Thursday, March 1, 2012

एक तरूण आणि एक तरूणी......अधुरी एक कहाणी...

एक तरूण आणि एक तरूणी.......अधुरी एक कहाणी....

दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा, दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या गृप मधे सगळ्यांच्याच जवळचा जीवभावाचा सखा .

इतकं जरी असलं, तरीही ’ती’ म्हणजे एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची मुलगी, पैसा वगैरे खूप नाही, पण अगदी कमी पण नाही.जे मागितलं ते बाबा आणून देतात, पैशाची कमतरता म्हणजे काय ते माहिती नाही त्याच्या पासून फटकूनच वागते.

त्याची आणि तिची नेहेमीच एकमेकांची टांग खेचणं सुरु असतं. त्याला ती आवडते, तिला पण तो (बहुतेक) आवडतो, पण ती मात्र ही गोष्ट मान्य करत नाही कधीच.कदाचित त्याची लेडी किलर म्हणून प्रसिद्धी असेल की ती नेहेमी दूर रहायचा प्रयत्न करते त्याच्या पासून.ट्रेकिंग गृप मधे बरेचदा बरोबर ट्रेक केलेला. तेंव्हा तिच्या लक्षात आलं की तो तिच्यावर फिदा आहे, पण तिने मात्र त्याला स्वतःच्या मनात काय आहे याचा ताकास तूर लागु दिलेला नाही.

दोघेही नेहेमीच एकत्र भेटत असतात, कोणी समोर नसलं ,की त्या दोघांची नोंक झोंक सुरु असते. .दोघांनाही माहिती आहे का- हो कदाचित असावं, की दे लव्ह इच अदर .. बट डोन्ट वॉंट टू ऍग्री.

प्रसंग -१

ती एकटीच बसलेली आहे कॅफेटेरियात, मित्र मैत्रिणींची वाट पहात. ऑफ पिरियड मधे आज इतर मुलं सुटलेले प्रॅक्टीकल करायला गेले होते, पण तिला काहीच काम नव्हतं. तो समोरून येतो. समोरासमोर आल्यावर एकमेकांना विश करणे आलेच. ती च्या चेहेऱ्यावर हसू आलं- पण क्षणभरच!! त्याने एकदम काळजीयुक्त चेहेरा केला होता आणि एकदम आश्चर्याने तिच्या कडे पाहिले.

आता मात्र ती थोडी गोंधळली. काय झालं असेल? का म्हणून असा पहातोय विचित्र नजरेने? ती स्वतः बद्दल उगाच कॉन्शस झाली. नजरेनेच विचारले?

तो म्हणाला, तुझ्या केसात काही तरी अडकलय.. थांब जरा… आणि त्याने हाताने तिच्या केसावरून हात फिरवला- तिच्या लक्षात आला त्याचा वात्रटपणा. तिला हसू आलं आणि त्याचा कावा लक्षात आला, पण तेवढ्यात त्याने आपला ’कार्यभाग ’ साधला होता.

त्याने पटकन हात समोर केला, आणि म्हणाला, दे शंभर रुपये?

कसले?

तुझे केस स्वच्छ करण्याचे. तुला काय वाटले ही अशी लोकांना स्वच्छ करण्याची सगळी घाणेरडी कामं मी काय फुकट करतो की काय? चांगला इंजिनिअर आहे, सगळ्यांकडून तर पाचशे रुपये घेतो स्वच्छ करण्याचे, तू मैत्रीण म्हणून शंभरच मागितले..

तिचा चेहेरा रागाने लालबुंद झाला,

ती आता रिऍक्ट करणार तेवढ्यातच त्याने तिला म्हंटले, बरं ते जाऊ दे, तु इतकी सुंदर आहेस म्हणुन , आणि एक स्टूडंट आहेस म्हणून, चल तुला सूट देतो, फक्त एक वडा पाव -पेप्सी मागव.. सोडले शंभर रुपये तुझे . इतका इंजिनिअर झाडूवाला मिळतो का इतक्या कमी किमतीत?

ती लाजली, आणि त्याला मारायला धावली, समोरच्या टेबलवरचा ग्लास पडला पाणी सांडलं पण तिकडे लक्ष नव्हतं दोघांचंही. पुस्तकं भिजताहेत. नशीब, तेवढ्यात इतर मित्र मंडळी पण आली, आणि दोघेही हसत सुटले.

प्रसंग २:-
तो बसलाय मित्रांसोबत गप्पा मारत. ती अजून आलेली नाही. विषय आहे, की मुली लॉजिकली विचार करतात की इमोशनली. त्याचं म्हणणं होतं की त्या लॉजिकली विचार करुच शकत नाहीत. त्यांच्या मेंदूमधला इमोशनल कोष कोणी हळूवार पणे स्पर्श केला तर त्यांचं लॉजिक पुर्ण पणे वाहून जातं . अगदी साधारण दिसणाऱ्या मुलाच्या प्रेमात एखादी सुंदर मुलगी पडलेली पाहिली की हा प्रश्न नेहेमीच पडतो – की तिने काय पाहिलं असेल ह्या माणसात? ही कॉमेंट तर बरेचदा ऐकू येते अशा परिस्थितीत-” बंदर के हाथ मे अद्रक”!! :)

त्याचं हे नक्की प्रिन्सिपल होतं की मुली प्रेमात पडतात ते आपोआप, त्यांच्या इच्छे विरुद्ध! सगळं काही आपोआप होत असतं . ठरवून काही प्रेम होत नसतं हे मात्र नक्की. एखाद्या मुलीने लॉजिकली विचार करुन कितीही टाळलं तरीही इमोशनल माईंड चा कॉर्ड जर स्पर्शला गेला असेल तर … नो वन कॅन स्टॉप इट!!

गृप मधल्या मुलींचं म्हणणं होतं की आजकाल सगळ्या सुशिक्षित आहेत, म्हणून अर्थातच लॉजिकली विचार करतात. बराच वेळ अशीच चर्चा सुरु होती आणि लवकरच सगळे निघून गेले पिरियडला.

प्रसंग -३

पुन्हा कॅंटीन. ती एकटीच बसलेली आहे. तो समोरून येतो. परवाची त्याच्यामुळे झालेली एम्ब्रॅसमेंट ती विसरलेली नव्हती. तिने त्याच्याकडे अगदी अनोळखी नजरेने पाहिले.

हाय! कसली क्युट दिसते आहेस गं तू? पण जाम भिती वाटते बरं का मला अशा सुंदर मुलींची.

तिला खूप बरं वाटलं, कोणी सौंदर्याची तारीफ केली की बरं वाटतंच ना.तिच्या चेहेऱ्यावर पुन्हा एक मोठं प्रश्न चिन्ह!! हातातल्या सेल फोनशी चाळा करत बसली होती ती.

बोलायचं नाही हे ठरवलं होतं, पण रहावलं नाही.. शेवटी ती म्हणालीच- कां बर? कसली भिती वाटते?

त्याचं उत्तर अनपेक्षित होतं, सगळ्या सुंदर मुली बिनडॊक असतात, आणि ते त्यांना पक्कं माहिती असतं, म्हणून तो ’मेंदूचा रिकामापणा’ त्या आपल्या सौंदर्याने झा्कून टाकण्याचा प्रयत्न करतात.

आता मात्र ती खूप चिडली होती. स्वतःला समजतो तरी काय हा? इतकी स्वतःबद्दलची घमेंड आहे तर कशाला येतो नेहेमी बोलायला, म्हणे सुंदर मुली बिनडोक असतात. मूर्ख कुठला. याला काही समजतं का? नेहेमी निळ्या जिन्सवर हिरवा शर्ट घालणारा बावळट माणूस !! बस्स इतक्याच शिव्या येत असतात तिला.. स्वतःचाच संताप येतो. धड शिव्या पण देता येत नाहीत आपल्याला ?? काय आयुष्य आहे आपलं?

’ती म्हणाली गेट लॉस्ट .. मला अजिबात बोलायचे नाही तुझ्याशी’.

’तू नेहेमीच अशी रुड बोलत असते का लोकांशी? लहानपणापासून तुला कोणी शिकवलेलं नाही वाटतं की लोकांशी कसं बोलावं ते”

’एक्सक्युज मी… काय म्हणालास??’

’सॉरी ..तू यु आर नॉट ऑफ माय टाइप’.

’गेट लॉस्ट.. आय डॊन्ट लाइक यु, ओव्हरस्मार्ट रॅट.’.

’मला माहिती आहे मुली नेहेमीच जर त्यांच्या मनात नाही असेल तर हो आणि हो असेल तर नाही म्हणतात.’ हे असं नेहेमीच होतं मला माहिती आहे,तुला माझ्यामधे इंट्रेस्ट आहे म्हणून.

तिचा संताप शिगेला पोहोचला होता. काय करावे सुचत नव्हते. रागाने लाल झाली होती ती. स्वतःचेच केस उपटून घ्यायचे बाकी ठेवले होते.

तू माझ्या मागे का लागला आहेस. मला माहीत आहे की तू काय ट्राय करतो आहेस ते- माझ्यावर चालणार नाही.

ओह..खरंच?? इज दॅट सो?? यु आर सो अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी, दॅट यु आर ट्राइंग टु फिगर आउट माय माइंड.. ग्रेट!!

मला माहिती आहे, तुला मी आवडते, म्हणुन तू असे नेहेमीच मला छळत असतोस.

“कसला गोड गैरसमज आहे तुझा!”

तिच्या मनात त्याच्या बद्दल इतका राग आला होता पण काहीच करता येत नव्हतं. कसा आहे हा ? इतका आढ्यताखोर माणुस पाहिला नाही कधी., इतके मित्र आहेत, पण असं बोलणारा एकही नाही. सगळे कसे गोंडा घोळत असतात समोर समोर. हाच एक वेगळा आहे जरा. लॉजिकली आवडायला नको हा आपल्याला, पण इतकी भांडणं, हॉट डिस्कशन्स होऊन पण याच्यासोबत का बरं वाटत असेल आपल्याला? ती विचार करत बसली.

तिच्या चेहेऱ्यावरचे रागीट भाव अचानक स्मित हास्यात बदलले, तो म्हणाला , तुझ्या बद्दल मला एक मस्त गोष्ट समजली आहे.
तिने ठरवले असते की ह्याच्या ट्रॅप मधे अडकायचे नाही. तरी पण तिला विचारल्या शिवाय रहावत नाही.. ती म्हणाली काय?
तो म्हणाला- ही योग्य वेळ नाही, नंतर सांगीन कधीतरी ..

तेवढ्यात समोरून दोन मित्र येऊन टेबलवर जॉइन झाले, आणि अर्थातच ह्यांच्या गप्पा बंद पडल्या.

प्रसंग ४

ती तिच्या मैत्रिणी बरोबर बसलेली आहे. कॅन्टीन मधे समोर कोल्डड्रिंक ची बाटली आहे. दोघी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. मैत्रिणीला त्याच्या बद्दल सांगते ती. कसा सारखा त्रास देत असतो ते.

मग त्याच्याशी बोलणं का बंद करत नाहीस. अव्हॉइड कर ना त्याला.

अगं पण त्याची कंपनी बरी वाटते ग.. नाही कसं म्हणू त्याला?

ओह.. म्हणजे तू प्रेमात पडली आहेस तर..

मी?? छेः, अशक्य!! प्रेमात पडणं तर अशक्यच! अगदी जगातला शेवटला पुरुष जरी असला, तरी पण ह्याच्याशी लग्न? इम्पॉसिबल!!

मैत्रीण म्हणाली, अगं बहुतेक असंच असावं. विचार कर. पण मी त्याला कसं विचारू? प्रत्येकच गोष्ट अगदी कॅज्युअली घेतो तो.

साधी गोष्ट – जस्ट क्रिएट जेलसी.. ऍंड ही विल कम आउट ऑफ द क्लोझेट

***
प्रसंग – ५
कॅंटीन , सगळे मित्र मैत्रिणी बसलेले आहेत. समोर एक पेढ्यांचा डबा उघडा ठेवलाय. तेवढ्यात तो येतो, आणि समोर पेढे बघून एक पेढा उचलतो. कोणाचे पेढे रे?
लग्न ठरलंय.. एक मित्र म्हणाला.

कोणाचं?

’ति’चं..

काय?? कोण आहे तो तिच्याशी लग्न करतोय? पण चेहेरा पडला होता खर्रकन.

तिच्याकडे पाहिले. चेहेऱ्यावरचा खट्याळपणा लक्षात आला. त्याला काहीच कळले नाही. हातातला पेढा हाताच राहिला.

तेवढ्यात तिची मैत्रीण उठली, आणि म्हणाली, अरे ’ती’चे नाही, माझ्या ताईचे ठरले आहे लग्नं, खा पेढा.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला एकदम.

त्याला आता मात्र रहावलं नाही. लक्षात आलं की आता वेळ केला तर वेळ निघून जाईल. सगळ्यांसमोर तिला विचारले, बघ, माझं पीजी पुर्ण झालंय. कॅंपस मधे सिलेक्शन पण झालंय एका कंपनीत. पॅकेज पण बरं आहे. तू माझ्याशी लग्न करशिल??

ती काहीच बोलली नाही, फक्त हसली, विथ द अशुरन्स टु सपोर्ट हिम लाइफलॉंग.लग्नानंतर त्याने पुर्वी दिलेल्या त्रासाचा बदला तिने घेतला की —- हे त्या दोघांनाच माहिती

Monday, February 13, 2012

एक खरी गोष्ट :

एक खरी गोष्ट :

एक मुलगा असतो तो एका मुलीवरती प्रेम करत होता! 

एक दिवशी त्या मुलाने त्या मुलीला प्रपोस केले! त्यावर ती मुलगी म्हणाली तुझ्या महिन्याचा पगार माझा एक दिवसाचा खर्च आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही! 

तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत असतो. १० वर्षानंतर ते दोघे एका शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात. मुलगी तिच्या मुलाला म्हणते हे तुझे मामा आहेत. 

मुलीने त्या मुलाला सांगितले माझे हे (नवरा) खूप मोठ्या कंपनी मध्ये काम करतात. माझ्या नवर्याचा पगार १.५ लाख रुपये महिन्याला आहे. 

थोड्याच वेळात तिचा नवरा येतो. आणि तो म्हणतो सर आपण येथे! तो आपल्या बायकोला ओळख करून देतो हे माझे साहेब आहेत. यांचा एका वर्षाचा टर्न ओवर २००० कॅरोड रुपये आहे. 

आणि सर गेल्यावर तो आपल्या बायकोला सांगतो. हे एका मुलीवर खूप प्रेम करतात. त्यसाठी त्यांनी अजून लग्न केले नाही! नंतर त्या मुलीला खूप रडू आले.



शेवटी पैसा, बैंक बैलेंस , पैसा पैसा ..., मुलगा बघ्त्यानाही हेच बघतात ....पैसा पैसा ..... त्याचा शिवाय काहीच लोक बघत नाही ... काही लोक असे नसतील ही ...त्यात काही वाद  नाही...... जे असेनाहित त्यात चांगलेच ....फ़क्त विचार करा काय करोताय अणि काय करयाचे आहे आपल्याला .... 

Wednesday, February 8, 2012

main jahaan rahoon main kahin bhi hoon teri yaad saaath hai


main jahaan rahoon
main kahin bhi hoon
teri yaad saaath hai

kisi se kahoon
ke nahi kahoon 
yeh jo dil ki baat hai
kehne ko saath apane ek duniya chalti hai 
per chhupke is dil mein tanhaayi palti hai
bas yaad saath hai 
teri yaad saaath hai 
main jahaan rahoon
main kahin bhi hoon
teri yaad saaath hai

kahin to dil mein yaadon ki
ek suli gad jaati hai 
kahin har ek tasveer bhahut hi dhondhali pad jati hai
koi nayi duniya ke naye rango mein khush rehta hai 
koi sab kuch paake bhi yeh mann hi mann kehta hai
kehne ko saath apane ek duniya chalti hai 
per chhupke is dil mein tanhaayi palti hai
bas yaad saath hai 
teri yaad saaath hai 

kahin to beete kal ki jadein
dil mein hi utar jaati hai
kahin jo dhage tute to malaayen bhikar jaati 
koi dil mein jagah nayi, baaton ke liye rakhta hai
koi apni palko par yaadon ke diye rakhta hai
kehne ko saath apane ek duniya chalti hai 
per chhupke is dil mein tanhaayi palti hai
bas yaad saath hai 
teri yaad saaath hai 

Tumhari Yadon Se.........


Tumhari Yadon Se Ashq Ankho Me Bhar Rahe Hai

Wafa Ke Moti In Aansoo Me Bikhar Rahe Hai

Bata Ye Kaise Ke Haal Kya Hai Sanam Hamara

Tumhare Gam Me Na Ji Rahe Hai Na Mar Rahe Hai

Chale Bhi Aao Kanha Chupe Ho Sanam Hamare,


Jiye To Kaise Bichade Ke Tumse Jiya Na Jaye

Teri Judai Ka Zahar Hamse Piya Na Jaye

Har Ek Mahefil Har Ek Manjil Hai Suni Suni

Tere Bina Ab Kahi Bhi Hamse Raha Na Jaye

Chale Bhi Aao Kanha Chupe Ho Sanam Hamare

Hamare Dil Ki Har Ek Dhadkan Tumhe Pukare

Tuesday, January 31, 2012

Yeh Jhuki Jhuki Si Teri Nazar

Yeh Jhuki Jhuki Si Teri Nazar 
Kuch To Keh Gayi Hai Kuch Khabhar
Haan.. Kis Ko Hosh Hai, Kisko Khabhar
Kuch To Ho Gaya Humko Magar

Ajnabi Sa Lagtha Hai Hume To Jahaan
Par Kisi Bhi Baath Ka Hai Darr Kahan
Tu Jahan Rahe Rahoon Mein Bhi Wahan

Aasmaan Ke Paar Shaayad Hoga Woh Jahaan; 
Tumko Leke Saath Apna Chaldoon Mein Wahan
Baadlon Ke Sir Pe Hai Dhama Aasmaan;
Phaisla Tum Karo Jaana Hume Hai Kahan

Meeta Meeta Khatta Khatta Sa Ehsaas Hai
Jaathi Jaathi Chubhthi Chubthi Si Koi Pyas Hai

I Know Without You I Cannot Go On Without Your Love…

Milne Ko Nahin Aaye Kuch Aisa Hua Hoga
Phursath Na Mili Hogi Mauka Na Mila Hoga
Lonely Nights And Lonely Days Everywhere I Look I See Your Face
Only You Can Take Away This Pain Aye ..
Now And Forever N Ever N Ever
You’Re The One….. I Know Without You I Cannot Go On Without Your Love…

Kehne Ko Yahaan Kuch Hai, Kehna Ko Wahaan Kuch Hai
Socho To Bahut Kuch Hai, Socho To Kahan Kuch Hai
Guzre Hue Lamhon Ne Kuch Bhi Na Kahan Hoga

Milne Ke Liye Mujhse Ghar Se To Chale Honge
Jazbaath Ki Shinath Mein Roke Na Ruke Honge
Par Chaand To Matham Tha Rastha Na Mila Hoga
Phursath Na Mili Hogi Mauka Na Mila Hoga

तू मुझे सोच कभी यहीं चाहत है मेरी

तू  मुझे  सोच  कभी  यहीं  चाहत  है  मेरी 

में  तुझे  जान  कहूं  यहीं  हसरत  है  मेरी 

में  तेरे  प्यार  का  अरमान  लिए  बैठा  हूँ 

तू  किसी  और  को  चाहे  कभी  यह  खुदा  न  करें 


मेरी  महरूम  मोहब्बत  का  सहारा  तू  है 

में  जो  जीता  हूँ  तो  जीने  का  इशारा  तू  है 


अपने  दिल  पे   तेरा  एहसान  लिए   बैठा  हूँ 


में  तेरे  प्यार  का  अरमान  लिए   बैठा  हूँ 

प्यार  में  शर्त  कोई  हो  तो  बता  दे  मुझको 

गर  खाता  मुझसे  हुयी  हो  तो  बता  दे  मुझको 


जान  हथेली  पे  मेरी  जान  लिए   बैठा  हूँ 


में  तेरे  प्यार  का  अरमान  लिए  बैठा  हूँ  

Friday, January 20, 2012

सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात

सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात
हि कथा आहे शितल  आणि संजयची.....
आज सात वर्षांनी  शितलच्या चेहऱ्यावर आनंदओसंडूनवाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला तेसांगायची हिम्मत केली नव्हती.
 तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू ...असल्यामुळेति ने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पणबंद झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बाराझाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि 
 शितलच्या सर्व अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाहीमैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला कुणाची मदत पण नाही मिळाली. 
आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळालहोत कि आपले सर्व शाळेतले मित्र-मैत्रिणी facebook वरआहेत. म्हणून तिनेहीसर्च केल आणितिला आजसंजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणि तिने संजयला भेटायला बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different"
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजूनकोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्टहोणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पणतुझ झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल'LOVE MARRIGE'जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर
 शितल फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्नतिच्यासमो र उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला....

सात वर्षाचे प्रेम ...हो प्रेम का ते ना बोलला सारखे न उमजणारे असे किती तरी प्रेम करतात 
पण हा भावना कोणालाही नाही कळत फक्त त्या कळणारच कळत फक्त ती ओळख पाहिजे दोघानाही आतून ..
ना उम्जालाणारे प्रेम कधी तरी उमलते पण.. असेच काही प्रसंग घडतात आणि शेवट होतो..येथे तर असे होते..
पण आजकाल तर वेगळेच होत आहे प्रेम होते ..२-३ वर्ष एकत्र राहतात हि आणि एका दिवशी लगेच ब्रेअक up करून मोकळे होतात हि?
 का ? इतका लवकर संपते का? सर्व तेच दोघे अनोळखी होतात हि? ..जसे कधी एकमेकांना भेटले हि नाही का..असे वागतात ..!!! 
नंतर त्यांना कळते हे प्रेम नाही फक्त एक attraction होते ..खूप नावे मिळतात हा नात्याला? 
..त्यातातल्या त्यात काही तरी एक होतात  आणि काही महिनानी - वर्षांनी विभक्त हि होतात, का तर?
 कारणे वेगवेगळी जसे  तु लग्नादी तु असा नाव्तास?तु अशी नवतीस ? माझे स्वप्न ?माझे आयुष?काय मिळाले हे प्रश्न? पडतात ? किती असते हे स्वार्थी  प्रेम ?फक्त त्यात पुरते मग आमच्या गरजा आमच्या इच्छा अन्कांक्षा..खूप काही  येते मग ?? खूप odd झालीत हो सर्व उदाहरणे.....बस ज्याला मिळाला तो असा ..नाही तर तो तसा ..आम्ही बोलून मोकळे  हि होतो ..असो .....
तुम्ही काहीही म्हणाल पण खरे प्रेम मिळणारे नशीबवान असतात आणि ते टिकवणारे त्य्हून नशीबवान असतात ...
ज्याला हे मिळत नाही असे  ते म्हणतात आमच्या नशिबात प्रेम च नाही ....प्रेम नाही ...!!!!

Thursday, January 19, 2012

श्रीमद भगवदगीता - कर्म


श्रीम  भगवगीता - कर्म 

श्रीभगवान म्हणाले -
हे निष्पापा ! या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. 
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगानिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. 
निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासुन उत्पन्न झालेल्या गुणांमुळें पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. 
जो मूर्ख मनुष्य सर्व इन्द्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंन्द्रियांच्या विषयांचे चिन्तन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. 
परन्तु हे अर्जुना ! जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. 
तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. 
यज्ञानिमित्त केल्या जाणार्‍या कर्माशिवाय दुसर्‍या कर्मांत गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मानी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. 
प्रजापति ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उप्तन्न करुन त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. 
तुम्ही या यज्ञाने देवतांची पृष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हांला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. 
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हांला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रितीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो, तो चोरच होय 
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासुन मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर - पोषणासाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. 
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. 
कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. 
हे पार्था ! जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. 
परन्तु जो मनुष्य आत्म्यताच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतृष्ट असतो, त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. 
त्या महापुरुषाला य विश्वात कर्मे करण्य़ाने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही. 
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. 
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मानेच परम सिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य. 
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्या त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करातात तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. 
हे अर्जूना ! मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. 
कारण हे पार्था ! जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्यीच मार्गाचे अनुसरण करतात. 
म्हणुन जर मी कर्म केले नाही, तर ही सर्व माणसे नष्ट - भष्ट होतील आणी मी संकरतेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. 
हे भारता ! कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्या रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. 
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व
कर्मे उत्तम प्रकारे करीत त्याच्याकडूनही तशीच करून घ्यावी. 
वास्तविक सर्व कर्में सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अन्तःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष ' मी कर्ता आहे ' असे मानतो. 
पण हे महाबाहो ! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. 
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणार्‍या मंदबुद्धीच्या अज्ञान्याचा पूर्ण ज्ञान असणार्‍या ज्ञान्याने बुद्धीभेद करू नये. 
अन्तर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तुं युद्ध कर. 
जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अन्तःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. 
परन्तु, जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मुर्खाचा तुं सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज 
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील ? 
प्रत्येक इन्द्रियाचे इन्द्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. 
चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसर्‍याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसर्‍याचा धर्म भय देणारा आहे 
अर्जुन म्हणाला -
हे कृष्णा ! तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो ? 
श्रीभगवान म्हणाले -
रजोगुणापासून उप्तन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण. 
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धूळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते. 
आणि हे अर्जुना ! कधीही तृप्त न होणार हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रु आहे. त्याने माणसांचे ज्ञान झाकले आहे. 
इन्द्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रीयांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. 
म्हणुन हे अर्जुना ! तू प्रथम इन्द्रियांवर ताबा ठेवून व ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणार्‍या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. 
इन्द्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते, या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे. आणी जो बुद्धीहूनही अत्यन्त पर आहे, तो आत्मा होय. 
अशा प्रकारे बुद्धीहून अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यन्त श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करुन महाबाहो ! तू या कामरूप अजिंक्य शत्रुला मारून टाक. 

Friday, December 30, 2011

वर्षाचा शेवटचा दिवस.



वर्षाचा शेवटचा दिवस.
वर्षभरापूर्वी आपल्या आयुष्यात आलं २0११. तेव्हा कुणी विचार केला होता की, या वर्षात ‘हे असं’ एवढं सारं होईल.!
नुकत्याच भेटलेल्या दोन अनोळखी माणसांसारखे. नवं वर्ष आणि आपण पाहतच होतो एकमेकांकडे.
‘चांगलं’ वागण्याचा प्रयत्नही करत होतो.
पण कॅलेण्डरचं एक पान उलटायच्या आत, आपण वागू लागलो आपल्यासारखेच आणि नव्या सहस्त्राकातलं पहिलं दशक पचवून आलेलं हे वर्ष आपले रंग दाखवू लागलं. म्हणता म्हणता नाचवू लागलं, आपल्याला त्याच्या तालावर.! 

आपणही कधी रंगलो त्याच्या रंगात आणि कधी मनासारखे घडवले दिवस आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि प्रसंगी हट्टानंही.!
आज मागं वळून पाहताना आठवतो, सरत्या वर्षातला एकेक दिवस. त्यातला एकेक क्षण.
कधी हसलो होतो मित्रांसमोर खळखळून. कधी रडलो एकेकटेच आपले आपण, आतल्या आत.
कधी उठलो चिडून, पेटून, बदलून टाकू सारा समाज, सारी व्यवस्था असं म्हणत उतरलोही चिडून रस्त्यावर.
आणि कधी केली भंकस.
म्हटलं गेला उडत सगळा गंभीर पोक्तपणा आणि दुनियेभरचा विचारबिचार. म्हणू कशालाही ‘व्हाय धीस कोलावेरी.!’ हे असं म्हणता म्हणता, विचारबिचार करता करता.
एकेक दिवस, एकेक महिना करत संपलंही वर्ष.
काय नाही दिलं या वर्षानं.?
काही आनंदाचे, सार्थकाचे क्षण दिले.! जे आपल्याला कधीच मिळणार नाही, असं वाटलं होतं
ते सहज देऊन टाकलं.
सांगा, कधी वाटलं होतं की, जिंकू आपण क्रिकेटचा वर्ल्डकप.
पण जिंकलो की सहज.!
आणि सचिनची सेंचुरी.? अजून पाहतोय आपण वाट.!
ज्यानं ९९ शतकं ठोकली त्याचं एक शतक होऊ नये.? - भरभरून देताना, सगळंच देऊन नाही टाकलं या २0११ने. ठेवलीये काही अतृप्तता.!
नव्यानं नवीन काहीतरी कमावण्याची, मिळवण्याची, झगडण्याची आणि मनासारखं होता होता, मनासारखं नाही झालं काही, तरी उमेदीनं कसं जगायचं हे सांगणारी. 

आपल्या वर्ल्डकप जिंकण्यापासून, रस्त्यावर उतरण्यापर्यंतची. कोलावेरी डी पासून चिकनी चमेलीपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीमागे पागल होण्याची. स्टीव जॉब्ज नावाचा न पाहिलेला माणूस कायमचा निरोप घेऊन गेला म्हणून हळहळण्याची, अण्णांच्या आंदोलनाला सर्मथन देता देता मुठी आवळण्याची आणि त्या आंदोलनातही आपलं ‘फॅशन स्टेटमेण्ट’ करण्याची.!
आपणच आपल्याला पुन्हा भेटण्याची. आणि जे कमावलंय ते उराशी बाळगून जे मिळालंच नाही त्यासाठी २0१२ एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची.!
फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच
या वर्षाच्या पानांवर लिहिलेली एक डायरी.
तिच्या जुन होत चाललेल्या कागदांवर काही हसरे-दुखरे क्षण भेटले तर भेटा त्यांना.
निरोप कसला घ्यायचा त्यांचा.
ते असतीलच सोबत.आपल्याबरोबर.! 

नवीन वर्ष , हो आता सुरुवात होणार? पण कधी हा विचार केला आहे का? जे मागच्या वर्षी गमावले ते परत या वर्षी नाही गमवायचे ? जे करायचे होते ते नाही झाले पण या वर्षी कारयाचेच? किव्हा परत तेच विसरून जायचे ? विचार करा ? कुटे आहोत आपण ?

फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच लिहिलेली एक डायरी.२०११.

नवीन वर्ष , हो आता सुरुवात होणार? पण कधी हा विचार केला आहे का? जे मागच्या वर्षी गमावले ते परत या वर्षी नाही गमवायचे ? जे करायचे होते ते नाही झाले पण या वर्षी कारयाचेच? किव्हा परत तेच विसरून जायचे ? विचार करा ? कुटे आहोत आपण ?
वर्षाचा शेवटचा दिवस.
वर्षभरापूर्वी आपल्या आयुष्यात आलं २0११. तेव्हा कुणी विचार केला होता की, या वर्षात ‘हे असं’ एवढं सारं होईल.!
नुकत्याच भेटलेल्या दोन अनोळखी माणसांसारखे. नवं वर्ष आणि आपण पाहतच होतो एकमेकांकडे.
‘चांगलं’ वागण्याचा प्रयत्नही करत होतो.
पण कॅलेण्डरचं एक पान उलटायच्या आत, आपण वागू लागलो आपल्यासारखेच आणि नव्या सहस्त्राकातलं पहिलं दशक पचवून आलेलं हे वर्ष आपले रंग दाखवू लागलं. म्हणता म्हणता नाचवू लागलं, आपल्याला त्याच्या तालावर.! 
आपणही कधी रंगलो त्याच्या रंगात आणि कधी मनासारखे घडवले दिवस आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि प्रसंगी हट्टानंही.!
आज मागं वळून पाहताना आठवतो, सरत्या वर्षातला एकेक दिवस. त्यातला एकेक क्षण.
कधी हसलो होतो मित्रांसमोर खळखळून. कधी रडलो एकेकटेच आपले आपण, आतल्या आत.
कधी उठलो चिडून, पेटून, बदलून टाकू सारा समाज, सारी व्यवस्था असं म्हणत उतरलोही चिडून रस्त्यावर.
आणि कधी केली भंकस.
म्हटलं गेला उडत सगळा गंभीर पोक्तपणा आणि दुनियेभरचा विचारबिचार. म्हणू कशालाही ‘व्हाय धीस कोलावेरी.!’ हे असं म्हणता म्हणता, विचारबिचार करता करता.
एकेक दिवस, एकेक महिना करत संपलंही वर्ष.
काय नाही दिलं या वर्षानं.?
काही आनंदाचे, सार्थकाचे क्षण दिले.! जे आपल्याला कधीच मिळणार नाही, असं वाटलं होतं
ते सहज देऊन टाकलं.
सांगा, कधी वाटलं होतं की, जिंकू आपण क्रिकेटचा वर्ल्डकप.
पण जिंकलो की सहज.!
आणि सचिनची सेंचुरी.? अजून पाहतोय आपण वाट.!
ज्यानं ९९ शतकं ठोकली त्याचं एक शतक होऊ नये.? - भरभरून देताना, सगळंच देऊन नाही टाकलं या २0११ने. ठेवलीये काही अतृप्तता.!
नव्यानं नवीन काहीतरी कमावण्याची, मिळवण्याची, झगडण्याची आणि मनासारखं होता होता, मनासारखं नाही झालं काही, तरी उमेदीनं कसं जगायचं हे सांगणारी. 

आपल्या वर्ल्डकप जिंकण्यापासून, रस्त्यावर उतरण्यापर्यंतची. कोलावेरी डी पासून चिकनी चमेलीपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीमागे पागल होण्याची. स्टीव जॉब्ज नावाचा न पाहिलेला माणूस कायमचा निरोप घेऊन गेला म्हणून हळहळण्याची, अण्णांच्या आंदोलनाला सर्मथन देता देता मुठी आवळण्याची आणि त्या आंदोलनातही आपलं ‘फॅशन स्टेटमेण्ट’ करण्याची.!
आपणच आपल्याला पुन्हा भेटण्याची. आणि जे कमावलंय ते उराशी बाळगून जे मिळालंच नाही त्यासाठी २0१२ एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची.!
फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच
या वर्षाच्या पानांवर लिहिलेली एक डायरी.
तिच्या जुन होत चाललेल्या कागदांवर काही हसरे-दुखरे क्षण भेटले तर भेटा त्यांना.
निरोप कसला घ्यायचा त्यांचा.
ते असतीलच सोबत.आपल्याबरोबर.!