Wednesday, April 29, 2009

कळले कुणाला मझ्या मनातले

कळले कुणाला मझ्या मनातले
ना कळले कुणाला प्रेम माझ्या ह्र्दयातले
ना कळले कुणाला दुःख माझ्या माझ्यातले
सुखच सुख दिसते आहे माझ्या जिवनातले
थंडीच्या गारव्यात रखरखत्या उन्हात
मी त्याची वाट पाहिली
त्याला बघताच मी माझी न उरली
ना कळले कुणाला मझ्या मनातले
दिवस-रात्र आठवण काढते त्याची
बोलण्यासाठी तरसते त्याच्याशी
ह्र्दय हे आवरेणा
ना कळले कुणाला मझ्या मनातले
कळी उमलली मोगरा फ़ुलला
प्रेमाचा अंकुरहि सहज फ़ुट्ला
प्रेमीकांचा संगम झाला
ना कळले कुणाला मझ्या मनातले
तुला पाहीले प्रेम समजले
प्रीतीचे फ़ुल हळूच उमलले
तुला मी माझ्या ह्र्दयात बसविले
ना कळले कुणाला मझ्या मनातले
नजरेत तुझ्या मी स्वतःला हरविले
दुःखच दुःख उरले
गेलास तु दुर माझ्यापासूनी
ना कळले कुणाला मझ्या मनातले
जीवनातले सुख सहज सरले
रडणे मन वरुनी हसताना दिसले
फ़ुलही दिसले काटेही बोचले
ना कळले कुणाला मझ्या मनातले!!!

Thursday, April 23, 2009

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा

Sunday, April 12, 2009

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

मी एकटा

मी एकटा
आजकाल मी एकटाच असतो
सगळ्यात असलो तरी कोनातच नसतो
काही तरी आठवून मधेच हसतो
निळ्या आकाशात उडणार्‍या पतन्गाकडे तासन्-तास पाहत बसतो
कधी वाटता की पतन्गासारखे एकटयानेच उडावे
आणि दोर तुटला की अनंतासोबत जुडावे
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखं तेवढा वजा आहे
एकदा सवय झाली की एकटेपणा पण खाणार नाही
दिला जरी काही नाही एकटेपणाने, पण मला सोडून तरी जाणार नाही

अकेला इक ख्वाब हूँ

इस अजनबी सी दुनिया में, अकेला इक ख्वाब हूँ.
सवालों से खफ़ा, चोट सा जवाब हूँ.
जो ना समझ सके, उनके लिये "कौन".
जो समझ चुके, उनके लिये किताब हूँ.
दुनिया कि नज़रों में, जाने क्युं चुभा सा.
सबसे नशीला और बदनाम शराब हूँ.
सर उठा के देखो, वो देख रहा है तुमको.
जिसको न देखा उसने, वो चमकता आफ़ताब हूँ.
आँखों से देखोगे, तो खुश मुझे पाओगे.
दिल से पूछोगे, तो दर्द का सैलाब हूँ

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटता

विरह

विरह

मनावर दगड ठेवून म्हणालो तिला
तुझा माझा संबंध आता सम्पला
म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी
जवळ केले होतेस का मला ?

आताशा एकटेपणा अक्षरशः
खायला उठतो जिवाला
पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला

तिच्या नाही, तरी माझ्या घरचे
विरोध नक्कीच करणार
आणि त्यांच्यापर्यंत आमची
कुणकुण तर गेलीच असणार

आमचा समेट घडवायला
मित्र सारे आतुर झालेत
म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY
मी केव्हाच फेकून दिलेत

You see

You see the pain that lies in him eyes,
But, alas, him eyes are dry,
he won't cry.
No, he won't cry.

You see the anger that burns from him gaze,
The madness that sets him eyes ablaze,

You see the fear that closes him eyes,
The smile he wears is but a disguise,

You see the hope that is finally dead,
he cannot trust for him heart has been bled,

You see the love that lies within,
But he shall never love again,

You see death's hand that has glazed him eyes,
No one saw him die inside,

My hand

There’s nothing that I really want:
The stars tonight are rich and cold
Above my house that vaguely broods
Upon a path soon lost in dark.

My dinner plate is chipped all round
(It tells me that I’ve changed a lot);
My glass is cracked all down one side
(It shows there is a path for me).

My hands—I rest my head on them.
My eyes—I rest my mind on them.
There’s nothing that I really need
Before I set out on that path.

Death, departure, walk away, walk out

Death, departure, walk away, walk out
Should I or should I not pout

Family and friends
Lovers and one-night stands

I have loved, lost and lived
How do I trust, how do I love again

I should move on, it's all in my past
But my pain remains, continues and lasts

This pain lingers in my heart, mind and soul
Damn it - why is this world so cold

How can I have faith in God and family
When people I love are taken from me

Where can I find true and loyal friends
I'm sick of the lies, fights and revenge

Hurt continuously, hurt at a young age
How do I love again with all of my rage

How do I get past all of this, show me a sign
So I can leave my sadness, pain and crying behind

I am alone

I am alone,
so very alone

I hurt,
so very bad

I am ignored,
just thrown aside

I am security,
for others to have

I am lonely,
there is no one close,
no one sees the pain

I cry,
hope is gone

I am alone,
and no one knows

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

खेळ उन पावसाचे ..

खेळ उन पावसाचे ..
जीवनाच्या श्रावणात ..
फुल उमले मैत्रीचे ..
आज माझ्या अंतरात ...||

फुल नाजुक-कोमल ..
मन नाहले गंधात ..
आयुष्याचा कण क्षण ...
भिजे स्नेहाच्या रंगात .... ||


धागा स्नेहाचा मायेचा ..
मैत्र अनोखे गुम्फतो ...
विश्वासाचा कवडसा ..
सारे आयु उजळतो ...||

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

पुसनार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कोनाचेच डोळे भर्नार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ....... बाकी काही नाही
हसता हसता डोळे लगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

खरे तर असे आपल्या कोणच्याही जीवनामद्धे घडू नये पण खरे पहिले तर ही सत्या परिस्थिती आहे,
मी असेही म्हणत नाही की प्रेयसी नसावी
प्रेयसी असावी पण जीवन भर सात देणारी,
आपल्या भावना समझहून घेणारी,
प्रेयसी नसावी जी फक्त आपल्या खिशातल्या पैशना भूलणरी,
आणी आप्ण रिकामे झालो की ओळख न दाखॅवणारी.
.
.
.
प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

मैत्री

कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री.

माझ्यासाठी

माझ्यासाठी तू काय आहेस.....
कधी न पाहिले स्वप्नी,
कधी न होते ध्यानी मनी,
असे प्रेम तुझे मला लाभले,
अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..

माझ्या जिवनात आलीस तू अशी,
की सारं काही बहरून गेलं,
लोंखडाचं कणखर जगणं माझं,
तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..

तुझ्या मिठीचा आधाराने मला,
नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,
म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,
मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..

तुझा तो होकार माझ्यासाठी,
आजही अविस्मरणीय असा आहे,
तुझ्या हातात मी दिलेलं फुल,
अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..

तेव्हा कधी नजर ना लागो,
आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,
म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,
तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..

आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,
तुझ माझ्या जिवनात असण्यावर,
नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,
जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

हो येते तुझी आठवण .....

तुझ्यासाठी..
हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............
मुसळधार पाउस पहाताना ,
हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,

हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,
त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,

हो येते तुझी आठवण,
ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,
ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,
अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,

हो येते तुझी आठवण,
संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....
त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,

हो येते तुझी आठवण,
रात्र होताना वाटत घेशील मला कुशीत
अन हलूच स्पर्ष करशील मला

म्हणुन............................
हो येते तुझी आठवण .....

मन..

मन..

उडाले उडाले
झाले हिरवे पान
सुटले सुर्रकन
झाडाच्या कवेतून

कसली ही भूक
कैसी तहान
झाले वेडेपिसे
विहरले दूरदूर

अडकले काट्यांत
माखले पंकात
कैसा हा सोस
हासे सैरभैर

गायले भुंग्यासवे
बनले मोर
नाचले थुईथुई
इंद्रधनु पाहून

झेपावले अंबरी
गाठले पाताळ
सुगंध वादळी
भिरभिरे वेगात

भिजले निजले
निर्झर कपारीत
काळ थबकला
हासले स्वप्नात

जागले पहाटे
नाहले धुक्यात
सजले लहरले
अनंत प्रवास....

डोळे तुझे.......

डोळे तुझे.......
डोळे तुझे.......
माझ्या खिडकीतल्या आभाळातून
कधी मलाच न्याहाळत असतात
डोळे तुझे..
मला क्षणभरच येत हसायला जरासं
आणि क्षणातच हरवतात पुन्हा
डोळे तुझे..
कधी मेघांआडून, कधी मिचकावून
मला पाहत असतात
डोळे तुझे..
तू असतेस अगदी खऱ्यातलीच
मला अस्तित्व तुझं पटवून देतात
डोळे तुझे..
मी लिहीत असतो कविता तुझ्यावर
आणि उत्सुकतेने बघत असतात
डोळे तुझे..
कधी चुकून मी करीत असतो
चुक एखादी
आणि मला सावरत असतात
डोळे तुझे..
कधी हूरहूर मलाही
स्पर्शाची तुझ्या
आणि मला स्पर्शत असतात
डोळे तुझे..

तुझे डोळे आभाळात, कि आभाळ तुझ्या डोळ्यात..?
नक्की फरक यातला सांगतात मला
डोळे तुझे..
तू असलीस जरी दूर तिथे
तरी माझ्यासोबत असतात नेहमीच डोळे तुझे.......

आयुष्याच्या वळणावरती....

आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....

चालता चालता वाटेत दु:खाचे गाव लागले
थकलेल्या मनाला ती च्या ओढीने ग्रासले

मनच ते असे थांबुन थोडेच रहाणार
भेटुनही तिच्या शी काय बोलावे असे वाटतच रहाणार

म्हणुन मग मी तिला भेटतच नाही,
बोलायचे असुनही शब्दच उरत नाही.....

वाटले न बोलताही, तिनेच ओळखावे सारे
विसरुन माझ्या आनंदाला, दु:ख जाणावे खरे....

वेडया मनाचा, वेडा विचार मनातच राहिला..
तिच्या आठवणीं मध्ये एक-एक दिवस जात राहिला...

आयुष्याच्या वळणावरती मागे वळुन पहाताना,
होतो आनंदी, तिला आनंदात पहाताना...

सोडुन जाताना तिला आनंदाच्या गावी...
आम्ही मात्र विसावलो दु:खाच्या गावी.....

किती छान झालं असतं...

किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....
समजुन ही घेतलं असतं आणि समजावलं ही असतं
किती छान झालं असतं.......

घेतली असती सगळी दु:खे, भरला असता आनंद ...
या जीवनात माझ्या, मी ही काहीतरी केलं असतं..
किती छान झालं असतं.......

सांगायच्या आधिच समजुन घेतल्या असत्या सगळ्या भावना..
माझ्याही भावनांना कधी तरी वाट मिळाली असती..
किती छान झालं असतं.......

नसते कधिही येऊ दिले डोळ्यात तिच्या अश्रु..
सतत तिच्या ओठांवर स्मित पहाता आलं असतं....
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....

नशीब

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते

य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते

एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते

आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते

मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

तुझ्या होकाराने तु आता जिंकावा...

नकळत सारे तुझे शहारे,
का वेड लावती या जिवाला,
तुझे नजारे तुझे इशारे,
आठवणीतून रोज छळती रे मला..

तु दिसतेस दाहीदिशांना,
तेव्हा वाट मी चुकतो,
शोधता आधार आशेचा,
तेव्हा मला किनारा तुझाच दिसतो..

कधी वाटते या मनाला,
हळुवार कुरवळावे तुझ्या स्मीतफुलांना,
पण ओंजळीत येताच का येते
जाग माझ्या रातींच्या त्या स्वप्नांना...

असेच माझे दिस अन रातीचे,
अजब खेळ सुरू झाले,
तुला पाहता.. तुला आठवता
माझे तुझ्यावर प्रेम जडले...

काही सुचत नाही, कळत नाही,
अबोल्याला आता सांगावे तरी कसे,
या प्रेमाचे या प्रितीचे रंगचित्र,
तुझ्या ह्रिदयी उमटावे तरी कसे...

या कळत नकळतच्या खेळाला,
तुझा सहभाग मला मिळावा,
हा डाव जिवनाच्या सरीपाटाचा
तुझ्या होकाराने तु आता जिंकावा...

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

रातोरात रडवणारी
आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

प्रेम करणं सोपं नसतं...

प्रेम करणं सोपं नसतं...

सर्व करतात, म्हणून करायच नसतं ...
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं ...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं ...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...

प्रेमाचा अर्थ...

प्रेमाचा अर्थ...

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
ओठांमधे इतके सामर्थ्य नव्हते,
तुला दूर जातांना पाहूनही ते उघडले नाही,
ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,
एवढ्या सात वर्षातही ते 'चुकले' नाही,
ते फक्त कागदाच्या तुकड्यावरच बोलतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझा स्पर्शही तुला सांगू शकला नाही,
तुला 'त्या'च्याबरोबर पाहूनही हाताने सीमा राखली होती,
ते फक्त कल्पनेतच जागे होतात.

प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझ्या श्वासही खोटेच बोलत होता,
शरीराचा अंत पाहूनही ते वळले नाही,
ते फक्त 'पडद्यावरच' वळतात.

तु फक्त 'लाल-हिरव्या कागदासाठी' माझा हात सोडला,
तोच तुला माझ्या प्रेमपत्रापेक्षा जवळचा वाटला,
तेव्हा मीही तो प्रेमाच्या तराजुत तोलला,
आजतर मलाही ह्र‌दय हलके वाटायला लागले,
पण आता फार उशिर झाला होता, प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळला होता...

तू चालत रहा

तू चालत रहा
कधी सरळ सरळ
कधी वक्र वक्र
पायावर भंवरी चक्र चक्र
कधी सुम सुसाट
कधी बिन बोभाट
कधि लपत छपत
कधी गजबजाट
तू चालत रहा

घाल खडावा घाल रिबॉक
पदयात्रा किंवा मॉर्निंग वॉक
बन मिरवणूक कर करमणूक
चल धक्क्याने वा आपसूक
तू ठरव ध्येय तू दिशा ठरव
तू जवळ लांबचा मार्ग ठरव
चल नीघ अता का उशीर अता
घे किक स्टार्ट सुट भन्नाट तू
तू चालत रहा

जग वाट पहातंय सुर्याची तू नम्रपणे सुरुवात तो कर
जो रोल मिळाला उचल गड्या ये स्टेजवरी तू बनठनकर
शिवधनुष्य प्रत्येकाच्या आयुष्याचे असते अलग अलग
तू उचल तुझे बन अग्नीबाण प्रत्यंचा ओढून धडक धड्क
तू स्वतःच बन मग ब्रह्मबाण घे तुझी आण तोडून प्राण
तू चालत रहा

तू चिल्लर खुर्दा बनू नको चल महायज्ञ आरंभ तू कर
तू विवेकानंद बन किंवा गांधी शिवाजी वा आंबेडकर
जर व्यापारी बन बिल गेटस खेळामध्ये बन तेंडुलकर
जर कवि लेखक बनणार गड्या नोबेलखाली तडजोड न कर
बघ पक्ष्याच्या डोळ्यामध्ये तू लक्ष्य बनव अन नेम धरून
तू चालत रहा..................

डोळे

डोळे

डोळे शहाणे असतात...
अवघडतात शब्द ओठी
अन मनात न सुटणा-या गाठी
पापणी लवून तेव्हा डोळेच प्रतिसाद देतात
डोळे शहाणे असतात...

दूर वर न परतणा-या वाटा
छातीत खोल सलणारा काटा
कुढ्या मनाला करीत मोकळे डोळे बरसतात
डोळे शहाणे असतात...

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काsही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वडं करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं !!

तू माझा मित्र ( मैत्रिण)आहेस?

सांगायचे खुप काही आहे

पण ऐकत कोनी I नाही

म्हणून लिहायला बसलो

तर शब्दच सुचत नाही



काय करू काय नको

काही कळतच नाही

ति माझ्यासाठी सर्वकाही

आणि.... मी त्याच्यासाठी काहीच नाही



फ़ोन करू का, की केव्हा

येइल त्याचा फ़ोन? वाट मी

पाहते आहे

आणि... त्याला मात्र कशाशी

देण घेण नाही कारण म्हणे

ही.. फक्त मैत्री आहे


एकमेकांच्या सुखा दुखामध्ये

सहभागी होणे

हेच माझ्यामते मैत्रीचे सूत्र आहे

आता तूच बघ यासाठी मी किती पात्र आहे

आणि... तू माझा मित्र ( मैत्रिण)आहेस?

जिन्दगी ये किस मोड पे ले आयी है ,

जिन्दगी ये किस मोड पे ले आयी है ,

ना मा, बाप, बहन , ना यहा कोई भाई है .

हर लडकी का है Boy Friend, हर लडके ने Girl Friend पायी है ,

चंद दिनो के है ये रिश्ते , फिर वही रुसवायी है .



घर जाना Home Sickness कहलाता है ,

पर Girl Friend से मिलने को टाईम रोज मिल जाता है .

दो दिन से नही पुछा मां की तबीयत का हाल ,

Girl Friend से पल - पल की खबर पायी है,

जिन्दगी ये किस मोड पे ले आयी है …..



कभी खुली हवा मे घुमते थे ,

अब AC की आदत लगायी है .

धुप हमसे सहन नही होती ,

हर कोई देता यही दुहाई है .



मेहनत के काम हम करते नही ,

इसीलिये Gym जाने की नौबत आयी है .

McDonalds, PizaaHut जाने लगे,

दाल- रोटी तो मुश्कील से खायी है .

जिन्दगी ये किस मोड पे ले आयी है …..



Work Relation हमने बडाये ,

पर दोस्तो की संख्या घटायी है .

Professional ने की है तरक्की ,

Social ने मुंह की खायी है.

जिन्दगी ये किस मोड पे ले आयी है ….

डोळ्यातील अश्रू

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

Saturday, April 11, 2009

बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून..

बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून..
नाहीतर तुला दिसले असते ओले डोळे दुरून..

बरं झालं जमलं नाही नजरेला नजर भिडवून पाहाणं..
कदाचित मलाच जमलं नसतं भानावरती राहाणं..

तुला उगाचंच वाटलं असतं मी दुबळा आहे..
मीही चारचौघांसारखाच गं , कुठे वेगळा आहे ?

तुझंही नव्हतं पूर्वीसारखं खळीदार मधाळ हसणं..
मध उरला नाहीच आता नुसतंच मधमाशांचं डसणं…

तसाही येणार नव्हताच कधी हातात हात तुझा…
जमिनीवरच्या दगडांवर मेहेरबान होतात का आकाशातल्या वीजा ?

पण तरीही बरं झालं एकदा भेटलीस , मनावरचं ओझं हलकं झालं .
आयुष्य माझ्याशी पुन्हा एकदा बोलकं झालं .

माझं मलाच कळून चुकलं आता चालणं एकाकी आहे…
अर्धं आयुष्य वणव्यात गेलं , पण अजुन जळणं बाकी आहे

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी

लहरत गेले झाड धुक्यातून

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे

सरी ग सरी……

……सरी ग सरी……
सरी ग सरी……
सरी ग सरी……
आल्या ग सरी…..
आल्या ग सरी…..
—————————————-————

काळ्या मेघाची तू लेक
आलि वाजत गाजत
ह्या भल्या पावसात
चिंब निघालि भिजुन..

ओलि ओलि तुझी काया
वेगळिच असे माया
फ़ुटे मातीला अंकुर..
स्पर्श तुझाच वेगळा

कोणी दुखात रडते..
कोणी सुखात रडते
तू भिजवून त्यांना..
त्यांच्या आश्रूच झाकते

सुर्य रोजची उगे
किरणे आकाशि पसरे…..
परी..
तुझ्या थेंबांनाच छेदुन
इंद्रधनुष्य ते दिसे

प्रेम दिले तू अपार
तुझे थोर उपकार
माझ्या प्रेमाची ग सखे..!
तू एक ..खरी साक्षिदार…

सरी ग सरी……
सरी ग सरी……

तू एक ..खरी साक्षिदार..

आज सारखं राहून राहून वाटतंय

आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय

मैत्रीचं हे नातं

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

मैत्री करणारे खूप भेटतील

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री!!!

कोसळणारा पाऊस पाहुन

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

तू नसताना

नसताना.......

तू नसताना आठवतात,
असतानाचे क्षण
दोघांनी मिळून केलेले
कित्येक पण....

आठवते ती हुरहुर,
मनातलं ते काहुर
तुझ तो रुसवा,
नि प्रेमाची ती चाहुल.......

आठवतो तो पाऊस,
नि पावसातले आपण...
एकमेकांच्या नजरेतलं
हरवलेलं 'मी'पण.......

आठवतात दोघांचे उमलण्याचे दिवस.
स्वप्नांच्या वाटेनी
फ़ुलण्यचे दिवस............

एकमेकांना सावरत
चालण्याचे दिवस,
वार्यावर शीळ घालात
झुलण्याचे दिवस............

चांदण्याच्या रात्रि
जागायचे दिवस,
एकमेकांना प्रत्येक क्षणी,
मागायचे दिवस.........!

आयुष्य असचं जगायचं असतं.........

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,
तरी कुठेतरी थांबायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं.

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,
स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,
हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

आयुष्य असचं जगायचं असतं.........

मैत्रीचा प्रवास.........

मैत्रीचा प्रवास.........

मनुष्य येतो जन्माला , भेटतो रक्ताच्या नात्यांना
ओळख होतांना जगाची, दिसते वाट मैत्रीची

जीवनाच्या वाटेवर..
मित्रांच्या सायकलीवर , 'डबलसीट', सुरु होतो मैत्रीचा प्रवास..

धावतात चिमुरडी पावलं आनंदाने
लपाछपी खेळतांना सापडतात गडी नवे
रुसवा फुगवा,देवघेव,दुखणे खुपणे
शाळा,छंदवर्ग अनेक मित्र-मैत्रिणी जोडे

महाविद्यालय जेव्हा दिसे कोप-यावरी
बेभान वा-यापरी मैत्री तेव्हा मनाला खुणवी
कँटीन,कट्ट्यांवर जरी होई उनाडकी
दोस्तांसवे अभ्यास भावी जीवनाचा पाया रची

ढिली होते पकड दोस्तीची, हाती पदवी पकडतांना
राहतात जुने दोस्त मागे , पोटापाण्यासाठी पळतांना
जुळतात मैत्रीचे बंध नवे , नोकरीत स्थिरावतांना
भेटते मैत्री अनोखी , ऑफिसात ओर्कुटींग करतांना

सावकाश , निवॄत्तीचा नारळ जेव्हा हातात पडतो
मॉर्निंगवॉक मित्रमंडळ तेव्हा साथ करतो
उगवता सूर्य बालपणीच्या मैत्रीची आठवण देतो
मावळतांना तारुण्यातल्या मैत्रीची हुरहुर

कधीतरी प्रेम कराव

मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
तिची आठवण काढत
रात्र रात्र झुराव ,
कधीतरी तिने मग
माझी वाट पाहावी
मी ही मुद्दामच
उशिरा हजेरी लावावी
रागाने ती मग
माझ्याकडे पाठ करून बसावी
माझी पूर्ण संध्याकाळ
तिची समजूत काढण्यात जावी
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव.....


मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
तिचा हात हातात घेऊन
समुद्राकाठी फिराव
तिने मग माझ नाव
वाळूवर लिहाव
समुद्राच्या लाटानी ते
हळूच पुसून जाव
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव......

मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव
आपल अस कुणीतरी
हक्काच असाव
तिच्या खांद्यावर डोक ठेवून
सार जग विसरून जाव
तिच्या बरोबर बोलून
माझ मन हलक व्हाव
मला ही वाटत
कधीतरी प्रेम कराव .......................

Friday, April 10, 2009

माणसाचे मन

एकदा मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय

मी आहे हा असा आहे,

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

मैं न जानू की कौन हूँ मैं,

मैं न जानू की कौन हूँ मैं,
लोग कहते है सबसे जुदा हूँ मैं,
मैने तो प्यार सबसे किया,
पर न जाने कितनो ने धोखा दिया।

चलते चलते कितने ही अच्छे मिले,
जिनने बहुत प्यार दिया,
पर कुछ लोग समझ ना सके,
फिर भी मैने सबसे प्यार किया।

दोस्तो के खुशी से ही खुशी है,
तेरे गम से हम दुखी है,
तुम हंसो तो खुश हो जाऊंगा,
तेरे आँखो मे आँसु हो तो मनाऊंगा।

मेरे सपने बहुत बढे़ है,
पर अकेले है हम, अकेले है,
फिर भी चलता रहऊंगा,
मजिंल को पाकर रहऊंगा।

ये दुनिया बदल जाये पर कितनी भी,
पर मै न बदलऊंगा,
जो बदल गये वो दोस्त थे मेरे,
पर कोई ना पास है मेरे।

प्यार होता तो क्या बात होती,
कोई तो होगी कहीं न कहीं,
शायद तुम से अच्छी या,
कोई नहीं नही इस दुनिया मे तुम्हारे जैसी।

आसमान को देखा है मैने, मुझे जाना वहाँ है,
जमीन पर चलना नही, मुझे जाना वहाँ है,
पता है गिरकर टुट जाऊंगा, फिर उठने का विश्वास है
मै अलग बनकर दिखालाऊंगा।

पता नही ये रास्ते ले जाये कहाँ,
न जाने खत्म हो जाये, किस पल कहाँ,
फिर भी तुम सब के दिलो मे जिंदा रहऊंगा,
यादो मे सब की, याद आता रहऊंगा।

एक मैत्रीण अशी हवी.

क मैत्रीण अशी हवी.
एक मैत्रीण अशी हवी.

जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवज देणारी.

आपल्यासाठी हसणारी
वेळ आलिच तर अश्रु हि पुसणारी.

स्वताच्या घासातला घास
आठवाणीने काढुन ठेवनारी.

वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजुत हि काढणारी.

सगळ्यांच्या गोळक्यात आपणाला
सैरभैर शोधणारी.

आपल्या आठवणीने आपण
नसताना व्याकुळ होणारी.

खरच अशी एक तरी जिवा भावाची
मैत्रीण असावी आपणाला मित्र म्हणनारी

आता आठवणीत राहिलेत, ते फक्त शुष्क उसासे

आता आठवणीत राहिलेत, ते फक्त शुष्क उसासे
बाकी सारे तुझ्यासोबतच, एकनिष्ठपणे वाहुन गेलेले ..
ओले श्वास..
आता वाळवंट म्हणावं, कुणीही
इतकी जळजळीत प्रीत आपली
झाडं सारी वाळून गेलीयेत
कुठे सावली सापडेन म्हणुन अजुन मी शोधतोय काही
तु तर केव्हांच निघून गेलीस, वळवाच्या सरीसारखी
मागे तेवढी ठेउन गेलीस एक तिरकस नजर..
तेव्हां मनात दाटलेली ईच्छा, मी तिथेच पुसुन टाकली
वाळुत हाथ फिरवावा तशी...
आता रस्ते नाहीतच इथे,
सारी मैफिलच बदलून गेलीये
आता फक्त वाळू, आणि प्राण कंठाशी आणणारा वारा
सगळीकडे रक्त ओकणारी शांतता
मी तरीही जपली आहेत तुझी निघून जातांनाची दोन पावलं
तुझ्याही नकळत...
तितकाच आधार सुटत्या जीवाला..

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी...

संकटकाळी हात देणारी...

आनंदी समयी साद घालणारी...

मनाची कवाडे उघडून डोकावणारी...

काहीं गुपितांचे राखण करणारी...

मन मोकळे करुन सारं सांगणारी...

सांगता सांगता मोहीत करणारी...

कधी कुणाला न लुटणारी...

चांगल्याच कौतुक करणारी...

तितकीच चूका दाखविणारी...

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

दोस्ती

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..

जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की.
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में..

येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज..
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में..

नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी..
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में..

कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी..
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में..

सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग..
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में..

माना इश्क है खुदा, प्यार करने वालों के लिये "अभी"
पर हम तो अपना सिर झुकाते हैं, दोस्ती में..

ओर एक ही दवा है गम की दुनिया में क्युकि..
भूल के सारे गम, दोस्तों के साथ मुस्कुराते हैं, दोस्ती में

गंध आवडला फुलाचा म्हणून... .. फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून... .. फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असत

Zindagi hai to Khwaab Hai

Zindagi hai to Khwaab Hai
_Khwaab Hai To Manzilein Hai
____Manzilein Hai To Fasaley Hai
__________Fasaley Hai To Rastey Hai
_________Rastay Hai To Mushkilein Hai
____________ _Mushkilein Hai To Hausla Hai
____________ _____Hausla Hai To Vishawas Hai
____________ _________ _Vishvas hai to Paisa hai
____________ _________ ___Paisa hai to Shohrat hai
____________ _________ _____Shohrat hai to Izzat Hai
____________ _________ _________ Izzat hai to Ladki hai
____________ _________ _____Ladki hai to Tension hai
____________ _________ _Tension hai to Concern hai
____________ ______Concern hai to a Khayaal hai
____________ _____Khayaal hai to Khwaab hai
____________ __Khawab hai to Growth hai
__________Growth hai to Zindagi hai
______Zindagi hai to khwaab hai
_Matlab duniya Gol Gol hai...
Bas ek acha dost chahiye
aap jaisa.............

जग

जग हे जगण्यासाठी कसे हे शोधत शोधत फिरतांना
एक क्षण मला गवसला आनंदामधे रमण्याचा

मला 'बेस्ट बॉय फ्रेंड' केल्याने 'मॅन'चा झाला 'बॉय'
मन आनंदले वय आटल्याने 'प्रिया' तुला हाय !

ऐकुन आला गोड शहारा 'काका' 'मित्र' झाला आता
चितारले मग चित्र मनी मी कशी असावी तू जगता.......

.... अशीच गोड दिसत रहा गलावरती खळी अंथरत
सतत खळखळत हसत रहा अधर अधर मिश्किल बोलत

केंद्र बिंदू जरूर हो पण आपले काटे विसरू नकोस
कढतांना काटा देखिल कुणाला तू दुखवू नकोस

जगामधे या वावरतांना स्वतः कधी तू हरवु नकोस
तुझ्या आजच्या ह्या मित्राला भविष्यातही विसरु नकोस

मित्रत्वाचे हे नाते तू वयात कधिही मोजु नकोस
या नात्याचे बंधन सखये मनात दटुन ठेवु नकोस

अशीच मैत्री राहो आपली या जन्मी अन पुढेहि ती
हीच प्रार्थना करून प्रभुशी जगू शांतता या जगती

जगाला 'जग' म्हणत जगात 'जगत' 'जगवत रहा'
तुझ्यामधिल त्या सुधा गुणांनी आनंदाला लुटत रहा

Saturday, April 4, 2009

नातं

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं.........

आयुष्य

आयुष्य नक्की काय असतं?

हसऱ्या फुलावरचं दव असतं..

नाचऱ्या मुलाचा नाच असतं..

दुखऱ्या हृदयाचा घाव असतं..


आयुष्य नक्की काय असतं,

समुद्रात चाललेलं दिशाहीन जहाज असतं,

किनारा शोधत फ़िरायचं असतं,

वादळांनी डगमगून जायचं नसतं.


आयुष्य नक्की काय असतं?

ते एक तलम रेशमी वस्त्र असतं..

ज्याचं त्यानेच ते विणायचं असतं

पण अती ताणायचं नसतं..


आयुष्य नक्की काय असतं?

सतत गुंतत जाणारं ते एक कोडं असतं

ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं

गुंतून मात्र त्यात पडायचं न

कुणीतरी आठवणं काढतय

पुसनार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कोनाचेच डोळे भर्नार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ....... बाकी काही नाही
हसता हसता डोळे लगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

प्रत्येक मैत्री प्रेमात बदलत नाही..

प्रत्येक मैत्री प्रेमात बदलत नाही..
पहीला दिवस कॉलेजचा,
खुप खुप मजा केली,
एकटेपणाची सवय माझी
हळू हळू विरून गेली..

माझ्याच बसमधे,
माझ्याच वर्गात,
जणू आम्ही दोघे,
नव्या मैत्रीच्या शोधात..

मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,
माझ्या विनंतीला तीचा होकार,
तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,
नवी पालवी फुटणार..

मैत्री आमची खुप सुंदर,
एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,
ती म्हणायची राहूया आपण,
असंच सोबती निरंतर...

तीचा माझ्यावर खुप जिव,
हे तिच्या स्वभावातून कळायचं,
माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,
तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..

ती मला सावरायची ,
माझ्या उदासीला दुर लावायची,
आंनदाची ती श्रावणसर ,
माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..

मैत्री आमची वाढत गेली,
तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,
पण मैत्रीला काही होणार नाही ना?
असं भितीच वारं माझ्या मनात आलं

अस्वथ व्हायला लागलो,
दिवसे न दिवस विचार करू लागलो,
तिला कसंतरी कळावं म्हणून,
उगाच प्रयत्न करू लागलो...

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,
खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,
मी तेव्हाच दुर लोटलं..

तेव्हापासून आजपर्यंत ती

आपलंही कुणी असावं

खांद्यावर डोकं ठेवून
तिला रडावंसं वाटावं .
काँलेजनंतर मागे थांबून
सोबत बसावंसं वाटावं .

ज्या स्वप्नांमधे माझ्या
सगळ्या रात्री जागतात .
त्या स्वप्नांमधे हरवून
तिलाही जागावंसं वाटावं .

माझे आसू पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं .
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं..!

छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडावं .
पण, भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल अडावं .

बाकी सगळ्या जगाचा
पडेलच विसर तेव्हा ,
तिनं माझ्या प्रेमात
अगदी आकंठ बुडावं .

ह्या छोट्याश्या स्वप्नानं
एकदाच खरं व्हावं .
नेहमीच वाटतं यार,
आपलंही कुणी असावं

आयुष्यातला एक अप्रतिम क्षण....

मैत्री म्हणजे काय.....???
मैत्री म्हणजे...
कधी न संपणार नात्.......


मैत्री म्हणजे...
गोड स्वप्नं......

मैत्री म्हणजे...
हवेतला ऊबदार गारवा......

मैत्री म्हणजे...
अस्मानीची एक परी...

मैत्री म्हणजे...
श्रवानाताला पाउस......

मैत्री म्हणजे...
गीत....

मैत्री म्हणजे...
प्रीत.....

मैत्री म्हणजे...
दवबिंदु.....

मैत्री म्हणजे...
जगणे...मरणे...

मैत्री म्हणजे...
श्वास...

मैत्री म्हणजे...
आयुष्यातला एक अप्रतिम क्षण....

मन..

मन..

उडाले उडाले
झाले हिरवे पान
सुटले सुर्रकन
झाडाच्या कवेतून

कसली ही भूक
कैसी तहान
झाले वेडेपिसे
विहरले दूरदूर

अडकले काट्यांत
माखले पंकात
कैसा हा सोस
हासे सैरभैर

गायले भुंग्यासवे
बनले मोर
नाचले थुईथुई
इंद्रधनु पाहून

झेपावले अंबरी
गाठले पाताळ
सुगंध वादळी
भिरभिरे वेगात

भिजले निजले
निर्झर कपारीत
काळ थबकला
हासले स्वप्नात

जागले पहाटे
नाहले धुक्यात
सजले लहरले
अनंत प्रवास....

डोळे तुझे.

डोळे तुझे.......
डोळे तुझे.......
माझ्या खिडकीतल्या आभाळातून
कधी मलाच न्याहाळत असतात
डोळे तुझे..
मला क्षणभरच येत हसायला जरासं
आणि क्षणातच हरवतात पुन्हा
डोळे तुझे..
कधी मेघांआडून, कधी मिचकावून
मला पाहत असतात
डोळे तुझे..
तू असतेस अगदी खऱ्यातलीच
मला अस्तित्व तुझं पटवून देतात
डोळे तुझे..
मी लिहीत असतो कविता तुझ्यावर
आणि उत्सुकतेने बघत असतात
डोळे तुझे..
कधी चुकून मी करीत असतो
चुक एखादी
आणि मला सावरत असतात
डोळे तुझे..
कधी हूरहूर मलाही
स्पर्शाची तुझ्या
आणि मला स्पर्शत असतात
डोळे तुझे..

तुझे डोळे आभाळात, कि आभाळ तुझ्या डोळ्यात..?
नक्की फरक यातला सांगतात मला
डोळे तुझे..
तू असलीस जरी दूर तिथे
तरी माझ्यासोबत असतात नेहमीच डोळे तुझे.......

मैत्री म्हनजे.....

मैत्री म्हनजे.....
मैत्री म्हनजे मैत्री म्हनजे मैत्री असते
तुझ्या मनातील विश्वास
अन माझ्या मनातील खात्री असते
भावना आनि अपेक्शामध्ये
आपल्याल पकदनारी कात्री असते

मैत्री म्हनजे मैत्री म्हनजे
एक अपूर्वाई असते
कधी काहिच न सान्गन्याचा हत्त
तर कधी सगल काही सान्गन्याची
घाई असते
जीवनाच्या वतेवरील
हिरवीगार वन्रई असते

मैत्री म्हनजे मैत्री म्हनजे
वेगलीच कहानि असते
रदताना हातातला रूमाल तर
हसताना दोल्यातील पानी असते
मित्र नसला कि जीवनात एक उनीव असते
कारन
नत्याच्या पलीकदील ती एक जानीव असते

एक तरी मैत्रीण अशी हवी

एक तरी मैत्रीण अशी हवी
एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेडया मित्राची
समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरचं! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीण' हवी जी आपणास मित्र म्हणवणारी
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!

आयुष्याच्या वळणावरती....

आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....

चालता चालता वाटेत दु:खाचे गाव लागले
थकलेल्या मनाला ती च्या ओढीने ग्रासले

मनच ते असे थांबुन थोडेच रहाणार
भेटुनही तिच्या शी काय बोलावे असे वाटतच रहाणार

म्हणुन मग मी तिला भेटतच नाही,
बोलायचे असुनही शब्दच उरत नाही.....

वाटले न बोलताही, तिनेच ओळखावे सारे
विसरुन माझ्या आनंदाला, दु:ख जाणावे खरे....

वेडया मनाचा, वेडा विचार मनातच राहिला..
तिच्या आठवणीं मध्ये एक-एक दिवस जात राहिला...

आयुष्याच्या वळणावरती मागे वळुन पहाताना,
होतो आनंदी, तिला आनंदात पहाताना...

सोडुन जाताना तिला आनंदाच्या गावी...
आम्ही मात्र विसावलो दु:खाच्या गावी.....

किती छान झालं असतं...

किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....
समजुन ही घेतलं असतं आणि समजावलं ही असतं
किती छान झालं असतं.......

घेतली असती सगळी दु:खे, भरला असता आनंद ...
या जीवनात माझ्या, मी ही काहीतरी केलं असतं..
किती छान झालं असतं.......

सांगायच्या आधिच समजुन घेतल्या असत्या सगळ्या भावना..
माझ्याही भावनांना कधी तरी वाट मिळाली असती..
किती छान झालं असतं.......

नसते कधिही येऊ दिले डोळ्यात तिच्या अश्रु..
सतत तिच्या ओठांवर स्मित पहाता आलं असतं....
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....

एक प्रवास.

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रव

प्रेम

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

खरे तर असे आपल्या कोणच्याही जीवनामद्धे घडू नये पण खरे पहिले तर ही सत्या परिस्थिती आहे,
मी असेही म्हणत नाही की प्रेयसी नसावी
प्रेयसी असावी पण जीवन भर सात देणारी,
आपल्या भावना समझहून घेणारी,
प्रेयसी नसावी जी फक्त आपल्या खिशातल्या पैशना भूलणरी,
आणी आप्ण रिकामे झालो की ओळख न दाखॅवणारी.
.
.
.
प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

ती मैत्री

कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री.

आयुष्य

माझ्यासाठी तू काय आहेस.....
कधी न पाहिले स्वप्नी,
कधी न होते ध्यानी मनी,
असे प्रेम तुझे मला लाभले,
अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..

माझ्या जिवनात आलीस तू अशी,
की सारं काही बहरून गेलं,
लोंखडाचं कणखर जगणं माझं,
तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..

तुझ्या मिठीचा आधाराने मला,
नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,
म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,
मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..

तुझा तो होकार माझ्यासाठी,
आजही अविस्मरणीय असा आहे,
तुझ्या हातात मी दिलेलं फुल,
अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..

तेव्हा कधी नजर ना लागो,
आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,
म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,
तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..

आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,
तुझ माझ्या जिवनात असण्यावर,
नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,
जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

आठवण

तुझ्यासाठी..
हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............
मुसळधार पाउस पहाताना ,
हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,

हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,
त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,

हो येते तुझी आठवण,
ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,
ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,
अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,

हो येते तुझी आठवण,
संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....
त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,

हो येते तुझी आठवण,
रात्र होताना वाटत घेशील मला कुशीत
अन हलूच स्पर्ष करशील मला

म्हणुन............................
हो येते तुझी आठवण .....

भेट

तू भेटली नसतिस तर.......
तू भेटली नसतिस तर.......
असाच उनगडत असतो मी
शोधत होतो इकडे तिकडे तुला
अजुन असाच तुझ्या शोधात असतो मी.....

एकटाच होतो....मित्र असून देखील
कोणी इतके नाही समजावले कधी
समजून घेतलेस मला तू नेहमी
वाद झाले कित्येकदा तरी न रागावलीस कधी

नेहमी दिलेस प्रोत्साहन....
दिलास मला मदतीचा हात
आत्ता नाही सोडणार हात तुझा
देईन तुला आयुष्यभर साथ......

ठाउक आहे दोघांना.....
की एक्मेकांशिवाय करमत नाही
आज मी सांगतो सर्वांना......
ती माझ्या सोबत आहे.....मागे नाही

इशारा

पण इशारा कोण देणार..?

बोलायचे तर दोघंानाही आहे,

पण शब्द कोण देणार..?

भेटायचे तर दोघंानाही आहे,

पण वेळ कोण देणार..?

प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,

पण पहल कोण घेणार..?

स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,

पण हींमत कोण देणार..?

तोडायचेत पाश बंधनाचे,

पण साथ कोण देणार..?

सोबत तर हवी आहे जन्माची,

……. तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार

पाउस

ती' आणि 'पाउस'..
'ती' आणि 'पाउस'..

पाउस...किती आनंद होतो ना पाउस चालू झालाकी...पण आतशा हाच पाउस, तिची आठवन करुन देतो,
तिचे विचर मनात घोळका करतात, मनात काही प्रश्न उठतात..काही ईच्छा येतात..आणि मग, तिचि आठवण,मनातले प्रश्न आणि मनातली इच्छा यांतून येते हि कविता...'ती' आणि 'पाउस' ....

'ती' आणि 'पाउस'..

मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना...

पहिल्या वहिल्या पावसात,
ती नाच नाच नाचेल
चेहेर्यावरचं हस्य तिच्या,
आणखि खुलुन उठेल..
पाउस सुध्धा वेडा होईल,
तिला ओली करताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

भिजता भिजता हळूच,
ती केसं मोकळे सोडेल..
डोळ्यावरची ओली बट,
हळूच मागे सारेल..
उर्वशीही लाजवेल बिचारी,
तिचं मोहक रुप बघताना,
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

भिजता भिजता कदाचीत,
ती माझी आठवन काढेल..
बरसनार्या त्या पावसालाही,
मग माझाच हेवा वाटेल..
पण,ख्ररच माला आठवेल का ती?
अस काही घडताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...

पावसाळा चालू झाला की,
तिचेच विचार मनात येतात..
नकळतच डोळे माझे,
उगाचच पाणावतात..
पण,माझ्या भावना कळतात का तिला?
मी तिच्या आठवनीत भिजताना..

मैत्री

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??
प्रत्येक पोर्णिमेच्या चंद्रात -
आपण तिलाच् शोधत फिरतो..
प्रत्येक नविन कविता -
तिलाच् अर्पण करतो..
तिला मात्र तरीही काहिच् उमगत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

उशीर झाला असला की-
आपण घाई घाई करतो!
मेटाकूटीने चढून आपण-
बसमध्ये उभे ठाकतो!
मुलीशेजारी बसण्याचं तरीही धाडस होत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

चित्रपट पाहून आल्यावर-
आपण उद्दात्तं विचार करतो!
कोणीतरी मोठं बनण्याच्या -
इर्षेला आपण पेटतो!
इर्षावगॅरे सगळं रात्रीपुरतच् टिकणारं असतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडतं.....

मन

एकदा मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय

मी

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

khwaab

Math poocho ke humne kya khwaab dekha hai
tumhe umr bhar tadpaayega, woh azaab dekha hai

Tum kehte the musalsal ke hum kisi khabil hi nahi
dekhne waalon ne hum main ek aftaab dekha hai

Humpe yeh ilzaam tha ke hum bigde hue hai bahut
humne jinko bhi dekha hai, zyada kharaab dekha hai

Tumne parvarish to ki humaari kaanton mai bahut
un kaanton mai bhi humne ek gulaab dekha hai

Tum mehsoos nahi kar paaye jin aankon mai aansoo
un aankhon ko ashq bahaate, be-hisaab dekha hai

Humaare liye tumhaare paas kabhi waqt hi na tha
aur zamaane ko tumse hote dastiyaab dekha hai

Daava tha tumhaara ke kabhi gaye nahi maikhaane ko
tumhaari madhoshi mai hardam, sharaab dekha hai

Tumhe naaz tha kabhi jinpar khud se bhi zyada
aaj tumne aur humne unko be-naqaab dekha hai

Zamaane ki nazar mai rahoge tum danishvar hardam
humne 'Tanha' tumhe kis khadar be-hijaab dekha hai

नशीब

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते

य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते

एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते

आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते

मैं न जानू की कौन हूँ मैं,

मैं न जानू की कौन हूँ मैं,
लोग कहते है सबसे जुदा हूँ मैं,
मैने तो प्यार सबसे किया,
पर न जाने कितनो ने धोखा दिया।

चलते चलते कितने ही अच्छे मिले,
जिनने बहुत प्यार दिया,
पर कुछ लोग समझ ना सके,
फिर भी मैने सबसे प्यार किया।

दोस्तो के खुशी से ही खुशी है,
तेरे गम से हम दुखी है,
तुम हंसो तो खुश हो जाऊंगा,
तेरे आँखो मे आँसु हो तो मनाऊंगा।

मेरे सपने बहुत बढे़ है,
पर अकेले है हम, अकेले है,
फिर भी चलता रहऊंगा,
मजिंल को पाकर रहऊंगा।

ये दुनिया बदल जाये पर कितनी भी,
पर मै न बदलऊंगा,
जो बदल गये वो दोस्त थे मेरे,
पर कोई ना पास है मेरे।

प्यार होता तो क्या बात होती,
कोई तो होगी कहीं न कहीं,
शायद तुम से अच्छी या,
कोई नहीं नही इस दुनिया मे तुम्हारे जैसी।

आसमान को देखा है मैने, मुझे जाना वहाँ है,
जमीन पर चलना नही, मुझे जाना वहाँ है,
पता है गिरकर टुट जाऊंगा, फिर उठने का विश्वास है
मै अलग बनकर दिखालाऊंगा।

पता नही ये रास्ते ले जाये कहाँ,
न जाने खत्म हो जाये, किस पल कहाँ,
फिर भी तुम सब के दिलो मे जिंदा रहऊंगा,
यादो मे सब की, याद आता रहऊंगा।

मैत्रीण

एक मैत्रीण अशी हवी.
एक मैत्रीण अशी हवी.

जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवज देणारी.

आपल्यासाठी हसणारी
वेळ आलिच तर अश्रु हि पुसणारी.

स्वताच्या घासातला घास
आठवाणीने काढुन ठेवनारी.

वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजुत हि काढणारी.

सगळ्यांच्या गोळक्यात आपणाला
सैरभैर शोधणारी.

आपल्या आठवणीने आपण
नसताना व्याकुळ होणारी.

खरच अशी एक तरी जिवा भावाची
मैत्रीण असावी आपणाला मित्र म्हणनारी

आठवणी

आता आठवणीत राहिलेत, ते फक्त शुष्क उसासे
बाकी सारे तुझ्यासोबतच, एकनिष्ठपणे वाहुन गेलेले ..
ओले श्वास..
आता वाळवंट म्हणावं, कुणीही
इतकी जळजळीत प्रीत आपली
झाडं सारी वाळून गेलीयेत
कुठे सावली सापडेन म्हणुन अजुन मी शोधतोय काही
तु तर केव्हांच निघून गेलीस, वळवाच्या सरीसारखी
मागे तेवढी ठेउन गेलीस एक तिरकस नजर..
तेव्हां मनात दाटलेली ईच्छा, मी तिथेच पुसुन टाकली
वाळुत हाथ फिरवावा तशी...
आता रस्ते नाहीतच इथे,
सारी मैफिलच बदलून गेलीये
आता फक्त वाळू, आणि प्राण कंठाशी आणणारा वारा
सगळीकडे रक्त ओकणारी शांतता
मी तरीही जपली आहेत तुझी निघून जातांनाची दोन पावलं
तुझ्याही नकळत...
तितकाच आधार सुटत्या जीवाला..

मैत्रीसारखी

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी...

संकटकाळी हात देणारी...

आनंदी समयी साद घालणारी...

मनाची कवाडे उघडून डोकावणारी...

काहीं गुपितांचे राखण करणारी...

मन मोकळे करुन सारं सांगणारी...

सांगता सांगता मोहीत करणारी...

कधी कुणाला न लुटणारी...

चांगल्याच कौतुक करणारी...

तितकीच चूका दाखविणारी...

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी...,

मैत्री असावी अशी... मैत्रीसारखी

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..

जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की.
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में..

येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज..
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में..

नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी..
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में..

कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी..
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में..

सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग..
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में..

माना इश्क है खुदा, प्यार करने वालों के लिये "अभी"
पर हम तो अपना सिर झुकाते हैं, दोस्ती में..

ओर एक ही दवा है गम की दुनिया में क्युकि..
भूल के सारे गम, दोस्तों के साथ मुस्कुराते हैं, दोस्ती में

Maitri

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

Hokar

नकळत सारे तुझे शहारे,
का वेड लावती या जिवाला,
तुझे नजारे तुझे इशारे,
आठवणीतून रोज छळती रे मला..

तु दिसतेस दाहीदिशांना,
तेव्हा वाट मी चुकतो,
शोधता आधार आशेचा,
तेव्हा मला किनारा तुझाच दिसतो..

कधी वाटते या मनाला,
हळुवार कुरवळावे तुझ्या स्मीतफुलांना,
पण ओंजळीत येताच का येते
जाग माझ्या रातींच्या त्या स्वप्नांना...

असेच माझे दिस अन रातीचे,
अजब खेळ सुरू झाले,
तुला पाहता.. तुला आठवता
माझे तुझ्यावर प्रेम जडले...

काही सुचत नाही, कळत नाही,
अबोल्याला आता सांगावे तरी कसे,
या प्रेमाचे या प्रितीचे रंगचित्र,
तुझ्या ह्रिदयी उमटावे तरी कसे...

या कळत नकळतच्या खेळाला,
तुझा सहभाग मला मिळावा,
हा डाव जिवनाच्या सरीपाटाचा
तुझ्या होकाराने तु आता जिंकावा...

Maitri

रातोरात रडवणारी
आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

Paravas

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा

Ajun Kahi

बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून..
नाहीतर तुला दिसले असते ओले डोळे दुरून..

बरं झालं जमलं नाही नजरेला नजर भिडवून पाहाणं..
कदाचित मलाच जमलं नसतं भानावरती राहाणं..

तुला उगाचंच वाटलं असतं मी दुबळा आहे..
मीही चारचौघांसारखाच गं , कुठे वेगळा आहे ?

तुझंही नव्हतं पूर्वीसारखं खळीदार मधाळ हसणं..
मध उरला नाहीच आता नुसतंच मधमाशांचं डसणं…

तसाही येणार नव्हताच कधी हातात हात तुझा…
जमिनीवरच्या दगडांवर मेहेरबान होतात का आकाशातल्या वीजा ?

पण तरीही बरं झालं एकदा भेटलीस , मनावरचं ओझं हलकं झालं .
आयुष्य माझ्याशी पुन्हा एकदा बोलकं झालं .

माझं मलाच कळून चुकलं आता चालणं एकाकी आहे…
अर्धं आयुष्य वणव्यात गेलं , पण अजुन जळणं बाकी आहे

AAtavani

कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला

Abhas

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे

Maitri

मैत्री म्हणजे एक अनोखे बंधन आहे...
मित्रांच्या ह्रदयाचे स्पंदन आहे !

मैत्रीमुळे दुर्गुण पळुन जातात...
मोठमोठे अहंकार गळून जातात !

मैत्रीमुळेच जगण्याला अर्थ आहे ....
मैत्रीशिवाय जगणे व्यर्थ आहे !

मैत्री असते एखाद्या फुलासारखी....
कधीही .. कुठेही .. सुगंध पसरविणारी..!

मैत्री असते एखाद्या लहान मुलासारखी....
गोन्डस.. निरागस.. आनंद देणारी...!

मा़झं सगळं जग मैत्रीत सामावलंय ...
आजवर मी मित्रांचं प्रेम तेव्हढं कमावलंय ..!

मैत्री असते उत्तुंग आकाशाएव्ह्ढी ..
असंख्य सूर्यांच्या प्रकाशाएव्हढी...!

मैत्री मनांतला अंधार घालवते....
असंख्य अडचणींमध्येही आशा पालवते ..!

मैत्री नसलेल्यांचे जीवन रूक्ष आहे....
मैत्री म्हणजे आमच्यासाठी 'सदेह' मोक्ष आहे ..!

आनंद-छंद दायिनि.......... मैत्री..!
स्वच्छंद-धुंद दयिनि.......... मैत्री....!

Saari

……सरी ग सरी……
सरी ग सरी……
सरी ग सरी……
आल्या ग सरी…..
आल्या ग सरी…..
—————————————-————

काळ्या मेघाची तू लेक
आलि वाजत गाजत
ह्या भल्या पावसात
चिंब निघालि भिजुन..

ओलि ओलि तुझी काया
वेगळिच असे माया
फ़ुटे मातीला अंकुर..
स्पर्श तुझाच वेगळा

कोणी दुखात रडते..
कोणी सुखात रडते
तू भिजवून त्यांना..
त्यांच्या आश्रूच झाकते

सुर्य रोजची उगे
किरणे आकाशि पसरे…..
परी..
तुझ्या थेंबांनाच छेदुन
इंद्रधनुष्य ते दिसे

प्रेम दिले तू अपार
तुझे थोर उपकार
माझ्या प्रेमाची ग सखे..!
तू एक ..खरी साक्षिदार…

सरी ग सरी……
सरी ग सरी……

तू एक ..खरी साक्षिदार..

Maan

आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

एक मैत्रीण त्यास हवी
चिडवून भांडायला
रुसवून मनवायला
सदोदित सोबतीला
त्या धुंद चांदरातीला
स्वप्न हे पूर्ण होण्याचं
स्वप्न मनी बाळगतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

म्हणुन आज सखी तू ये ना
मनाला खुदकन हसू दे ना
स्वप्नातही तव रूप पाहून
मध्यरात्री ते उनाडतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय

Maitri

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

Maitri

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री!!!

Pavus

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

Tu Nastana

नसताना.......

तू नसताना आठवतात,
असतानाचे क्षण
दोघांनी मिळून केलेले
कित्येक पण....

आठवते ती हुरहुर,
मनातलं ते काहुर
तुझ तो रुसवा,
नि प्रेमाची ती चाहुल.......

आठवतो तो पाऊस,
नि पावसातले आपण...
एकमेकांच्या नजरेतलं
हरवलेलं 'मी'पण.......

आठवतात दोघांचे उमलण्याचे दिवस.
स्वप्नांच्या वाटेनी
फ़ुलण्यचे दिवस............

एकमेकांना सावरत
चालण्याचे दिवस,
वार्यावर शीळ घालात
झुलण्याचे दिवस............

चांदण्याच्या रात्रि
जागायचे दिवस,
एकमेकांना प्रत्येक क्षणी,
मागायचे दिवस.........!

Mairi

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

Dream Complete

उघड्या डोळ्यांनी आपण,
रंगवत असतो स्वप्न.
आपल्या हातात नसतं
कुठलं पडावं ते स्वप्न.

जागेपणी पाहिलेली स्वप्नें,
ही तर स्वप्नेच असतात.
गाढ झोपेतली स्वप्ने,
तरी कुठे खरी असतात?

रंगवतो आपण स्वप्नें,
मनाला रुचतिल तशी.
प्रत्यक्षात घटना घडते,
प्रारब्धात असेल तशी.

चतुर असते आपले मन,
फक्त सुखासंगे विहार करते.
दुःखाला जागेवरच ठेवून,
सोबतीला न्यायचे विसरते.

सुखाच्या आपल्या स्वप्नात,
दुःख अलगद येऊन पडतं.
आनंदाच्या मधुर दुधात,
निराशेचं विरजण पडतं.

आपल्या स्वप्नी असतो,
फक्त सुखाचा गवगवा.
प्रत्यक्षात मात्र प्रखरतेने,
जाणवतो दुःखाचा दबदबा.

आपली इच्छा असेल ते,
नेहमीच कांही घडत नसते.
भगवंताच्या इच्छेनुसार घडते,
म्हणून ते अगदी योग्य असते.

स्वप्नें जरूर रंगवावीत,
सुखाची किंवा आनंदाची.
मात्र कला अवगत करावी,
दुःखात सुख शोधण्याची

Dream

उघड्या डोळ्यांनी आपण,
रंगवत असतो स्वप्न.
आपल्या हातात नसतं
कुठलं पडावं ते स्वप्न.

जागेपणी पाहिलेली स्वप्नें,
ही तर स्वप्नेच असतात.
गाढ झोपेतली स्वप्ने,
तरी कुठे खरी असतात?

रंगवतो आपण स्वप्नें,
मनाला रुचतिल तशी.

ayush

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,
तरी कुठेतरी थांबायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं.

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,
स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,
हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

आयुष्य असचं जगायचं असतं.........

Another One

“I“
Avoid It.

Most Satisfactory 2 letters
“WE“
Use It.

Most Poisonous 3 letters
“EGO“
Kill It.

Most used 4 letters
“LOVE“
Value It.

Most Pleasing 5 letters
“SMILE“
Keep It.

Fastest Spreading 6 letters
“RUMOUR“
Ignore It.

Hard Working 7 letters
“SUCCESS“
Achieve It.

Most Enviable 8 letters
“JEALOUSY“
Distance It.

Most Essential 9 letters
“PRINCIPLE“
Have It.

Most Divine 10 Letters
“FRIENDSHIP“
Respect it

Manache Vare

गंध आवडला फुलाचा म्हणून... .. फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असत

Dost Chahiye

Zindagi hai to Khwaab Hai
_Khwaab Hai To Manzilein Hai
____Manzilein Hai To Fasaley Hai
__________Fasaley Hai To Rastey Hai
_________Rastay Hai To Mushkilein Hai
____________ _Mushkilein Hai To Hausla Hai
____________ _____Hausla Hai To Vishawas Hai
____________ _________ _Vishvas hai to Paisa hai
____________ _________ ___Paisa hai to Shohrat hai
____________ _________ _____Shohrat hai to Izzat Hai
____________ _________ _________ Izzat hai to Ladki hai
____________ _________ _____Ladki hai to Tension hai
____________ _________ _Tension hai to Concern hai
____________ ______Concern hai to a Khayaal hai
____________ _____Khayaal hai to Khwaab hai
____________ __Khawab hai to Growth hai
__________Growth hai to Zindagi hai
______Zindagi hai to khwaab hai
_Matlab duniya Gol Gol hai...
Bas ek acha dost chahiye
aap jaisa.............

New Maitri

जग हे जगण्यासाठी कसे हे शोधत शोधत फिरतांना
एक क्षण मला गवसला आनंदामधे रमण्याचा

मला 'बेस्ट बॉय फ्रेंड' केल्याने 'मॅन'चा झाला 'बॉय'
मन आनंदले वय आटल्याने 'प्रिया' तुला हाय !

ऐकुन आला गोड शहारा 'काका' 'मित्र' झाला आता
चितारले मग चित्र मनी मी कशी असावी तू जगता.......

.... अशीच गोड दिसत रहा गलावरती खळी अंथरत
सतत खळखळत हसत रहा अधर अधर मिश्किल बोलत

केंद्र बिंदू जरूर हो पण आपले काटे विसरू नकोस
कढतांना काटा देखिल कुणाला तू दुखवू नकोस

जगामधे या वावरतांना स्वतः कधी तू हरवु नकोस
तुझ्या आजच्या ह्या मित्राला भविष्यातही विसरु नकोस

मित्रत्वाचे हे नाते तू वयात कधिही मोजु नकोस
या नात्याचे बंधन सखये मनात दटुन ठेवु नकोस

अशीच मैत्री राहो आपली या जन्मी अन पुढेहि ती
हीच प्रार्थना करून प्रभुशी जगू शांतता या जगती

जगाला 'जग' म्हणत जगात 'जगत' 'जगवत रहा'
तुझ्यामधिल त्या सुधा गुणांनी आनंदाला लुटत रहा

Thursday, April 2, 2009

Jagane

आपल्या जवळ जे नाही
त्याचीच मानवी मनाला ओढ असते
सर्वच मनं सारखी घडत नसतात
म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते .........

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

Thinking

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा