Monday, May 11, 2009

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारा काळ मला पूर्णपणे खुलवायचायं...,
जीवणातला प्रत्येक रस मला अनुभवायचयं....,
मनाला हवा-हवासा हट्ट मला पुरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

कल्पनेतल्या वळनाला अस्तीत्वात आणायचयं....,
'अशक्य ' या शब्दाला 'शक्यने ' बदलायचयं....,
आयुष्यातील लोखंडाहून पारसच फिरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारया काळात नवीन उमेदीने जगायचयं....,
अश्रुनी नाही तर आनंदाश्रुनी भिजायचयं....,
हरवलेल्या 'मी' ला परत आणायचयं....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

खूप सोप असत इथे हातात हात घालून रानोमाल भटकायला,
तर कधी नीजून तीच्या मांडीवर पुनवेचा चंद्र बघायला,

शब्दही सापडतात अलगद इथे तीची स्तुती करायला,
संधीही नाही मीळत तीला मग खोटे खोटे ही रुसयला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाही लागत परवानगी कुणाची सीनेमा बघायला,
खूप मजा येते यार इथे बाइक वर फीरायला,

ती चाही असतो होकार नेहमी माझ्या मीठीत यायला,
कशाचीच उपमा नाही दोस्तांनो तीच्या कुशीत नीजायला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाते

नाती तुटतात...
नाती जुडतात...
भावनांचे हे कसले धागे..
आपल्या बंधनानी नाती बांधतात...

नाते निनावी असते..
नात्याला नाव असते..
जी नाती अटूट असतात.
त्या नात्यांना नाव का नसते..

नकळतच अनोळखी व्यक्ती..
आपलेसे होऊन जातात..
या नात्याला काय नाव द्याल
मग बांधलेली नाती का तूटतात...

का नसतो नात्यांचा काळ...
का नसते नात्यांचे वय...
असतं ते फक्त अटूट नाते..
जे आपल्या नकळतच कधी-कधी...
आपल्याकडूनच निभावले जाते...

असेच असते का हे अटूट नाते ...?

निर्धार

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हवं

मन

आता मन क्षणात पार करतं
समुद्राच्या पुळणीवर तुझी वाट पहात असतं
बघ तुला जाणवतात का माझे श्वास माझी साद
बघ कुठे खोलवर उठते का कळ मनात
बघ तुझ्या वाटेवरती आहे का उन हसणारे
बघ कुठे पानाआडुन डोकावते फ़ुल सोनसळे
तिथेच असेन मी देखील,तुझ्या जवळ आस-पास
तुला मात्र वाटत राहिल काहितरि होतात भास
आता या सार्‍यातुन, मीच मला भेटत राहीन
तुझ्यापसुन दुर राहुन रोजच तुला भेटत राहीन

आपण

आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !
चार दिवस जगण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनात आनंद आहे !
वादाळापासुन वाचण्यापेक्षा
वादळात मोडून पडण्यात समर्पण आहे !
कटावरून डोकवण्यापेक्षा
पुरात झोकुन देण्यात जीवन आहे !
कुणी आपल्या साठी झुरण्यापेक्षा
आपण कुणासाठी तरी झुरण्यात प्रीत आहे !
आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !

एकांत माझा............

एकांत माझा............
एकांत माझा............
कोणी नसत सोबत तेव्हा
माझा एकांत साथ देतो मला.............

जिथ सावली सुद्धा साथ सोडून निघून जाते
त्या अंधारात माझा एकांत साथ देतो मला...........

जुन्या आठवांना आठवून
हसताना तर कधी कधी रडताना
माझा एकांत साथ देतो मला........

राग आला न मला
की मनसोक्त भांडायला अन राग शांत करायला
माझा एकांत साथ देतो मला...........

साठवलेले गोड क्षण
गोंजारून पुन्हा साठवायला
माझा एकांत साथ देतो मला..........

कधीही पाठ न फिरवता
शेवटपर्यंत......... एकांत माझा............

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

मन हे असच असतं,

मन हे असच असतं,
सैरावैरा धावणारं,
फ़ुलपखरासारखे या फ़ुलावरुन त्या फ़ुलावर उडणारं.
शरिरातील सर्व अवयवांना स्वतःत गुंतवून ठेवणारं.
नेहमी सर्व विचारांना एकमेकात गुरफ़टणारं.
मन हे असच असतं,
काबूत न राहणारं,
जमिनीपासुन् आकशापर्यंत स्वछंद फ़िरणारं.
कुणावर् हे बसले की डोळ्यांचा सूड घेणारं.
अंत नाहि, सीमा नाही अश्या गोष्टिता दडणारं.
सुःख कोठे भेटते का?, नेहमी हेच शोधणारं.
मन हे असच असतं,
याची शेंडि त्याला लाव, त्याची शेंडि याला, शांत राहणे जमत नाही.
विचार करुन् करुन् कधिहि थकत नाही.
याला आहे एकच उपाय....
मना सोबत भांडू नको.
मना माघे धावू नको.
मनाचा प्रवास संपणार नाही,
त्रास करुण् घेवु नको.
सर्वांनी या मनाशी असहकार करु या,
मन हे असचं असतं,
आपण यावर मात करुया...

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी...........

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी...........
या सुंदर जीवनात कधी कधी...पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी...
पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत......
विचारात गुंतल्यासारख कधी कधी...
अन पाहताना त्याच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी...
रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी...
नंतर "जागला होतास का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी...
मागायचा असतो देवाकडे...
हात त्याचा चोरुन कधी कधी...
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी...
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय त्याचा निघाल्यावर कधी कधी...
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी...
विरहात त्याच्या...
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी...
पाहुन हात त्याच्या दुसर्žया हाती...
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी...
पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी...

आनंद दिला की आनंद परत मिळतो

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच

पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही

आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.

आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

मी तेंव्हा

मी तेंव्हा वसंत साहून गेलो
खुल्या आसमंती राहून गेलो ...

तो पूर होता कसा आसवांचा?
मी लोचनांतून वाहून गेलो !!

ही वेदना तू दिलेली असावी
व्रुथा ना तिला मी चाहून गेलो.

पाहण्या जोगे उरले ना काही
मनाचे दिवाळे पाहून गेलो !!

नकोसा जगाला होऊ लागता ...
मी या चितेवर स्वतःहून गेलो !!!

काय मागू?

काय मागू?

करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !

प्रतिप्रसव.

प्रतिप्रसव.
----------------

पुन्हा पुम्हा मी हरवीत जावे,
पुन्हा पुन्हा तू जवळी यावे;
सात सुरांच्या संगीत राजा
सांग असे का सदा घडावे ?

तुझ्या विना जीव रमे न कोठे,
तरी विजनी का भरकट व्हावी ?
श्वासांमध्ये गंध तुझा, तरी
जाणीव असता नेणीव व्हावी ?

कळते, वळते, ना आकळते,
हसते, रूसते, मी ओघळते;
सात सुरांच्या संगीत राजा,
साद ऐकता धावत येते !

झुलव मला तू, भुलव मला तू,
स्वप्‍न-जागृती हसव मला तू;
जन्‍मजन्‍मीच्या नात्यामध्ये
असाच निशीदिन फ़ुलव मला तू ....

आणि अचानक एका जन्‍मी
दिव्य तेजसी बुडव मला तू;
नको कुशंका, तिमिर-ओढणी,
अद्वैतातच लपव मला तू !!

काही भावना अशाच असतात

काही भावना अशाच असतात
सांगता येत नाहीत शब्दात
काही गोष्टी अशाच असतात
राहतात नेहमी मनात
काही स्मित अशीच असतात
दिसतात प्रत्येक चेहरयात
ठेवतात दडवून अनेक अश्रू
पापण्यांच्या कोनात
काही डोळे असेच असतात
नेहमी काहीतरी शोधतात
कुणी येणार नाही ठाऊक असूनही
ते वाट बघतात
काही ओळी अशाच असतात
हृदयच्या कप्प्यात
लिहाव म्हणल तरी उतरत नाहीत
कवितेच्या साच्यात.

सुखासह दुःखांतही

सुखासह दुःखांतही साथ देणारी ती मैत्री असते
प्रकाशासह अधांरातही हात देणारी ती मैत्री असते.

आयुष्याच्या खाचखळग्यात जीव गुदमरतो कधी
त्या जीवाला धीराचा श्वास देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड मन भरकटत जात निराळ्या वळणावर
त्या मनाला मोकळी वाट देणारी ती मैत्री असते.

कधी निराशेच्या खोल दरीत जीव झॊकुन देतो कोणी
त्या खोलीतही उतरून हात देणारी ती मैत्री असते.

कधी अगंणात विरहाचे मेघ दाटुन येतात अचानक
त्या एकांतातही बरसुन बरसात देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड वारा सोसाट्याने वाहु लागतो सभोवताली
त्या वा-यातही निरतंर जळणारी साजंवात ती मैत्री असते.

कधी फ़ेकुन देतात उधाण लाटा कोरड्या किना-यावरती
रणरणत्या उन्हांतही छायेचा भास देणारी ती मैत्री असते.

कधी काळोखी रात्र उलटून जाते चादण्यांच्या प्रतीक्षेत
मग त्या काळ्या रात्री चादं रात होणारी ती मैत्री असते.

कधी स्वतःला बुडवुन येतो कोणी भरलेल्या पेल्यात म्हणे
त्या धडपडत्या पावलांना हात देणारी ती मैत्री असते.

कधी पापण्या ओलावतात हळव्या मनाच्या कोप-यात
त्या ओघळत्या आसवांना आस देणारी ती मैत्री असते

एखाद्या दिवशी

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

मी मराठी..................

मी मराठी..................
मराठ्याची व्याख्या काय?
मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय?
ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन ;आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी.
लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें..
शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची...
धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ,व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन...
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली
सुर्या कधीच विझनार नाही
प्रयत्न करा किती ही पण
हे कधीच घडणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही

आसाच आहे मी

आसाच आहे मी कारण नसताना
ही तुझ्याशी भांडनारा
आणि तरी ही तुझ्यावाचून
पावलो पावली आड़नारा


जख्मा तू किती ही दे
जख्मांच काही वाटत नाही
पण फुंकर मारायला तू आलीस
हे काही पटत नाही


खुप बडबड़त असते ती
का हे काही कळत नाही
एकच गोष्ट सांगायची आहे तिला
पण मला काही जमत नाही


कोनासाठी रडतोस .का विरह करतोस
कोणासाठी थांबनारे कोणी ही नसते
जगाचा नियम आहे ,आटळ सत्य आहे
प्रत्येकाच संचित त्याने आधीच लिहिलेले असते


उघडेल नशिबाचे दार
तु माझी होण्याने
बदलेल बघ सार जग माझे
तु माझ्या घरी येण्याने


तुझे ते हास्य
सार काही विसरायला लावते
आणि तुला हे सांगायच
तर मन घाबरायला लागते


तुझे नाव हृदया मध्ये
स्वताच घर करून बसलय
सुखी संसराच आपल्या
पहाटेच स्वप्न मला दिसलय


कधी कधी नकळत आस काही घडते
ठरवतो एक आणि नसती आफत गळ्यात पड़ते
टाळत आसतो आपण जीला ठरवून ठरवून
तीच समोर येते आणि गाड़ी आपली आड़ते


ह्रुदयात साठवून ठेव माला
आता विरुद्ध दिशेला जायचय
गोल आसेल ना जर जग
लक्ष्यात ठेव परत भेटायचय

कोसळणारा पाऊस

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

कोणी मागितला हात मदतीचा
तर मी देउ शकलो की नाही...
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

मागितली असेल कोणी साथ
तर देऊ शकलो की नाही....
कोणास ठाउक.....
विश्वासाला खरा उतरु शकलो की नाही

संकटांचा झाला भडिमार
तरी खंबीर राहू शकलो की नाही
कोणास ठाउक.....
आलेल्या वादळांना तोंड देऊ शकलो की नाही

ढासळले खूप अश्रू कोणी
तर पुसू शकलो की नाही.....
कोणास ठाउक.....
माझ्याच अश्रूंना वारा देऊ शकलो की नाही

म्हणती सारे तू माझा मित्र खरा
तर मैत्रीला पात्र ठरु शकलो की नाही
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

सुखी मला समजु नका

हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
हास्यामागिल खरा चेहरा
तुम्ही मात्र पहु नका
दिसला जरी तो चुकून
तरी तसे मला भासवु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
काही भोग हे आसे ही आसतात
जे स्वताच स्वताचे भोगायाचे असतात
आतामध्येच आश्रू ढालुन
डोळ्या मधून हसवयाचे असतात
काही घाव असे ही असतात
जे हसत हसत झेलायचे असतात
किती ही जख्मी झाले हृदय तरी
आतल्या आत पेलायचे असतात
झालेल्या त्या जख्माना
तुम्ही मात्र उकरू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
होत कधी अस ही खरच
मी हसत असतो
झालेल्या नविन जख्मानी
जुन्याना विसरत असतो
भरत आलेल्या त्या जखमांची
खपली तुम्ही काढू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका

वड

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते

आपल्याला पण एक मैत्रिण असावी

एक मैत्रिण असावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी

नाती

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

दिवस

दिवस ईवालाश्य पाखरा प्रमाने असतात
येतात आणि बुर्कन उडून जातात
परन्तु मागे ठेवतात आठ्वानिची पिसे
कही काली कही सफ़ेद कही माऊ
कही खर्बरित
आपण जमेल तेवढी उचलायची
त्याना घेउन बनवायची एक सुंदर
चटाई जीवनाच्या संध्याकाली निवांत पड़ने साथी ..........

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री

Why do

Why do I write poem
when My mind is saying to do so
Why do I write poem
when My hands are cracking to write
Why do I write poem
when My heart feels the burn of life
Why do I write poem
when My feelings turn into poem
Why do I write poem
when feelings of life paves the wave for new
Why do I write poem
which I don't have answer but I write

बघ माझी आठवण येते का?

ग्लासभर दारु खिडकीत
उभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, ग्लासमधे
झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारा
बियरचा फेस
चेहर्यावर घे
डोळे मिटून घे,
तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर
बाहेर पड, गुत्त्यावर
ये
तो भरलेला असेलच,
टेबलावर हात ठेवुन
बसुन रहा
खुर्ची सरकेल
बुडाखाली, बघ माझी
आठवण येते का?
मग पिऊ लाग, दारुचे
अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा
संपेपर्यत, तो संपणार
नाहिच , शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस,
ग्लास पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत
ये
आता बेवड्यांची वाट
बघ, बघ माझी आठवण येते
का?

दारावर बेल वाजेल,
दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली
बाटली घे, ओपनर तो
स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला
तुझ्या झिंगण्याचं
कारण, तू म्हणं ज्युस
संपलंय
मग चिअर्स कर , तूही घे
तो उठून हिमेश
रेशमिया लावेल, तो तू
बंद कर
gulam ali लाव,
बघ माझी आठवण येते का.....

मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री".

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

I see you. I feel you.

Every night in my dreams
I see you. I feel you.
That is how I know you go on.

Far across the distance
And spaces between us
You have come to show you go on.

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on

Love can touch us one time
And last for a lifetime
And never go till we're one

Love was when I loved you
One true time I hold to
In my life we'll always go on

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on

There is some love that will not
go away

You're here, there's nothing I fear,
And I know that my heart will go on
We'll stay forever this way
You are safe in my heart
And my heart will go on and on

वेडं मन

वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….

कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…

कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…

कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….

कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट

कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा

एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं

असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

Sunday, May 10, 2009

तारुण्य

तारुण्य आणि वळणा-वळणाचा सुन्दर घाट यांच एकमेकांशी एक प्रतीकात्मक नात असाव..
गाडी जेव्हा नुकतीच घाटात प्रवेश करते तेव्हा समोर दिसतो भला मोठा डोंगर..
तो कसा पार होइल याची असणारी थोडीशी भीती...
त्या भीतीला पायाशी घेउन चालू लागणारा आत्मविश्वास...
आणि मग सुरु होतो अपरिचित वाटेवरचा अनोखा प्रवास...
धोक्याचा इशारा देणारे वळण...
खोल दरी आणि उंच पर्वत यात जगण्याचा वेग आणि तोल सांभाळत चालण्याची कसरत...
तारुण्य तरी दुसर काय असते...
बालपण संपल्याची बोच... नव्या दिशांची ओढ़..
मग सुरु होणारा नवाच हवाहवासा प्रवास...
तिथे सुद्धा वेग, वेळ आणि प्रेम यांच गणित साधूनच चालव लागते ना...!!

मैत्री

ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....
मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....
घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......
मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........
इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....

ठरवलं ना एकदा

ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं...

प्रेम आणि मैत्री

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

मैत्री कुणाशी ही होऊ शकते म्हणतात
आणि ती झाल्यावर त्याला देवच मानतात
मैत्रीत दगड ही हिरे बनतात
आणि आयुष्यात एकमेकांच्या प्रकाश आणतात
कोणी काही म्हणो हे बंधन दाट असते

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

प्रेम आणि मैत्री तसे बघावे एकच आहे
त्याच्याशिवाय़ आयुष्यात जागा रिक्तच आहे
आयुष्यात एकदा मैत्री करणे गरजेचे आहे
जगात सर्वांनाच मिळणारे एक अतुट नाते आहे
एकदा तरी त्याचे रुप बघा खुप विराट असते
दु;खाची रात्र जाऊन प्रेमाची पहाट असते

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे

हर चहरे मे कुछ तोह एह्साह है,

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे,

क्या करे हमारी पसंद ही कुछ "ख़ास" है. .

चिरागों से अगर अँधेरा दूर होता,

तोह चाँद की चाहत किसे होती.

कट सकती अगर अकेले जिन्दगी,

तो दोस्ती नाम की चीज़ ही न होती.

कभी किसी से जीकर ऐ जुदाई मत करना,

इस दोस्त से कभी रुसवाई मत करना,

जब दिल उब जाए हमसे तोह बता देना,

न बताकर बेवफाई मत करना.

दोस्ती सची हो तो वक्त रुक जता है

अस्मा लाख ऊँचा हो मगर झुक जता है

दोस्ती मे दुनिया लाख बने रुकावट,

अगर दोस्त सचा हो तो खुदा भी झुक जता है.

दोस्ती वो एहसास है जो मिटती नही.

दोस्ती पर्वत है वोह, जोह झुकता नही,

इसकी कीमत क्या है पूछो हमसे,

यह वो "अनमोल" मोती है जो बिकता नही . . .

सची है दोस्ती आजमा के देखो..

करके यकीं मुझपर मेरे पास आके देखो,

बदलता नही कभी सोना अपना रंग ,

चाहे जितनी बार आग मे जला के देख

मराठी

मराठी विश्व" स्वप्न सत्य होऊ दे .......
युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी,
जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे .......
अनुशासन रक्तातुनी, हिम्मत बलदंडातुनी,
चैतन्या श्वासातुनी, सतत वाहू दे..........
सामाजिक भान आणि, बंधुभाव मनी रुजवुनी,
सत्त्याची कास धरुनी, स्थैर्य येऊ दे..........
"मराठी विश्व" स्वप्न सत्य होऊ दे .............


वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची


जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुम

भारतीयांनो

पुन्हा आज पडला,
रक्तामासाचा सडा.
तेराव्याचे खाऊन वडे,
गळे काढून रडा.

आज दिल्लीत पडले,
उद्या मुंबईत घडेल.
ब्रेकिंग न्युज बघुन,
आमचे मनं रडेल.

वाहणाऱ्या रक्ताला,
पाण्याने साफ करा.
मरणारे तर मरुन गेले,
पाकडयांशी मैत्री करा.

ओसामा साल्या तू...,
गुहांमध्ये कुठे लपतोस?
पत्ता देतोस का तुझा?
सांग साल्या कुठे भेटतोस?

आय.एस.आय.च्या सरदारांनो,
सिमीच्या जिवावर उडा.
असेल तुमच्यात दम तर,
समोर येवून लढा.

रक्ताचा रंग लालच...पण,
हिरवा खुप डोक्यात चाललाय.
इथलेच खाऊन ओकणाऱ्यांनी,
देश सारा विकायला काढलाय.

भारतीयांनो तुम्ही फक्त,
शेजाऱ्यांवर प्रेम करा.
रस्त्यावरुन चालता चालता,
कधी तरी स्फोटात मरा.

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठावणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पावूस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे

उसलणारा बेछुट दरया नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातिल एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे......!

मैत्री

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

गारवा .......

गारवा .......

त्याला पाऊस आवडत नाही,

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.

ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,

असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,

पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी

पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,

पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.

पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.

पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात

हळवं अनामिक नातं

हळवं अनामिक नातं

नाती अनेक प्रकारची असतात
पण एखादं नातं असं असतं
ज्याला नाही बांधता येत शब्दात
नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात
ते असतं स्वैर .............
फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!!
त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत
ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं
अगदी जगावेगळं ............
कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं
तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास
ज्या नात्याला नाही देता येत काही नाव .........
एक असं नातं .........
जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं
जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं
एक असं नातं ........
जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण
जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग
असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं ..............

गोष्ट....!!!!!!

एक गोष्ट....!!!!!!

एक मुलगा होता,
कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती,
जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता
आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....
तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत.
आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की,
त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते.
याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की,
त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........


दूसरी गोष्ट....!!!!!!

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

खरे तर असे आपल्या कोणच्याही जीवनामद्धे घडू नये पण खरे पहिले तर ही सत्या परिस्थिती आहे,
मी असेही म्हणत नाही की प्रेयसी नसावी
प्रेयसी असावी पण जीवन भर सात देणारी,
आपल्या भावना समझहून घेणारी,
प्रेयसी नसावी जी फक्त आपल्या खिशातल्या पैशना भूलणरी,
आणी आप्ण रिकामे झालो की ओळख न दाखॅवणारी.
.
.
.
प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

Saturday, May 9, 2009

मुलगा

एक मुलगा होता,
कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती,
जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता
आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....
तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत.
आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की,
त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते.
याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की,
त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

सोयरे नाही, धायेरे नाही | इष्ट नाही , मित्र नाही |
पाहता कोटे ओलखी नाही | अश्रेयेविन परदेसी ||
तेने कैसे करावे | काय जिवेसी धरावे
वाचावे की मरावे | कोय प्रकारे ||
अंतरी नाही सावधानता | येत्न ताकेना पुरता |
सुख्संतोशाची वार्ता | तेथे कैंची ||
म्ह्नोन आलस सोडावा | येत्न साशेपे जोडावा |
दुश्चित्पनाचा मोदावा | थारा बले ||
प्रातकाली उतट जावे | प्राप्त : स्मरामि करावे ||
नित्यनेमे स्मरवे | पटंतर ||
सावधानता असावी | नितिमार्यादा राखावी ||
जनास माने ऐसी करावी | क्रिया- सिद्धि ||
बहुताचे समाधान राखावे | बहुतास मानेल ते बोलावे |
विरंग पडो नेदावे | कथेमध्ये ||
जो दुसर्यावारी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला |
जो आपणाची कष्टत गेला | तोचि भला ||

|| जय सदगुरु ||

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें।
आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनि मज द्यावें। पसायदान हें।।
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।।
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।
दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।।
जो जें वांछील तो तें लाहो। प्राणिजात।।
वर्षत सकळमंगळीं। ईश्वर निष्ठांची मांदियाळी।।
अनवरत भूमंडळीं। भेटतु या भूतां।।
चलां कल्पतरूंचे अरव। चेतना चिंतामणीचें गांव।।
बोलते जे अर्णव। पीयूषाचे।।
चंदमे जे अलांच्छन। मार्तंड जे तापहीन।।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु।।
किंबहुना सर्वसुखीं। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।।
भजिजो आदिपुरुखीं। अखंडित।।
आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें।।
दृष्टादृष्टविजयें। होआवें जी।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।।
येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया जाला।।
पसायदान

Friday, May 8, 2009

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा

सर्वानी याचा विचार करावा....!!!!!!!


कालचा मुंबईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंबई सर्वांची आहे " आसे विधान केले, अणि पुन्हा एकदा मराठी मानसास उपदेशाचे डोस पाजले. मला एक समजत नाही हा मुद्दा वारंवार का उकरून काढन्यात येत आहे ? नक्की याना काय दाखवून द्याचे आहे ? हल्ली कोणी उठतो व मुंबई कोणाची तिचावर कोणाचा हक्का आहे यावर प्रश्न निर्माण करत आहे. पण बंगाल मधे कोणी विचारत नाही कोलकाता कोणाचे आहे ? पंजाब मधे जावून विचारत नाही चंडीगड़ , अमृतसर कोनाच आहे ? गुजरात मधे जावून कोणी विचारत नाही सूरत कोणाचे आहे ? दक्षिनेतिल राज्यात जावून कोणी विचारत नाही चेन्नई कोणाचे ? बंगलौर कोणाचे ? अणि हैदराबाद कोणाचे ? पण महाराष्ट्रात मात्र विचारले जाते मुंबई कोणाची ? वरील कोणत्याही राज्यात जावून हा प्रश्न विचारण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही , व हिम्मत केलीतर त्याचा अंगावर कपडे राहणार नाहीत एवडी दहशत त्या त्या राज्यांची आहे. पण इथे मात्र कोणीही येवून पिचका-या मारत आहे. हें सर्व का व कशासाठी चाले आहे ?

खरेतर आता वेळ आहे एकजुट होवून या सर्वाना ठणकावून सांगण्याची की मुंबई देशाची काय जगाचीही असेल पण सर्व प्रथम ती आमचा महाराष्ट्राची राजधानी आहे. अणि तिचावर सर्व प्रथम कोणाचा हक्क असेल तर तो येथील मराठी माणसाचा आहे. जितक्या सहजतेने हें सांगत आहेत न की मुंबई सर्वांची आहे तितक्या सहजतेने मुंबई महाराष्ट्राला मिलालेली नाहीये तर तत्कालीन केंद्र सरकारशी लढून मिलावली आहे. मुंबई साठी १०५ मराठयानी आपले रक्त संदले आहे. आज मुम्बैची मलाई खाण्यास सर्वप्रांतीय नेते पुढे येत आहेत पण जेव्हा येथील मराठी मानुस मुंबई महाराष्ट्राला मिलाव्न्यसाठी संघर्ष करत होता आपले रक्त रस्त्यावर संदत होता तेव्हा अन्य प्रांतातील नेते मुग गिलून गप्पा बसले होते. तेव्हा मात्र कोणाला मुम्बैचा, इथल्या भूमिपुत्राचा हिताची पडली नव्हती. मग आता कोणत्या तोंडाने हें आपला हक्क येथे दाखवत आहेत ?

ज्या सोनिया गांधी यानि हा मुद्दा उपस्थित केला त्यांचा पतीचे आजोबा प. नेहरू यानि तर मुंबई महाराष्ट्राला मिलूचनये यासाठी मोठा प्रयत्न केला होता नाना दबावतंत्र त्यानी वापरले होते. आमचाच मराठी पोरांवर यानि गोळ्या चलाविल्या होत्या , यांचाच सरकारचा एक उद्दाम मंत्र्याने निवेदन द्यायला गेलेल्या आमचा पोरंवर गाड़ी चढवून त्यांचे प्राण घेतले होते.
विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमचा माता भगिनी वर यांचाच सरकारचा आदेशाने लाठी चालवून त्याना जायबंदी करण्यात आले होते. अहो एक सर्वात हेलाव्नारी घटना म्हणजे यांच्या आदेशाने होणार्या अंदाधुन्दा गोलिबारात एक १४/१५ वर्षाचे पोर ठार झाले होते , बाल्कनीत उभी असलेली आमची एक माता गोली लागुन ठार झाली होतीचाचा नेहारुना म्हणे लहान मुले आवडत. जापान भेटीत तेथील लहान मुलांचा मागणी वरून नेहारुनी त्याना एक हत्तीचे पिल्लू भेट दिले पण ह्याच चाचा नेहारुनी आमचा मुलांचा मग्निवर त्याना काय भेट दिले तर बंदुकीचा गोळ्या, आयुषभाराचे अपंगत्व, आई बाबांचा / नातेवैकानचा मृतदेह.
.अहो असे सांगन्य सारके बरेच आहे, सोनिया गांधीना हा इतिहास माहित नाही का ? व नसल्यास मग उगाच आपले थोबाड उच्कतू नये.

श्रीलंकेत तमिली वंशाचा लोकांवर होना-या अत्याचाराचा निषेध म्हनून तमिलनाडूत हिन्दुस्तांचा तिरंगा जलाल गेला त्यावर या सर्व दिड शहन्यानी आपले तोंड उघडले नाही, पण मराठी माणसाला उपदेशाचे डोस पाजन्यास मात्र हें सदैव तयार असतात.

मुंबई / महाराष्ट्राचा प्रगतित परप्रन्तियांचा वाटा आहे हें आणखी एक यांचे नेहमीचे तुन तुने असते , अरे हो आम्ही कुठे नाही म्हणतोय पण हें अर्ध सत्य आहे सत्य हें आहे की यांचा प्रगतित महाराष्ट्राचे योगदान आहे कारन महाराष्ट्राचे भले व्हावे व महाराष्ट्र प्रगतिशील व्हावा अश्या कोणत्याही उदात्त हेतूने सोशलवर्क करण्यासाठी ते येथे आले नाहीत.

पैसा कमाविने स्वताचा वैयतिक उत्कर्ष साधने हा त्यांचा प्रथम हेतु आहे. त्याना ही गोष्ट चांगलीच ठावुक आहे त्यांचा विकास त्यांचा कुतुम्बियाना सुरक्षित वातावरण येथेच मिळू शकते त्यासाठीच ते त्यांचे राज्य सोडून येथे येतात, ते जर एवडे कर्तुत्व वन आहेत तर त्यांचा राज्यात राहून त्यांचा राज्याचा विकास व प्रगति का करत नाही ? खरेतर ते स्वताचा विकास करत गेले अणि अप्रत्यक्षत राज्याचा विकास होत गेला. येथे मला मुद्दाम कोणाला विरोध करायचा नाही पण हें जो अमचावर उपकार करत आहेत असा आव अनतात त्यामागील सत्य हें आहे.

सर्व राज्यातील नेते आप आपल्या राज्यातील भाषिकंचे हित जप्न्यास प्राधान्य देतात, अणि ते कुणाला गैर वाटत नाही पण मराठी माणसाने आवाज उठवला की याना मलमलायला लागते.

मुंबई बहुरंगी / बहुढंगी आहे, तिने सर्वाना सामावून घेतले आहे, सर्वाना रोजगार दिला आहे, सर्व प्रांतीय व धर्मीय लोग येथे गुण्य गोविंदाने रहत आहेत याचे प्रमुख कारन आहे येथील मराठी मानुस. त्याने अन्य प्रांतात जाशी इतर भाषिकन विरुधु जो दूजाभावः दाखविला जातो तसा संकुचित पाना न दाखविता नेहमीच सर्व समावेशक वृति स्वीकारली म्हनून. अणि याच चंगुलपानाचा गैर फ़ायदा ही लोक आहेत. मराठी माणसाचा हक्क नाकारत आहेत.

अनी आपले लाचार नेते ही अशावेळी गप्पा बसतात, स्वताचा स्वर्थासथी हें लोग दिल्ली पुढे गुडघे तेकवतात. का नाही त्यान ठंकावत की यापुढे आस खपून घेतले जाणार नाही. येथे गल्लीत मराठी मराठी करणारे तिकडे दिल्लीत गेल्यावर मात्र शेपुट आत घालून बसतात, तेव्हा त्याना राष्ट्रीय विचार सुचू लागतात अनी स्वताचा स्वार्थाचा विषय आला की त्याना मग मराठी पण आठवू लगते मराठी पंतप्रधान व्हावा आशा वल्गना करू लागतात, अरे यांचे स्वताचे मराठी मुलांसाठी योगदान काय आहे ?

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा