Wednesday, June 18, 2014

दर मिनिटाला एका पित्याची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, नागपूर 


स्वार्थी, अहंकारी, दारूडा, दुर्गुणांचा पुतळा, कुचकामी, असे शिक्के मारून पुरुषाला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकत असलेल्या पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नॅशनल क्राइम ब्यूरो रेकॉर्डच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाली आहे. वर्षभरात ६२ हजार ४३३ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे. सरासरी काढली तर रोज २०० च्या आसपास पुरुष जीवनयात्रा संपवितात. दर आठ मिनिटाला एक पुरुष आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. महिलांमध्ये हेच प्रमाण ३२,५९२ आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण दुपटीने अधिक असूनही या समस्येवर गांभीर्याने विचार होत नाही. 

पुरुषांच्या विरोधातील कायदे 

महिलांना मालमत्तेत ५० टक्के अधिकार घरगुती हिंसाचार कायदा फौजदारी प्रकरण संहिता १२५ हिंदू विवाह कायदा भादंवि ४९८ (अ) हुंडाविरोधी कायदा मुलांचा ताबा सोडण्याचा कायदा हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा 

मेन्स वेलफेअर असोसिएशनच्या पाहणीतून समोर आलेले निष्कर्ष 

८५ टक्के पुरुष हक्कांविषयी अनभिज्ञ 

दर १२ पुरुषांमागे एकजण घटस्फोटित विवाहानंतरच्या समस्यांची फक्त चार टक्के पुरुषांना कल्पना ८७ टक्के पुरुषांना पालकांची चिंता ६७ टक्के पुरुष आपल्या समस्यांची चर्चा कुटुंबाशी करीत नाहीत ९२ पुरुषांचा कुटुंब विभक्त करण्यास विरोध पुरुषांमध्ये कौटुंबिक समस्यांचे प्रमाण ५० टक्के कौटुंबिक कलहामुळे ५२ टक्के पुरुष पत्नीपासून संबंधाला पारखे 

पुरुषांवरील वचपा काढण्यासाठी, त्याला बदनाम करण्यासाठी, स्वतःच्या इगोसाठी, पैसे उकळण्यासाठी कायद्यांचा गैरवापर होतो. महिलांनी तक्रार केली तर चौकशीही न करता पुरुषांना तुरुंगात डांबले जाते. त्यांची बाजूही ऐकून घेतली जात नाही. त्यामुळे इभ्रत जाते; परिणामी २०१२ मध्ये देशात ६५ हजार पुरुषांनी आत्महत्या केल्या. महिलांचा छळ रोखण्यासाठी १९८३ मध्ये घटनादुरुस्तीद्वारे भारतीय दंड विधानात ४९८ (अ) कलम समाविष्ट केले गेले. त्यानंतरच पुरुष आत्महत्येचे प्रमाण वाढले. सरकारने या कलमात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. 

-राजेश वखारिया, ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर असोसिएशन.