले की-
हातांना या हात कधी मिळ्लेच नाही...

पाने गळून गेली सारी पानझडीचा वृक्ष झालो 
हर्ष होऊन पाने कधी सळसळलीच नाही...

दु:ख माझे तू तर कधी गिळलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही......

माणूस राहिलो नाही... कारण माणुसकिच विकलो मी......


पैशाच्‍या बाजारात
विकलो गेलो मी
भावशुन्‍य झालो
कारण हृदय विकले मी
विचारशून्‍य झालो
कारण मनही विकले मी
माझी बेईज्‍जती कोण करणार
इज्‍जरती विकली मी
मानहानी कोण करणार ?
मानच कापून दिली मी
माणूस राहिलो नाही...
माणूस राहिलो नाही...
कारण माणुसकिच विकलो मी......

यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !


टुकडों में जी जाती है, जिंदगी कैसे,
ज़ख्मों की की जाती है, गिनती कैसे!

मेरा हर झूठ, बन जाता है सच,
इस सच पे लिखूं, शायरी कैसे!

हर तरफ़ अपनों की लगी है भीड़,
इस शोर को कहूँ, तन्हाई कैसे!

अन्दर कुछ, बाहर कुछ और हूँ मैं,
आईने में देखूं अपनी सच्चाई कैसे!

कहते हैं फकीरी में ताक़त गजब है,
कायस्थ तेरे भीतर चलाऊं सुई कैसे!


कैसे दिल को समजवो कैसे !
जो ये दुंद रहा है , उसे राह  दिखाऊ कैसे ?


मेरे पास वक्त बहुत कम है,
एक तेरी ही आँख नम है। 


इश्क को करने दो इन्तजार,
कामयाबी बस चार कदम है। 


चुभे है इतने नश्तर सीनों में,

मुहब्बत ही आज का धरम है। 

मैं निकला हूँ जीतने दुनिया,
दिल में प्यार, हाथ में कलम है। 


एक तेरी बाहें मुझे है नामंजूर,

ये दिल नादान , इसको दुनियादारी सिखायो कैसे !
यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !




Monday, October 8, 2012

आपण कुणालातरी आवडणं...

खरच ! किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,...
कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच
पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,

देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

--------------------------------------------------

फक्त एकदा सांग तुला,माझी आठवण येते का?

एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?
नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?
मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?

एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस का?

जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?

अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस का?

चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?

कोणी नाही जाणून सुधा मागे वळूनपाहतेस का?

सवांद प्रेमाचा कि मस्करीचा : Everything Fair Love and War

रिया कॉलेजला जात असताना तिला कोणाचीतरी हाकऐकु येते,ती जागीच थांबली.एक मुलगा धापा टाकत तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव शिरीष,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तुला love at first sight वर विश्वास आहे?...काय? (रिय ा खुपच दचकलेल्या आवाजात ओ
रडते). ओरडु नको, मला lovd at first sight ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी.
रियाःमग मी काय करु? तोःfrndhp
रियाःआणि नाही केली तर.,
शिरीषःतु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांना मुकशील।
रियाःअसं!ठीक आहे मी करीन तुझ्याशी मैत्री,बघुया तु काय करतोयस ते!पण मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाहीतर?
शिरीषःफक्त सातच दिवसात तुला माझ्यावर प्रेम होईल।
रियाःइतका over confidance,पडशी लतोँडावर
शिरीषःबघ पैज लावुन सांगतोय,फक्तदिव सातला एक तासभर माझ्याबरोबर spend करायचा.तुला आठवडाभरातच माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल.
रियाः interestin g मान्य एकदम मान्य. ठीकेय ur time will start fromtomarrow..b y
पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक गुलाब घेऊन आला होता.ते तिला आवडलं.तिला ताज होटेल दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास कसा निघुन गेला कळतंच नाही.अशा तर्हेने तो रोज मुंबईतल्या वेगवेगळ्या ठीकाणी तिला फिरवायला नेऊ लागला, बघितलेलेच स्पॉट / ठीकाणे त्याच्यासोबत बघण्यातलं वेगळेपणतिला स्पष्ट जाणवु लागलं. त्याच्यातला बोलकेपणा,त्याची सहजवृत्ती,त्याच ्या स्वभावातला गोडवा तिला आवडु लागला.त्याच्यास ोबत असलं की ती सगळं विसरुन जायची.ती फक्त आणि फक्त आनंदी दिसायची.वेगवेगळ ी ठीकाणे पाहण्यात सहा दिवसकसे गेले तिला कळलंच नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेम झालं होतं.तिलात्याची सवयच लागली होती.तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार नाही हिची तिला हुरहुर लागुन राहीली होती.तो फक्त माझा व्हावा असं तिला वाटु लागतं.त्याच्याव िषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण त्या पैजेचा विचार करुन ती स्वतःला आवर घालायची.आज सातवा दिवस तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन गेला.आणि त्याने तिला डोळे झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात आपल्या हातात घेऊन त्या घड्याळातबघतो.बर ोबर 6.15 वाजल्यावर तिला डोळे उघडायलासांगतो.त िने डोळे उघडताच,मावळतिकड े झुकलेल्या सुर्याची एका आकारात पडलेली किरणे आणि त्याचे पाण्यात पडलेलेप्रतिबिँब पाहुन तिचं मन प्रफुल्लित झालं.तो देखावा तिने तिच्या डोळ्यात भरुन घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार मानते.शिरीष दुःखीमनाने म्हणतो,आज सातवा म्हणजे शेवटचा दिवस,मला माफ कर,मला खरंच तु आवडतेस.मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं होतं.म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ मागुन घेतला.आणिया सात दिवसात पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण मी याबद्दल confident नव्हतोकी तुलामाझ्या प्रेमात पाडु शकेन की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i m sorry असं म्हणुन तो निघुन जातो.तीत्याच्या कडे बघतच राहीली.
रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने ठरवलेलं असतं की,आजचा दिवस संपल्यावरच म्हणजे बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u म्हणायचं.हातातल ्या घड्याळाकडे ती उशीरपासुन बघत असते..बरोब र12.0 5 झाल्यावर ती त्याला फोन लावते.शिरीष आत्ता तु पैज हारलास.कारण सात दिवस आत्ता पुर्ण झालेत.खरंचमी या दिवसांत तुझ्या प्रेमात पडले पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धा तुझीहार मान्य कर.
शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरी love u म्हण
रियाःआता ठीक आहे,आत्ता बोलायला काहीच हरकत नाही.I LOVE U SHIRISH, IREALLY LOVE YOU SO MUCH..
शिरीषःreally u love mi?
रियाःyah
शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु तुझ्या bedroom मधुन hallमध्ये जा.
रियाःok गेले....पुढे काय?
शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत बघ?
रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.
शिरीषःआपण जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे मी तुला डोळे झाकायला सांगुन तुझा हात हाती घेतला होता ना,तेव्हाच मी तुझं घड्याळ पंधरा मिनिटे पुढे केलं होतं.कारण अशी परिस्थीती येणार हे मला माहीती होतं.आता बोल झालं ना बरोबर,सात दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?
रियाःsmart...vr y smart उद्या भेट तुला सांगते.
शिरीषःsorry bt everything fair in love & war......

I LOVE U: दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की











अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत.
अंकीताला वाचनाची आवड आहे
तर शुभमला मोबाईल चॅटची..
वाचचाना तिचं थोडं

लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुनबसलाय.
अंकीता त्याला सहजच म्हणते,i love u.हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.
आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन
देतेस..
अंकीता याची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाचीजाणीव झाली पाहीजे.
आणि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशीबोलु लागतोस.
जे मला हवं असतं.
आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु
आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपणवेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक
किती वेळा वाचशील?
अंकिता हे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमःछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीता i know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..
तोच इथेसुरु होतोय.चला तर मग तोच
अनुभवुया.
काही दिवसांनंतर रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज
कॉलेजवर आलीच नाही..
गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.
शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँतकु ठेही पहीला मला सांगुन जाणारीअंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.
या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज
सोडला नाही.
थोडा विचार केल्यावर त्याला एक
गोष्ट आठवते.
तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन
गेलीय.
त्याला ती वाचत असलेल्या रोमियोज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.
तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने
म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यातआपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हातेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने
फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.
त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते
पाहायचंय.
जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित
मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन
आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतंत्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.
आज तातडीने यायला सांगितलंय.
मला माझं नशीब
आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबातआहे....तु झी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्ट ेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं.शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाटवेगाने रेल्वेस्टेशनकडे
निघाला.
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला.चौकशीअंती कळालं
की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय.
तो खुपच निराश
झाला.त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं.
तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एकाबँचवर बसुन राहीला.
तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले.तर ती अंकीताची एक मैत्रीण होती.ती म्हणाली अंकितातुझ्यासाठ ी काहीतरी देउन गेलीय.
तो म्हणाला,काय?
ते तु अंकीतालाच विचार..
ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे
हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतलाहोता.शुभमल ा सोडुन न जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,अंकीता नाही...
मित्रांनो आज वरघडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो
मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.
आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो.
frnds
मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही.मला फक्त एवढंच सांगायचंय.
"दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की "

Friday, October 5, 2012

ती वेळच होती वेडी...ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी

ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते


कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते

संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते


ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह


भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह


डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले


अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही


त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही


ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली


ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ..

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...

Wednesday, October 3, 2012

LOVE STORY:- तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...


आदि आणि शैलजा हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आदि हा शैलजावर खुप प्रेम करतो, हे शैलजाला माहीती आहे पण, शैलजाला आदिच्या मैत्रीमध्येसुद् धा काही interest नाहीये. पण एक दिवस आदिच्या या मैत्रीचा शेवट करण्यासाठी ती त्याला म्हणते, i m sorry aadi, मी तुझ्याशी मैत्री ठेवु शकणार नाही, cause u r so boaring person. मला तुझ्यासोबत खुपच बोअर होतं...

असं म्हणु नको शैलजा मला तुझी मैत्री हवीय,त

ी मी कशीतोडु. कसं सिद्ध करु की मी इतकाही बोअर नाहीये. ठीकेय एक संधी देते तुला, तु मला पुढची दहा मिनिटे तुझ्यासोबत कशाही प्रकारे रमवु शकलास तर मी मैत्री नाही तोडणार. तिची ही अट तो स्वीकारतो, आणि म्हणतो, ठीकेय मी तुला एक lovestory सांगतोः
विशाल नावाचा एक मुलगा होता. आजपर्यँत त्याने किती प्रेमप्रकरणे केलीत, त्याचेकिती breakups झाले हे त्याचं त्यालाच ठावुक नव्हतं. एक दिवस, तो सध्या ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा, तिला विशालच्या या स्वभावाची जेव्हा माहीती झाली. तेव्हा ती फारचदुःखी झाली. आणि तिने विशालशी breakup केला. प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने breakup केला होता. याआधी तर विशालच मुलींबरोबर breakup करायचा. तो न राहवुन आतुन खुपच हादरला गेला होता. कितीतरी मुलीँचे हार्ट आपण तोडलेत पण एखाद्या मुलीने आपलं हार्ट तोडल्यावर जे feel झालं ती feeling त्याच्यासाठी खुपच नवी होती. विशालला जाणीव झाली कि आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे केलं तेफारच चुकीचं होतं. पण आता माझं खरंप्रेम आहे आशा. आशाला मी हातची जाउदेणार नाही.
तो पुन्हा आशाच्या मागेमागे जाऊ लागतो, तिला सॉरी म्हणत असतो. पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो, त्यामुळे ती त्यालाभाव देत नाही. पण एक दिवस विशाल आशाला आडवुन विचारतो, आशा काय चाललंय तुझं? मी कितीदिवस झालं तुझ्याकडुन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागतोय, पणतु देत नाहीस. अगं तुच माझं खरं प्रेमआहेस, तुच माझं नशिब आहेस...बाकी कोणी नाही.
आशाः मीच तुझं नशीब आहे ना, ठीकेय देते तुला एक संधी, आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे, एक गार्डन, दोनकॉफीब ार आणि तीन समुद्रकिनारा यापैकी एका ठीकाणी मी आज संध्याकाळी सहा वाजता तुझी वाट पहात असेन. जर तुझ्या नशीबात मी असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तु मला भेटशील. by
असं म्हणुन आशा तिथुन निघुन जाते.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात.तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो.आण डोळे झाकुन एक ठीकाण निवडतो. जे त्याच्या मनाला भावणारं असतं.तो वेळेत घरातुन बाहेर पडतो।सहा वाजता आशा"समुद्रकिनार ी"त ्याची वाट पहात असते.भरधाव वेगानेतो गाडी मारत असतो.पण पुढे एका ठीकाणी ट्रॅफीक जाम झालेलं असतं.तो तिथेच गाडी लावुन धावत धावत जाऊ लागतो.शेवटी ठरवल्याप्रमाणे तो समुद्रकिनारीपोह ोचतो.पण ती तिथे नसते.कारण तो पोहोचेपर्यँत सात वाजलेले असतात.आणि ती निघुन गेलेली असते.पण विशालला वाटतं कि,कदाचित ती माझ्या नशिबातनाहीये.ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठीकाणावर माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिची वाट पाहतोय.थोड्यावेळानंतर तो दुःखी मनाने नशीबालादोष देत निघुन जातो. चार वर्षानंतर......
आज विशालचं लग्न आहे.त्यालाचांगली नोकरी ,चांगला पगार आहे.तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानेसिद्ध केलंय,कारण आईवडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशीच तो लग्न करतोय, आणि ते ही त्या मुलीला एकदाही न पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंचदुर्मिळ बाब आहे. काही वेळानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात.नवरा बायकोँसमोरचा आंतरपाट काढला जातो.तर काय आश्चर्य! ते दोघे दुसरेतिसरे कोणी नसुन, आशा आणि विशालच असतात. एकमेकांना चार वर्षांनी, आणि तेही अशा रुपात बघुन त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात.....पण स्वतःला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात.आणि पुन्हा एकदा नशीबाने घडवलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खुप खुप आभार मानतात...
.
आदिने सांगितलेल्या या lovestory मुळे शैलजा पुरती मोहुन जाते.तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात.थोडावेळ ती स्वतःला या कथेमध्ये पुर्णतः विसरुन गेलेली असते.ती डोळेपुसत म्हणते,खरंच आदि एका वेगळ्या जगात तु मला नेलं होतंस,मी खरंच खुप भावुक झाले.मला त्यां विशाल आणि आशाला भेटायचंय,कुठे मिळतील ते?कधी नेशील मला....आदिःते तुला माझ्या घरी मिळतील.कारण मी त्यांचाएकुलता एक मुलगा आहे,ते माझेच आई वडील आहेत.
हे ऐकुन शैलजाला काय बोलावेकाही कळतंच नव्हतं.मन अगदी सुन्न झालं होतं,ती म्हणते,खरंच तु खुप lucky आहेस.या गोष्टीनंतर तर तुझ्याबद्दल माझं मत पुर्णपणे बदललंय.तुझे ते आईवडील मला त्यांची सुन म्हणुन स्वीकारतील?काय तु मला तुझी solemate म्हणुन accept करशील? पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी,
तो होकारार्थी मान हालवित तिला आपल्या मिठीत घेतो.आणि थोडा वेळ तसंच ते एकमेकांची साथ अनुभवत राहतात....


मित्रांनो असं म्हटलं जातं की, ज्योड्या स्वर्गात बनतात. आपण त्या फक्त जुळवण्याचं काम करत असतो. जर तुमच्या आयुष्याचा दोर एखाद्याशी बांधला गेला असेल.तर तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो...