Saturday, March 6, 2010

भारतीयांनो

पुन्हा आज पडला,
रक्तामासाचा सडा.
तेराव्याचे खाऊन वडे,
गळे काढून रडा.

आज दिल्लीत पडले,
उद्या मुंबईत घडेल.
ब्रेकिंग न्युज बघुन,
आमचे मनं रडेल.

वाहणाऱ्या रक्ताला,
पाण्याने साफ करा.
मरणारे तर मरुन गेले,
पाकडयांशी मैत्री करा.

ओसामा साल्या तू...,
गुहांमध्ये कुठे लपतोस?
पत्ता देतोस का तुझा?
सांग साल्या कुठे भेटतोस?

आय.एस.आय.च्या सरदारांनो,
सिमीच्या जिवावर उडा.
असेल तुमच्यात दम तर,
समोर येवून लढा.

रक्ताचा रंग लालच...पण,
हिरवा खुप डोक्यात चाललाय.
इथलेच खाऊन ओकणाऱ्यांनी,
देश सारा विकायला काढलाय.

भारतीयांनो तुम्ही फक्त,
शेजाऱ्यांवर प्रेम करा.
रस्त्यावरुन चालता चालता,
कधी तरी स्फोटात मरा.

काय मागू?

काय मागू?

करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !

सुखासह दुःखांतही

सुखासह दुःखांतही साथ देणारी ती मैत्री असते
प्रकाशासह अधांरातही हात देणारी ती मैत्री असते.

आयुष्याच्या खाचखळग्यात जीव गुदमरतो कधी
त्या जीवाला धीराचा श्वास देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड मन भरकटत जात निराळ्या वळणावर
त्या मनाला मोकळी वाट देणारी ती मैत्री असते.

कधी निराशेच्या खोल दरीत जीव झॊकुन देतो कोणी
त्या खोलीतही उतरून हात देणारी ती मैत्री असते.

कधी अगंणात विरहाचे मेघ दाटुन येतात अचानक
त्या एकांतातही बरसुन बरसात देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड वारा सोसाट्याने वाहु लागतो सभोवताली
त्या वा-यातही निरतंर जळणारी साजंवात ती मैत्री असते.

कधी फ़ेकुन देतात उधाण लाटा कोरड्या किना-यावरती
रणरणत्या उन्हांतही छायेचा भास देणारी ती मैत्री असते.

कधी काळोखी रात्र उलटून जाते चादण्यांच्या प्रतीक्षेत
मग त्या काळ्या रात्री चादं रात होणारी ती मैत्री असते.

कधी स्वतःला बुडवुन येतो कोणी भरलेल्या पेल्यात म्हणे
त्या धडपडत्या पावलांना हात देणारी ती मैत्री असते.

कधी पापण्या ओलावतात हळव्या मनाच्या कोप-यात
त्या ओघळत्या आसवांना आस देणारी ती मैत्री असते

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

खेळ उन पावसाचे ..

खेळ उन पावसाचे ..
जीवनाच्या श्रावणात ..
फुल उमले मैत्रीचे ..
आज माझ्या अंतरात ...
फुल नाजुक-कोमल ..
मन नाहले गंधात ..
आयुष्याचा कण क्षण ...
भिजे स्नेहाच्या रंगात ....

धागा स्नेहाचा मायेचा ..
मैत्र अनोखे गुम्फतो ...
विश्वासाचा कवडसा ..
सारे आयु उजळतो ...

आयुष्य

आयुष्य नक्की काय असतं?

हसऱ्या फुलावरचं दव असतं..

नाचऱ्या मुलाचा नाच असतं..

दुखऱ्या हृदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहीन जहाज असतं,

किनारा शोधत फ़िरायचं असतं,

वादळांनी डगमगून जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असतं?

ते एक तलम रेशमी वस्त्र असतं..

ज्याचं त्यानेच ते विणायचं असतं

पण अती ताणायचं नसतं..


आयुष्य नक्की काय असतं?

सतत गुंतत जाणारं ते एक कोडं असतं

ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं

गुंतून मात्र त्यात पडायचं न

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

Saturday, January 16, 2010

लहरत गेले झाड धुक्यातून

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे

डोळ्यातील अश्रू पडतात

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

ठरवलं ना एकदा

ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं...

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी