Friday, December 30, 2011

वर्षाचा शेवटचा दिवस.



वर्षाचा शेवटचा दिवस.
वर्षभरापूर्वी आपल्या आयुष्यात आलं २0११. तेव्हा कुणी विचार केला होता की, या वर्षात ‘हे असं’ एवढं सारं होईल.!
नुकत्याच भेटलेल्या दोन अनोळखी माणसांसारखे. नवं वर्ष आणि आपण पाहतच होतो एकमेकांकडे.
‘चांगलं’ वागण्याचा प्रयत्नही करत होतो.
पण कॅलेण्डरचं एक पान उलटायच्या आत, आपण वागू लागलो आपल्यासारखेच आणि नव्या सहस्त्राकातलं पहिलं दशक पचवून आलेलं हे वर्ष आपले रंग दाखवू लागलं. म्हणता म्हणता नाचवू लागलं, आपल्याला त्याच्या तालावर.! 

आपणही कधी रंगलो त्याच्या रंगात आणि कधी मनासारखे घडवले दिवस आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि प्रसंगी हट्टानंही.!
आज मागं वळून पाहताना आठवतो, सरत्या वर्षातला एकेक दिवस. त्यातला एकेक क्षण.
कधी हसलो होतो मित्रांसमोर खळखळून. कधी रडलो एकेकटेच आपले आपण, आतल्या आत.
कधी उठलो चिडून, पेटून, बदलून टाकू सारा समाज, सारी व्यवस्था असं म्हणत उतरलोही चिडून रस्त्यावर.
आणि कधी केली भंकस.
म्हटलं गेला उडत सगळा गंभीर पोक्तपणा आणि दुनियेभरचा विचारबिचार. म्हणू कशालाही ‘व्हाय धीस कोलावेरी.!’ हे असं म्हणता म्हणता, विचारबिचार करता करता.
एकेक दिवस, एकेक महिना करत संपलंही वर्ष.
काय नाही दिलं या वर्षानं.?
काही आनंदाचे, सार्थकाचे क्षण दिले.! जे आपल्याला कधीच मिळणार नाही, असं वाटलं होतं
ते सहज देऊन टाकलं.
सांगा, कधी वाटलं होतं की, जिंकू आपण क्रिकेटचा वर्ल्डकप.
पण जिंकलो की सहज.!
आणि सचिनची सेंचुरी.? अजून पाहतोय आपण वाट.!
ज्यानं ९९ शतकं ठोकली त्याचं एक शतक होऊ नये.? - भरभरून देताना, सगळंच देऊन नाही टाकलं या २0११ने. ठेवलीये काही अतृप्तता.!
नव्यानं नवीन काहीतरी कमावण्याची, मिळवण्याची, झगडण्याची आणि मनासारखं होता होता, मनासारखं नाही झालं काही, तरी उमेदीनं कसं जगायचं हे सांगणारी. 

आपल्या वर्ल्डकप जिंकण्यापासून, रस्त्यावर उतरण्यापर्यंतची. कोलावेरी डी पासून चिकनी चमेलीपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीमागे पागल होण्याची. स्टीव जॉब्ज नावाचा न पाहिलेला माणूस कायमचा निरोप घेऊन गेला म्हणून हळहळण्याची, अण्णांच्या आंदोलनाला सर्मथन देता देता मुठी आवळण्याची आणि त्या आंदोलनातही आपलं ‘फॅशन स्टेटमेण्ट’ करण्याची.!
आपणच आपल्याला पुन्हा भेटण्याची. आणि जे कमावलंय ते उराशी बाळगून जे मिळालंच नाही त्यासाठी २0१२ एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची.!
फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच
या वर्षाच्या पानांवर लिहिलेली एक डायरी.
तिच्या जुन होत चाललेल्या कागदांवर काही हसरे-दुखरे क्षण भेटले तर भेटा त्यांना.
निरोप कसला घ्यायचा त्यांचा.
ते असतीलच सोबत.आपल्याबरोबर.! 

नवीन वर्ष , हो आता सुरुवात होणार? पण कधी हा विचार केला आहे का? जे मागच्या वर्षी गमावले ते परत या वर्षी नाही गमवायचे ? जे करायचे होते ते नाही झाले पण या वर्षी कारयाचेच? किव्हा परत तेच विसरून जायचे ? विचार करा ? कुटे आहोत आपण ?

फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच लिहिलेली एक डायरी.२०११.

नवीन वर्ष , हो आता सुरुवात होणार? पण कधी हा विचार केला आहे का? जे मागच्या वर्षी गमावले ते परत या वर्षी नाही गमवायचे ? जे करायचे होते ते नाही झाले पण या वर्षी कारयाचेच? किव्हा परत तेच विसरून जायचे ? विचार करा ? कुटे आहोत आपण ?
वर्षाचा शेवटचा दिवस.
वर्षभरापूर्वी आपल्या आयुष्यात आलं २0११. तेव्हा कुणी विचार केला होता की, या वर्षात ‘हे असं’ एवढं सारं होईल.!
नुकत्याच भेटलेल्या दोन अनोळखी माणसांसारखे. नवं वर्ष आणि आपण पाहतच होतो एकमेकांकडे.
‘चांगलं’ वागण्याचा प्रयत्नही करत होतो.
पण कॅलेण्डरचं एक पान उलटायच्या आत, आपण वागू लागलो आपल्यासारखेच आणि नव्या सहस्त्राकातलं पहिलं दशक पचवून आलेलं हे वर्ष आपले रंग दाखवू लागलं. म्हणता म्हणता नाचवू लागलं, आपल्याला त्याच्या तालावर.! 
आपणही कधी रंगलो त्याच्या रंगात आणि कधी मनासारखे घडवले दिवस आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि प्रसंगी हट्टानंही.!
आज मागं वळून पाहताना आठवतो, सरत्या वर्षातला एकेक दिवस. त्यातला एकेक क्षण.
कधी हसलो होतो मित्रांसमोर खळखळून. कधी रडलो एकेकटेच आपले आपण, आतल्या आत.
कधी उठलो चिडून, पेटून, बदलून टाकू सारा समाज, सारी व्यवस्था असं म्हणत उतरलोही चिडून रस्त्यावर.
आणि कधी केली भंकस.
म्हटलं गेला उडत सगळा गंभीर पोक्तपणा आणि दुनियेभरचा विचारबिचार. म्हणू कशालाही ‘व्हाय धीस कोलावेरी.!’ हे असं म्हणता म्हणता, विचारबिचार करता करता.
एकेक दिवस, एकेक महिना करत संपलंही वर्ष.
काय नाही दिलं या वर्षानं.?
काही आनंदाचे, सार्थकाचे क्षण दिले.! जे आपल्याला कधीच मिळणार नाही, असं वाटलं होतं
ते सहज देऊन टाकलं.
सांगा, कधी वाटलं होतं की, जिंकू आपण क्रिकेटचा वर्ल्डकप.
पण जिंकलो की सहज.!
आणि सचिनची सेंचुरी.? अजून पाहतोय आपण वाट.!
ज्यानं ९९ शतकं ठोकली त्याचं एक शतक होऊ नये.? - भरभरून देताना, सगळंच देऊन नाही टाकलं या २0११ने. ठेवलीये काही अतृप्तता.!
नव्यानं नवीन काहीतरी कमावण्याची, मिळवण्याची, झगडण्याची आणि मनासारखं होता होता, मनासारखं नाही झालं काही, तरी उमेदीनं कसं जगायचं हे सांगणारी. 

आपल्या वर्ल्डकप जिंकण्यापासून, रस्त्यावर उतरण्यापर्यंतची. कोलावेरी डी पासून चिकनी चमेलीपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीमागे पागल होण्याची. स्टीव जॉब्ज नावाचा न पाहिलेला माणूस कायमचा निरोप घेऊन गेला म्हणून हळहळण्याची, अण्णांच्या आंदोलनाला सर्मथन देता देता मुठी आवळण्याची आणि त्या आंदोलनातही आपलं ‘फॅशन स्टेटमेण्ट’ करण्याची.!
आपणच आपल्याला पुन्हा भेटण्याची. आणि जे कमावलंय ते उराशी बाळगून जे मिळालंच नाही त्यासाठी २0१२ एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची.!
फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच
या वर्षाच्या पानांवर लिहिलेली एक डायरी.
तिच्या जुन होत चाललेल्या कागदांवर काही हसरे-दुखरे क्षण भेटले तर भेटा त्यांना.
निरोप कसला घ्यायचा त्यांचा.
ते असतीलच सोबत.आपल्याबरोबर.! 

Friday, November 18, 2011

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हा एक विचार होता, आचार होता, उच्चार होता. त्यांच्या जीवनाला ज्ञानाची व ध्यानाची बैठक होती. धर्म आणि ग्रंथ यांच्या आधाराने या सर्वापलीकडे असणारे जीवनाचे विराट आणि उदात्त रूप आपण शोधावे व मानवकुलाचा प्रवास त्या दिशेने घडावा अशी अपेक्षा आणि आकांक्षा बाळगून पावले टाकणारे एक कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी म्हणजे विवेकानंद! 


लौकिक अर्थाने स्वामीजी केवळ एक पदवीधर होते. कलकत्ता विद्यापीठाचे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले ते त्या काळचे एक विद्याथीर् होते. पुढे ते व्यासंगपुरुष म्हणून मान्यता पावले. त्यांचे आगळेपण असे की, त्यांना एक पुस्तक कधीही दोनदा वाचावे लागले नाही. ब्रिटानिकाचा ज्ञानकोश त्यांच्याही काळी होता. त्याचे दहा खंड त्यांनी सहज स्मृतिगत केले होते. गणित, शास्त्र, साहित्य अशा सर्व शाखांत त्यांच्या विचारांची गती विलक्षण होती. 


' जीवन' हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. जगात देव आहे का? तो कोणी पाहिला आहे का? मला तो कोणी दाखवू शकेल का? पुस्तकी पांडित्यापलीकडचा परतत्य स्पर्श कोणी अनुभवला आहे का? ही प्रश्नावली समोर ठेवून त्यांनी दशदिशांचा धांडोळा घेतला. कोडे माझे कुणी उकलील का? असे साकडे ते सर्वांना घालत. जीवनाचा बोध घडावा म्हणून त्यांनी विरक्ताचे उपाधीमुक्त जीवन स्वीकारले. त्यांचे वडील आणि आजोबा कायदेपंडित होते. स्वामींना तेवढी मजल मारून कलकत्याला हायकोर्टात उभे राहता आले असते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, असामान्य वक्तृत्व, लोकविलक्षण भाषाप्रभुत्व अशी गुणसंपदा लाभलेला हा युवक अनेकांच्या नजरेत भरला. एक 'स्थळ' म्हणून त्यांच्याकडे पाहणारा धनिक पित्यांचा एक वर्ग तेव्हा कलकत्त्यात होता. 


पण विवेकानंदांच्या नजरेपुढे एकच स्थळ होते. त्याचे नाव जीवन! या जीवनाचा कोणी निर्माता आहे का? तो असेल तर त्याचे दर्शन घडेल का? ज्याने देव पाहिला असा कोणी देवमाणूस जगात असेल का? पण माणसाने मुद्दाम पहावा असा देव तरी या जगात असेल का? घराघरात देव्हारा असतो; पण देव कोठेच नसतो. तरी पूजापाठ चालूच राहतात. यालाच जगरहाटी म्हणतात. हे असेच चालणार का? याचि देही, याचि डोळा मला हे जाणावयाचे आहे; पण माझ्याही अगोदर ज्यांनी हे पाहिले, अनुभवले असे कोणी महाभाग भेटतील काय? ही स्वामींची विवंचना होती. 


अनेक समकालीनांना, थोरामोठ्यांना हा नरेंदनाथ विश्वनाथ दत्त नावाचा युवक भेटत होता. त्यांच्याशी संवाद, संभाषण करीत होता. देवेंदनाथ टागोर, केशवचंद सेन अशा समकालीन सत्पुरुषांना, विचारवंतांना तो भेटत होता. 


या युवकाची ही जिज्ञासा अनेकांना एक प्रकारची व्यवहारशून्यता वाटत होती. या मुलाचे ज्यांना कौतुक वाटे, ते एवढेच म्हणत : 'या प्रश्नांना निर्णायक उत्तरे नाहीत. उगाच वेळ वाया घालवू नकोस.' 


विवेकानंद आग्रही होते, निश्चयी होते. 'याचि देही, याचि डोळा' त्यांना हे जाणून घ्यावयाचे होते. त्यांच्या जीवनप्रश्नावलीत  महत्त्वाचा प्रश्न  होता : देव आहे का? तो असेल तर कोणी तो प्रत्यक्ष पाहिला आहे का? मला तो दिसेल का? निदान कोणी तो दाखवू शकेल का? देवाचा धावा करणारे अनेकजण असतात; पण ते संभ्रमाच्या आवर्तात सापडतात. शेवटी तुकारामासारखा संतही म्हणतो : 'मज हा संदेह झाला दोही सवा। भजन करू देवा अथवा नको' विचारी मनावर येणारे अभ्र कसेही असले तरी त्यामुळे आसमंत अंधारून येते. आत्म्याची काळोखी रात्र ती हीच! विवेकानंदांच्या वाट्याला ती आली होती. या रात्रीच्या काळोखातून प्रकाशाच्या दिशेने हा साधक पावले टाकत होता. त्याची प्रार्थना होती : ''तमसो मा ज्योतिर्गमय।'' 


सुखासुखी ओढवून घेतलेले हे दु:ख होते. त्यात दुदैर्वाचा भाग नव्हता. आपल्याच स्वभावगुणांचा तो परिणाम होता. ज्या वयात मुलांनी खावे, प्यावे, ल्यावे, नाचावे, बागडावे, गमतीजमती कराव्या त्या वयात असे कशाचे तरी डोहाळे लागावे हा एक विनोद होता. 


' शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या मनाला लागणारी विवंचना हा त्यांच्या मोठेपणाला फुटलेला पाझर असतो. सुमार माणसे सुखी असतात. खुळे लोक खळखळून हसतात. 


ऐहिक सुखाची तृष्णा नसणे, अधिक विचारापायी मानसिक यातना अनुभवणे व या यातनांच्या शरपंजरी पडून एखाद्या ध्यासापायी श्वास सोडणे हा ज्यांच्या पत्रिकेतील योग असतो तेच पुढे ज्ञानयोगी ठरतात. त्यांच्या साधनेच्या प्रकाशात जनसामान्यांची पावले जीवन मार्गावरून पडत राहतात.

Monday, September 26, 2011

इतिहास वाचायचा आणि रंगवून सांगायचा?

शिवकाळात किल्ल्याना अनन्य साधारण महत्व होते.मात्र किल्ले घेण्याच्या इस्लामी आणि शिवाजी राजांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.गतिमानता हा राजांच्या युद्धपद्धतीचा गाभा होता.पुरंदरच्या तहात गेलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोंढाणा होय.सिंहगड मोगलाकड़े होता.त्यावर उदयभानु राठोड या ३८ वर्षाच्या राजपूत किल्लेदाराची नेमणूक केली होती.त्याच्या हाताखाली सुमारे १५०० राजपूत आणि मुस्लिम सैनिक गडाच्या रक्षनासाठी तैनात केले होते.
.
राजानी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती.तानाजीने पुरंदरचे युद्ध,प्रतापगडाचे युद्ध,राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती.तो हजार पायदल हशमांचा सरदार होता.जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता.सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती.त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची (१६७०)संध्याकाळ.या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी.चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता.त्या आधी मिट्ट अंधारच...!!

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावल्यांसह राजगड सोडला.गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते.मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले.दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले.मात्र यावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते.तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते.
उदयभानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला.दोघानाही जखमा होत होत्या.उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडले, सुभेदार पडले,सुभेदार पडले..अशी मावळ्यांमध्ये बातमी पसरली.हाता तोन्डाशी आलेली विजयश्री आता हातून निसटते काय अशी शंकेची पाल सर्वांच्याच मनात चुकचुकली.मावळ्यांचा धीर खचला,ते पळु लागले. सुभेदार पडले म्हणून मावळ्यांचा जोश पुरता मावळला. आत काय? राजपूतही पुरते घायाळ झाले होते,पण आता मावळे पळताना पाहून त्यांच्याही चेहर्‍यावर हास्य उमटू लागले होते.

सूर्याजी हे सर्व पहात होता. पळणार्‍या मावळ्यांसमोर जाऊन उभा ठाकला. निखार्‍यासारखे लालजर्द डोळे पळणार्‍या मावळ्यांवर रोखत म्हणाला,"तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भ्याडासारखे पळता काय? मागं फ़िरा, मी गडावरचा दोर कापून टाकला आहे,मरायचेच असेल तर गडावरून उड्या टाकून मरा नाहीतर इथं लढून मरा."
'गडावरून उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मेलेले काय वाईट'..आणि सूर्याजीच्या या शब्दांनी चमत्कार केला.सारे मावळे माघारा फ़िरले.युद्धाचे पारडे फ़िरले,राजपुतांचेही नशीब फ़िरले.आता मावळ्यांचा आवेश विलक्षण होता. सुभेदारांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता.महाराजांच्या समोर खाली मानेने नव्हे तर ताठ मानेने मिरवायचे होते. मग काय विचारता? पुनः हातघाईची लढाई,पुनः तोच आवेश,तेच मावळे..फ़क्त तानाजीविना..

काही वेळातच युद्धाचा निकाल लागला. राजपूतांनी मराठी रक्तासमोर शरणागती पत्करली.मावळ्यांनी गड खेचून आणला होता. सूर्याजीच्या जादूई शब्दांनी कमाल केली होती. गडावर गवताच्या गंज्या पेटवल्या गेल्या.आता तमा नव्हती अंगावरील जखमांची, की सांडलेल्या रक्ताची..हे रक्त आमच्या शिवाजी राजाच्या पायाशी,स्वराज्याच्या कामी आले हेच महत्वाचे..गडावर सांडलेल्या मराठी रक्ताची किंमत कोहीनूरपेक्षाही कितीतरी मोठी..कितीतरी मोठी..काय कौतुक सांगावे या मावळ्यांचे?कुठे सापडतात अशी माणसे?आम्हाला केव्हा मिळतील ही माणसे?पण मिळतील का तरी?की फ़क्त आम्ही इतिहास वाचायचा आणि रंगवून सांगायचा?खरंच सापडतील का हो ही माणसे आज?या पृथ्वीवर?की आणखी कुठ?

Monday, August 8, 2011

विवाह...प्रेम विवाह..अरेंज विवाह...जोडीदार...संबंध..

प्रेम म्हणजे ती, प्रेम म्हणजे ईश्वर, प्रेम म्हणजे सर्वस्व, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे धोका, प्रेम म्हणजे गुंता, प्रेम म्हणजे ताप, फन, क्रश, अ गुड टाइमपास, अट्रॅक्शन…...! प्रेमाची परिपूर्ण व्याख्या आजतागायत कोणी केली नाही असं म्हणतात . पण प्रत्येक जण स्वत:च्या अनुभवातून एक प्रेमाची व्याख्या करतो आणि काळानुसार बदलत राहतो. कोणत्याही वयात होणा-या या प्रेमात पडण्याचं खरं वय म्हणजे शाळा आणि कॉलेजचे दिवस. या काळात जमलेली प्रेमप्रकरणं तुटतातही तितक्याच लवकर. अफेअर्स होणं आणि तुटणं याचं प्रमाणही याच काळात जास्त असतं. कारण या काळात होणारी अफेअर्स ही ब-याचदा “माझ्या इतर मित्र - मैत्रिणींचं अफेअर आहे आणि माझं नाही, अरे कॉलेजमध्ये प्रेम नाही करणार तर केव्हा करणार, बंक मारायला काहीतरी कारण हवं, टाइमपास कसा करणार” या आणि यासारख्या अगदी क्षुल्लक कारणांनी होत असतात.

त्यामुळे यातली फार थोडी कपल्स पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतात. काहीजणांना प्रेम म्हणजे टाइमपासच वाटतो. यापलीकडे जाऊन विचार करण्याची त्याना गरज ही वाटत नाही. मिस कॉल दिल्यावर हमखास फोन करेल अशी व्यक्ती म्हणजे बॉयफ्रेण्ड असतो. त्यामुळे मेसेज आणि फोन या दोन गरजा भागवण्यासाठी बॉयफ्रेण्ड असावा, या शिवाय कॅण्टीनची आणि हॉटेल्सची बिलं भरण्यासाठी, महागडी गिफ्ट्स मिळवण्यासाठी, नवीन फिल्म्स पाहता यावेत यासाठी बहुतांश अफेअर्स करतात, तर आपली बॅग - टोपी सांभाळण्यासाठी, आपल्या नोट्स आणि जर्नल्स पूर्ण करण्यासाठी मुलांना गर्लफ्रेण्ड हवी असते.

याशिवाय यामागे असणारं एक सामाइक कारण म्हणजे शारीरिक आकर्षण. या प्रेमाची परिणती पुढे लग्नात व्हावी किंवा होऊ शकते असा विचार करणारी फार थोडी मुलं - मुली असतात. या दिवसात प्रेम म्हणजे एकत्र पिक्चरला जाणं, एकत्र फिरणं, एकत्र राहणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहतं.

कॉलेजनतंर सगळेच जण करिअरच्या गर्तेत सापडतात. तेव्हा मात्र त्यांच्या लाइफ पार्टनरबद्दलच्या संकल्पना बदललेल्या असतात. भावुकपणा संपून प्रॅक्टिकल विचारांनी त्यांना वेढलेलं असतं. गर्ल / बॉयफ्रेण्ड मोकळ्या स्वभावाचा हवा असा विचार करणारी पिढी लग्नाचा विचार मात्र गांभीर्याने करायला विसरत नाही. त्यावेळी शक्य तर आपल्याला पुरक असा जोडीदार शोधला जातो. हेच त्यांच्या भाषेत सांगयचं तर 'परफेक्ट मॅच' शोधला जातो. यात मुला-मुलींच्या मागण्या ठरलेल्या असतात .

यात काही गोष्टी कॉमन असतात. मुलांना त्यांची बायको करिअर आणि घर सांभाळणारी पण आधुनिक राहणीमानाची हवी असते. चारचौघात उठून दिसणारी हवीच पण ती फक्त आपली राहावी हा एक अट्टहासही असतो. सौंदर्य हा यात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. मुली शक्यतर आर्थिक स्टेबिलिटी पाहतात - तो कुठे काम करतो, किती पगार घेतो - याचा विचार करतात. करिअरला प्राधान्य देणारी यंग जनरेशन लग्न करताना आपला पार्टनर करिअरच्या दृष्टीने किती पूरक आहे, असा विचार करतात. करिअरच्या बाबतीतले एकमेकांचे विचार किती मिळतात, यावरून ते स्वत:चा लाइफ पार्टनर निवडतात. लग्न या नात्यात सहचर्यापेक्षा हक्क ही भावना अधिक दृढ असते.

खरंतर लाइफ पार्टनर निवडणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. पण याबाबत विचार करताना बहुतांश मुलं-मुली करिअरचाच जास्त विचार करतात. त्यामुळे प्रेम हे कॉलेज सोडल्यानंतरही त्यांच्याकरता एक सामान्यच गोष्ट राहते. एकदा लग्न केलं, की कोणाबरोबरही अटॅचमेण्ट होते असं त्यांचं ठाम मत असतं. त्यामुळे प्रॅक्टिकल विचारांच्या या मुलामुलींना इमोशनल फिलिंग्स म्हणजे नॉन्सेन्स वाटतात.

मुलांना लग्न म्हणजे एक बंधन वाटतं. सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल त्यांना काळजी वाटते, तिचा सहवासही आवडतो. पण ती मैत्रीण न राहता जेव्हा पत्नी होणार तेव्हा तिच्या अपेक्षाही बदलणार. म्हणजे आता एखाद्या मुलीशी जर मी बोलत असेल तर कदाचित ती चेहरा वेडावाकडा करेल पण लग्नानंतर मी मुलींशी बोललेलं तिला आवडणारच नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागणार, मित्रांबरोबर कधीही फिरण्यावर बंधन येणार, जबाबदारी घ्यावी लागणार, सवयी बदलाव्या लागणार. यामुळे कटकट वाढणार. म्हणजे एकंदरीतच मैत्रीण बायको झाल्यावर मला पूर्ण बदलणार. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाणार... या विचारांनी लाँग-टर्म नात्याची लगेचच कबूली द्यायला मुलं टाळतात.

याउलट, मुली जन्मताच भावूक असतात. एखादा मुलगा आपली काळजी घेतोय, त्याच्याविषयी आपल्याला जवळीक वाटतेय म्हणजे हाच आपल्या जीवनाचा जोडीदार असायला हवा असा तिचा अट्टाहास असतो. म्हणून अधिकाधिक ती त्या मुलात गुंतत जाते. मैत्रीच्या नात्यात बंधन नाहीत, पण लग्नानंतर ती येतील याची मुलाला भीती वाटते, म्हणून ते कमीटमेण्ट करत नाहीत. तर मैत्रीत काही बंधनं नसल्यामुळे हा आपल्याला कधीही सोडून जाईल ही भीती मुलींना असते, म्हणून त्या कमीटमेण्टचा आग्रह धरतात. मुलींच्या मते, लग्नासाठी प्रेम हेच महत्त्वाचं, तर मुलांच्या मते लग्नानंतर प्रेम संपतं आणि सांभाळावे लागतात ते खर्च आणि कुटुंबाच्या मागण्या.

अर्थात दोघंही आपल्या बाजूने बरोबर आहेत. कारण लग्नात प्रेम तर आहेच पण त्यागही आहे आणि जबाबदारीही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा दोघांचा निर्णय आहे. म्हणून आपल्या जोडीदाराला विचार करायला वेळ द्या. त्याचबरोबर त्याच्या मताचाही आदर करायला हवा. तो मुलगा तुम्हाला फक्त मैत्रीण मानत असेल तर त्याचाही स्वीकार करा. त्यात अडकून स्वत:ला कमी लेखून नैराश्य ओढावून घेऊ नका. मुलांनीही आपलेच विचार योग्य आहेत यावरच ठाम न राहता लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील, याचा विचार केला पाहिजे. तसंच योग्य बंधनामुळे दोघांवरही मर्यादा येऊन जीवनाला एक चौकट मिळेल. म्हणूनच हा विषय न टाळता परस्परांशी चर्चा करा.

प्रत्येक महिन्यात किमान सात दिवस संध्याकाळी जोडीदारांनी फक्त एकमेकांना वेळ द्यावा. डीनर एकत्र करावं. महिन्यातून किमान दोनदा तरी दोघांनी सोबत पिकनिकला जावं. एखादा सिनेमा जोडीनं पाहावा. त्यामुळे संवाद वाढतो, विश्वास दृढ होतो.

लग्न ठरवताना जाती-धर्म, नोकरी, पगार, वय आदी प्राथमिक निकष लावण्यासोबतच एकमेकांच्या व्हॅल्यूज, विचारसरणी, आवडीनिवडी, गोल, अपेक्षा, लाइफस्टाइल जाणून घेतली पाहिजे. व्हॅलण्टाइनला प्रेमाने लग्नाचा निश्चिय करताना थोडा या गोष्टींचाही विचार व्हावा.

शाळानिवडीपासून करिअर ठरवताना दहावेळा विचार होतो. पण नातेवाईक, जाहिराती, वधू-वर संशोधन संस्था यांना हाताशी धरून काही दिवसांत लग्नाचा प्रश्न निकाली निघतो. वरवर तपासणी करून हा निर्णय घेतल्यास अनेकदा नवरा-बायको आणि दोहोंकडच्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी लग्न करण्यापूवीर् नेमकं काय लक्षात घ्यायला हवं याबाबतीत माझे काही विचार –

चेकलिस्ट :

विचार :
आपल्या लग्न करण्याविषयीच्या अपेक्षा स्पष्ट करा. लग्न करण्याची कारणं जोडीदाराकडून जाणून घ्या. उदाहरणार्थ, घर सांभाळणारी बायको हवी असल्यास, करिअरिस्टिक मुलगी कितीही चांगली असली तरी नंतर वादविवाद होतात. नीतिमूल्यांविषयी जोडीदाराला त्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घ्या. कदाचित गरज पडल्यास वेगळ्या मार्गाने पैसे कमावण्यास त्याची हरकत नसेल किंवा वाट्टेल ते झालं तरी खरंच बोलायला हवं अशीही त्याची अपेक्षा असू शकेल. मूल्यांशी कितपत तडजोड तुम्हाला मान्य आहे? विचारसरणी समजून घ्या. एकमेकांच्या जेंडरविषयी काय मत आहे, हे लक्षात घ्या.
आवडीनिवडी - गाणं, ट्रेकिंग, फोटोग्राफी, संगीत अशा छंदांसाठी वेळ देणं, आवश्यक असतं. लग्नानंतरही तो वेळ मिळणार का, किंवा तुम्ही तो जोडीदाराला देणार का? लाइफस्टाइल मॅच होते का, ते तपासून पाहा.

व्यसन :
पाटीर्मधे ड्रिंक घेणं चालेल पण त्याची मर्यादा कुठपर्यंत? तसंच सिगारेट चालणार नसेल तर वेळीच स्पष्ट करा.

लाइफगोल :
करिअरला प्राधान्य देणार की घराला? तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, याची स्पष्ट कल्पना एकमेकांना द्या.

विवाहपूर्व तयारी :
यामधे काही प्रश्न स्वत:ला विचारा... जसे, लग्न करण्याची माझी मानसिक तयारी आहे का, घरच्यांच्या दबावाखाली तर मी लग्नाला तयार नाही ना, लग्नाकडून काय अपेक्षा आहेत, जोडीदाराचं राहणीमान कसं असावं, जोडीदाराला मित्र मैत्रिणी असतील तर चालेल का, दोन कुटुंबामधे आथिर्क, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक तफावत असल्यास तुमची तडजोडीची तयारी आहे का, जोडीदाराच्या वेगळ्या मताची दखल घेण्याची, त्याची कदर करण्याची तयारी आहे का, सासू म्हणजे सारख्या सूचना हा विचार मनातून काढून टाकून वेगळ्या नजरेने या नात्याकडे बघणार का, संसारात खोटेपणा वादळ निर्माण करतो हे माहीत आहे का, लग्नापूवीर् चूका घडल्या असल्यास त्या विसरण्याची तयारी आहे का आणि ते जोडीदाराला सांगण्याचं मनोधैर्य आहे का, वृद्धापकाळात जोडीदाराच्या आईवडिलांची जबाबदारी घ्यायला तुमची हरकत आहे का, वेळ पडल्यास जोडीदारांच्या आईवडिलांना पैशाची मदत करायची तयारी आहे का?

जोडीदार कसा निवडावा…..?
धर्म, जात, वय, उंची, शिक्षण, नोकरी, पगार याची चौकशी तर नेहमीच केली जाते पण, त्याचसोबत पुढील गोष्टीही पडताळून पाहाव्यात.
कौटुंबिक परिस्थिती, नवऱ्याचा पगार अधिक असला तरी त्याच्यावर इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत का, असल्यास त्या सांभाळण्याची आपली तयारी आहे का, संयुक्त कुटुंबात राहणार की वेगळं घर घेणार…..?
एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, अपेक्षा, विचार करण्याची पद्धती जाणून घ्या.
घरातलं वातावरण- स्वच्छता, राहणीमान, एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत योग्य वाटते का आणि ती जुळवून घेता येईल का? लग्नापूवीर् सासरच्या घरीही भेट द्या. जोडीदाराचे आई-वडील एकमेकांशी जसे वागतात तसंच, जोडीदाराच्या आपल्याकडून वागण्याच्या अपेक्षा असतात.

लग्नाआधीच्या भेटी :
लाइफस्टाइल, सवयी, व्यसन, प्रायोरिटीज (घर, करिअर, कुटुंब, मित्र, छंद), खाण्याच्या सवयी, स्वच्छता (आवड की अट्टाहास), सहजीवनाचं चित्रं, घरातले आथिर्क व्यवहार कोण पाहणार, नोकरी करणार का, घरातली कामं कोण करणार, घरातले निर्णय कोण घेणार (सासू-सासरे, नवरा, बायको)

मूल होऊ द्यायचं का आणि केव्हा…..?
सेक्सबद्दलची सायंटिफिक माहिती दोघांनाही आहे का?
ती करून घेण्यासाठी तज्ज्ञाकडे जाण्याची गरज आहे का?
शारीरिक किंवा मानसिक दोष, आजार आहे का?
लग्न, नातेसंबंध यावर एकमेकांचे विचार
ताण-तणावांना कसं सामोरं जाता

लग्नसोहळा कसा असावा, लग्नापूवीर् सर्व छान-छान :
याला कारण लग्नापूवीर्च्या अवास्तववादी कल्पना. चंदतारे तोडून देण्याच्या कवी कल्पना मागे पडून लग्नानंतर थेट वास्तवात उतरायला होतं. लग्नापूवीर् तुम्ही केवळ मित्र-मैत्रिणी असता. लग्न झालं की, आपापल्या घरातले संस्कार घेऊन नवरा -बायकोच्या भूमिकेत जाता. मग दोन्ही घरच्या सवयी, जडणघडणी एकमेकांवर आदळतात. त्यामुळे लग्नापूवीर् स्वत:चं आणि जोडीदाराचं असिस्टमेन्ट करायची गरज आहे. दोघांचे अनुभव इक्वली शेअर करा. लग्न तुटेल या भ्रामक समजुतीमुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका.

पुरुषांचा प्राधान्यक्रम - सेक्स, रोमान्स, सपोर्ट, सिक्युरिटी, लव.
स्त्रियांचा प्राधान्यक्रम - लव, केअरिंग, सिक्युरिटी, रोमान्स, सेक्स.


लग्न ठरल्यानंतर :
यामधे साधारण पाच ते सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा ठरतो. अर्थात, आपण त्या कालावधीचा कसा उपयोग करतो, तेही महत्त्वाचं आहे. लग्नाआधी जोडीदाराशी, त्याच्या कुटुंबियांशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. घराचं, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करायला हवं. आपण या वातावरणाशी तडजोड करू शकतो का, ते पाहा. ओळखीच्या नातेवाईकांकडून स्थळ आलं असलं तरी पूर्ण चौकशी करा, कारण तुम्हाला आयुष्याचा निर्णय घ्यायचा असतो. प्रत्यक्ष जाऊन बोलून खात्री करून घ्या. विवाह मंडळं, इंटरनेट यावरच्या माहितीला भुलू नका.

परदेशातलं स्थळ कसं पारखायचं :
आज परदेश हा काही फार दूरचा प्रदेश राहिलेला नाही. आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तिथे आजूबाजूला असतात, त्यांच्याकडून चौकशी करा. शिवाय कंपनीला मेल करून डेसिग्नेशन, पगार यांची तपासणी करता येईल. याची कल्पना त्यालाही द्या. जोडीदार घटस्फोटीत असेल तर, त्याचे डिवोर्स पेपर अवश्य पाहा. लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.

जरा इथे सर्वाधिक लक्ष द्या :

संसार दोघांचा आहे. दोघंही करिअरिस्टिक असल्यास घरातली कामं दोघांनाही करावी लागतील. कामाची हार्ड आणि फास्ट वाटणी होत नाही. सकाळच्या घाईच्या वेळी तसंच कामावरून घरी परतल्यावर दोघांनीही कीचनमधे एकत्र काम करण्यात मजा आहे.
घरात असताना प्रोफेशनचं कव्हर बाजूला काढून ठेवा आणि मोकळेपणाने वागा. दोघांमधे स्पर्धा नको. एकमेकांशी दिवसभरातल्या घटनांचं शेअरिंग करा. लिसनिंग कॅपॅसिटी वाढवा. एकमेकांचा मूड सांभाळा, कम्युनिकेशन वाढवा. आथिर्क व्यवहारामधे स्पष्टता असू दे. महिन्याचा खर्च सहमतीने करा. स्वत:साठी स्पेस असू दे. तुमच्या आवडी अवश्य जोपासा. जोडीदारालाही त्याच्या छंदांसाठी फ्रीडम द्या. प्रेम हे नजर, संवाद, गंध, चव, स्पर्श अशा सर्व जाणिवांमधून येतं. तू मला आवडतेस/आवडतोस हे एकमेकांच्या कृतीतून दिसू दे. घरात मोबाइलचा कमीत कमी उपयोग करा.


शुभमंगल सावधान :
शिक्षण आणि नोकरी तसंच पगारासंबंधी खोटी माहिती दिल्याचं बरेचदा लग्नानंतर लक्षात येतं. नंतर, फसवणूकीचा त्रास सहन करण्याऐवजी शैक्षणिक पदव्यांची सटिर्फिकेट्स आधीच पाहणं आवश्यक आहे. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करावी, यासाठी जोडीदाराला विश्वासात घ्या. घरात घडणारे छोटे मोठे वाद दोघांनीही आपापल्या आईजवळ नेऊ नये. त्यातून वाद अधिक चिघळतात. त्याचसोबत जोडीदाराचा अहंकार दुखावला जाईल, अशा पद्धतीने आई-वडलांकडून मदत घेणं मुलीनं टाळावं. समस्या सोडवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा, मात्र ती व्यक्ती दोघांच्याही नात्यातली नसावी. मॅरेज काउन्सिलरचं मार्गदर्शनही घेता येईल.

मित्रानो, लग्न कसे करावे - प्रेम विवाह की अरेंज विवाह - हा एक दुय्यम प्रश्न आहे, परंतु जोडीदार कसा असावा हे सर्वाधिक महत्वाचे आहे. आता तुम्ही सर्वानी ठरवायचे की, "जोडीदार निवडून - विवाह कसा करावा - जोडीदाराबरोबर संबंध - कसे ठेवावेत.....?
परंतु, जर कोणाला वाटत असेल की लग्न करून आपण खूप मोठी चुक करतो आहोत किंवा लग्न करण्यात काही दमच नाही आहे, त्यानी पुनछ सर्व गोष्टींचा नीट विचार करावा आणि नंतरच निर्णय घ्यावा. तुम्हा सर्वाना, माझ्यातर्फे मनोमन हार्दिक शुभेच्छा.....!

प्रेमविवाह....

'मला वाटले नव्हते तू असा/अशी निघेल', हे शब्द आहे एका प्रेमविवाह करनाऱ्या जोड्प्यांचा. हे असे काय अनपेक्षित घडले की एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे प्रेमी लग्न झाल्यानंतर निराश होतात? का नकोसा वाटतो एकमेकांचा सहवास? प्रेमविवाह की ठरवून केलेले लग्न यामध्ये कोण यशस्वी होते. हा एक वाद आहे. असे नाही की प्रेमविवाह हे सगळेच यशस्वी होतात. काही विफल ही होतात. तर चला आपण अवलोकन करुया की का प्रेमविवाह अयशस्वी होतात.
प्रेम करने आणि लग्न यात खुप फरक आहे. लग्न केले की रोज एकत्र रहाणे आलेच. आधी केलेले वादे सदैव पूर्ण होतात असे नाही. लग्नानंतर फिरने, मौजमज्जा करने याला थोड़े बंधन येतात. लग्नापूर्वी कित्येक वर्षे एकमेकांना ओळखणारी जोडपीही लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी एकमेकांच्या स्वभाव, आवडीनिवडींविषयी वाद घालताना दिसतात. अर्थात सगळ्याच वादांचे रूपांतर घटस्फोटात होते असे नाही. प्रेमविवाहात मात्र पहिल्यापासूनच "मी असा आहे' किंवा "मी अशी आहे, हे तुला माहीतच आहे,' अशा प्रकारे सुरवात होते. त्यामुळे जुळवून घेईपर्यंत थोडे जपून राहण्याऐवजी पहिल्यापासूनच चौफेर फलंदाजी सुरू होते.
कुटुंबाचा किंवा त्यातल्या कोणाचातरी त्या लग्नाला ठाम विरोध हा एक खुप मोठा गहन प्रश्न असतो. त्यात जर नवरा बायकोचे वाद झाला की तेल ओतायला यांना कोणी सांगायची गरज नसते. "बघ, तुला आधीच सांगत होतो, नको करूस म्हणून,' असा सूर लावतात. अशा वेळेला कुटुंबाची गरज असतानाही त्यांची मदत मिळत नाही. अर्थात यात महत्त्वाचा ठरतो, तो एकमेकांवरचा विश्वास. आता पहा काही भिन्न आर्थिक, सामाजिक परिस्थिती, वेगवेगळे धर्म, देश असलेली जोडपीदेखील अत्यंत यशस्वीरीत्या संसार करताना दिसतातच ना? या मागे असतो त्यांचा एकमेकांवरिल अतूट विश्वास. प्रेमविवाहात एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात, नाही तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणे म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं आपला हक्कच आहे, अस त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्यांचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो, आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार असतो. ‘मला काय वाटतं, हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही’, ‘असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही’, ‘माझ्या आई-वडिलांविषयी तु असं बोलतेस/बोलतोस?’ अशा उद्गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो. यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहुनही अधिक अपमान कसा करता येईल, याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा किंवा बायको वर्चस्व गाजवणारी असेल तर हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो, आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होतं. म्हणूनच पती-पत्नी एकमेकांना दुखावण्याचं आवर्जून टाळायला हवे आणि समजा, कधी दुखावलं तर आपला ’अहं’ बाजूला सारून जोडीदाराची माफी मागायला हवी.
प्रेमात पडलेल्या व्यक्तिंना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेचं प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघाच्याही भिन्न व्यक्तिमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या व्यक्तिमत्वांची खरी ओळख पटते, आणि मतभेदांना सुरुवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकतं. उदा. जोडप्यामधील एकजण बोलका, मनमिळावू सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा अबोल, दुसऱ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त न करणारा, त्यांच्याबद्द्लचे अपले प्रेम, जिव्हाळा न दाखवणारा असेल तर यामुळे त्या जोडप्यात मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरूध्द उत्साह, विश्वास विरूध्द संशय, अंतर्मुखता विरूध्द बहीर्मुखता वगैरे सारखे स्वभावविशेष विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात. पती-पत्नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशयी किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होतात.थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेऊन जर पती-पत्नींनी आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाहापुर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं.विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील.घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरून जावे लागणार नाही. म्हणूनच लग्नाआधीचे प्रेम असो वा नसो, ते लग्नानंतरही कायम राहिले म्हणजे झाले!

प्रेमविवाह ....

अनुप आणि सुमन एकमेकांसाठी अक्षरश: वेडे झाले होते! कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट झाली होती. एकमेकांना पाहताक्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मग काय, एकमेकांच्या डोळ्यांत पाहत मोठमोठी प्रेमपत्रं लिहिण्यात, एकमेकांसाठी उसासे टाकण्यात कॉलेजचे दिवस कसे भुर्रकन्‌ उडाले ते कळलंच नाही. यथावकाश दोघांनी लग्न केलं. सुरूवातीचे काही दिवस आपल्याच इंद्रधनुषी विश्र्वात गुरफटलेल्या या प्रेमीजीवांकडे पाहून कुणालाही हेवा वाटला असता.

पण हळुहळू आपल्या जोडीदाराकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले. एकमेकांचे दोष ठळकपणे दिसू लागले. आपला जोडीदार आपण समजतो तसा नाही हे समजू लागले. प्रेमाचे रंग उडून जाऊ लागले. मग दोघे एकमेकांवर चिडू लागले, रोज वादावादी, भांडणे अखेर घटस्फोटापर्यंत वेळ आली.


अनेक प्रेमविवाहांची अखेर शेवटी अनुप आणि सुमन यांच्यासारखी घटस्फोटातच होते. गंमत म्हणजे ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमाच्या आणाभाका घेऊन केलेली लग्ने अधिक प्रमाणात मोडतात, याची कारण काय असावीत?


अलीकडे प्रेमविवाह करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. चित्रपट, दूरदर्शन, कादंबया (उदा. मिल्स अँड बून) नाटके यातून प्रेमात आकंठ बुडालेले नायक - नायिका आणि त्यांचा राजा - राणीचा संसार पाहून अनेकांना आपणही प्रेमात पडावे आणि विवाह करून सुखी व्हावे असे वाटते.


खरे तर ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमविवाह अधिक टिकतात. अशी एक समजूत आहे. कारण ठरवून केलेल्या विवाहात एका अनोळखी माणसाबरोबर तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे त्याच्याबरोबर पटेल की नाही, अशी एक भीती मनात असते. प्रेमविवाहात आपल्या जोडीदाराला आपण पूर्वीपासून पूर्णपणे ओळखत असल्याचा एक भ्रम आपल्या मनात असतो. जेव्हा एकमेकांविषयीची खरी ओळख (म्हणजे लग्न झाल्यापासूनची) होऊ लागते.


एकमेकांकडे पाहून आकर्षित होण्याव्यतिरिक्त प्रेमात पडण्याची इतरही काही कारणं असतात. काही वेळा जोडीदाराला त्याच्या कुटुंबियांकडून प्रेम, जिव्हाळा मिळालला नसतो. अशावेळी त्याला किंवा तिला आपल्या प्रोत्साहन द्यावे अशी एक जबरदस्त इच्छा जोडीदाराच्या मनात असते.


एखाद्या व्यक्तीला स्वत:विषयी विश्र्वास नसतो. कधी कधी त्या व्यक्तीच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड असतो. अशा वेळी आपल्या प्रेमात कुणी पडले आहे ही भावनाच त्याला अथवा तिला उत्तेजित करणारी असते आणि मग अशा व्यक्ती सहज प्रेमात पडतात.


आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडते, त्यावेळी अनेकजन प्रेमात पडतात. पालकांचा मृत्यू, एखादा गंभीर आजार, नोकरीधंद्यात आलेले अपयश, कौटुंबिक समस्या वगैरे, अशी प्रेमात पडण्याची काही कारणे आहेत.


स्त्री जेव्हा समोरच्या पुरूषात आपल्या पित्याला आणि पुरूष समोरच्या स्त्रीत आपल्या आईला पाहतो तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एखादीचा पिता कुटुंबात वर्चस्व गाजवणारा, आक्रमक आणि चंचल वृत्तीचा असे तर असे स्वभाव विशेष असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. अर्थात प्रेमात पडणारे कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीच्या प्रेमात ठरवून पडत नाही, तर त्याच्या नकळतच हे घडत असतं.


प्रेमविवाह मोडण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचं आणि सर्वत्र आढळून येणारं कारण म्हणजे प्रेमात पडलेलं जोडपं आपल्या जोडीदाराविषयी भलभलत्या कल्पना बांधून असतं. त्याच्याकडून ती अवास्तव अपेक्षा ठेवते. वास्तवतेची जाणीव ते ठेवत नाहीत. प्रेमात पडलेल्या व्यक्ती नेहमीच एकमेकांना आपल्या उत्कृष्ट वागणुकीनं प्रभावित करण्याचा प्रयत्‍न करीत असतात. आपली चांगली बाजू दाखवण्याचा ते जाणूनबुजून प्रयत्‍न करतात. दिसण्यात, पेहरावात, बोलण्यात, आपण चांगले कसे दिसू याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं.


सुरुवातीच्या काळात हे चित्र अल्हाददायक असतं. आपल्या जोडीदाराचे दोष, अवगुण याच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. आता बी. सिंगचंच उदाहरण पहा. तो मद्यपी, अतिशय भावनाशील आणि रागीट आहे. त्याच्या पत्‍नीला लग्नापूर्वी याचे हे सगळे स्वभावदोष माहीत होते. त्यांच्या सकटच तिनं त्याला स्विकारलं होतं.


लग्नानंतर तो हळुहळू सुधारेल अशी तिची अपेक्षा होती आणि त्यानंही तिला आपण नक्‍की सुधारु अस अश्वासन दिलं होतं. पण बी. सिंगला सुधारायचं नव्हतं. लग्नानंतर आपली बायको हळुहळू ऍडजस्ट करायला शिकेल, अस त्याला वाटत होतं. लग्नानंतर असे मतभेद वादावादीला कारणीभूत ठरतात. आणि त्याची परिणती अखेर घटस्फोटात होण्याची शक्यता असते. म्हणूनच लग्नापुर्वीच आपल्या विषयीची सर्व माहिती मोकळेपणी जोडीदाराला सांगणं आवश्यक ठरतं. म्हणून आपन कसे आहोत, आपल्या आवडी-नावडी, स्वभाव या सगळ्याविषयी आपल्या जोडीदाराला मोकळेपणी सांगा.


प्रेमविवाह मोडण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा जोडपी एकमेकांना गृहीत धरतात. आपण काही बोलल्याशिवाय आपल्या जोडीदारानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे, अशी त्यांची काहीशी अपेक्षा असते. अनेक वेळा आपण नवरोजींची आपल्या बायकोविषयीची शेरेबाजी ऐकतो. ’आम्ही एकमेकांना इतकी वर्षे ओळखतो, आतापर्यंत तिला माझ्या आवडी - निवडी माहीत व्हायला हव्यात. मी ऑफिसमधून उशिरा घरी आलो तर तिनं ते समजून घ्यायला हवं, मी तिच्यावर अजून प्रेम करतो, हे तिला समजायला हवं’ ही किंवा अशीच शेरेबाजी. मात्र नवरोजी ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की दुसऱ्यान मन ओळखण्याची कला प्रत्येकाकडे असतेच असे नाही.


एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात, प्रेमविवाहात तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणे म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं आपला हक्‍कच आहे, अस त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्यांचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो, आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार असतो. ‘मला काय वाटतं, हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही’, ‘असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही’, ‘माझ्या आई-वडिलांविषयी तु असं बोलतेस/बोलतोस?’ अशा उद्‍गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो.


यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहुनही अधिक अपमान कसा करता येईल, याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा किंवा बायको वर्चस्व गाजवणारी असेल तर हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो, आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होतं. म्हणूनच पती-पत्‍नी एकमेकांना दुखावण्याचं आवर्जून टाळायला हवे आणि समजा, कधी दुखावलं तर आपला ’अहं’ बाजूला सारून जोडीदाराची माफी मागायला हवी.


प्रेमात पडलेल्या व्यक्तिंना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेचं प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघाच्याही भिन्न व्यक्तिमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या व्यक्तिमत्वांची खरी ओळख पटते, आणि मतभेदांना सुरुवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकतं. उदा. जोडप्यामधील एकजण बोलका, मनमिळावू सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा भिडू अबोल, दुसऱ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त न करणारा, त्यांच्याबद्‍द्लचे अपले प्रेम, जिव्हाळा न दाखवणारा असेल तर यामुळे त्या जोडप्यात मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरूध्द उत्साह, विश्वास विरूध्द संशय अंतर्मुखता विरूध्द बहीर्मुखता वगैरे सारखे स्वभावविशेष विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात. पती - पत्‍नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशयी किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होतात.


थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेऊन जर पती - पत्‍नींनी आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाहापुर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं. विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील. घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरून जावे लागणार नाही.

प्रेम म्हणजे काय

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.

एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.

अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?

प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?

ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.


प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.

प्रिये,
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.

खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.

थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.
खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.

आणि शेवटी....
ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.

तुझ्या व माझ्या मनाची ही नि:शब्द भाषा..

आज बर्‍याच दिवसांमध्ये तुझ्याशी बोलणे झाले. कॉलेजमध्ये असताना तुझ्या समोर कधीही मी बोलू शकलो नव्हतो. ते दिवसच वेगळे होते. तिथे फक्त शब्दांची आणि मनांची भाषा चालायची.

आपल्या समोर कोण आहे, ते काय बोलतात, याचे साधे भानही मनाला नसत. तुझ्या काळ्याशार डोळ्यातून काहीतरी बाहेर येतय असं नेहमी वाटायचं. तुही मग हळूवार तुझ्या पापण्‍यांना मिटत माझ्या डोळ्यांना होकार द्यायचीस.

ते दिवस विसरणंच अशक्य आहे. त्या शब्दांचा अर्थ कळायलाही मला बरेच दिवस लागले. बॉटनी, केमेस्ट्री हे विषय नेहमीच मला लवकर समजत. मॅथ इतरांना थकवत तर मीही त्याच्याशी दोन हात करत सारे कोडे उलगडवायचो. या सार्‍या प्रकारात ही भाषा अर्थात डोळ्यांची भाषा शिकायचं कुठेतरी राहुन गेलं.

मनाला हे सारं समजत असेल का? मग आपल्याला का हे उमजत नाही? असे असंख्‍य प्रश्‍न मनाला भेडसवायचे. आज मला या भाषेचे ज्ञान झाले आहे.

तुझ्या व माझ्या मनाची ही नि:शब्द भाषा आज एखाद्या फुलाप्रमाणे उमलत आहे. खरंच किती वेगळी असतेना ही भाषा.

आपला फारसा संबंध नसतानाही आपल्याला एकमेकांडे आकर्षित करते. आपल्याला एकमेकांकडे खेचते. कितीही कंटाळा आला, बोर झालं तरी वेडं मन एका जागेवरुन उठण्‍यास तयारच नसतं. आता दिसेल ती, थोडावेळ थांब, इतकी काय घाई, पुढच्या बसने जाता येईल, आईला काहीतरी सांगू. वाण्‍याचे दुकान बंद होते, नाही आणता आले सामान, लाईट बिलासाठी मोठी रांग होती, नाही भरता आलं बिल, उद्या भरतो बाबा. अशी अनेक कारणं सांगता येतील. पण मनाचं काय? त्याला कसं समजवांयचं?

तिकडून कोण येणार ते आपल्या फारसे ओळखीचे नाही. आई, बाबांसाठी खोटं का बोलायचं? असं समजावलं तरी मन एकायला तयार होत नाही. कारण त्याला ती भाषाच कळत नसते. समोर येणारी व्यक्ती, तिचे मन आपल्याला काही तरी सांगणार आहे, आपल्याला ते बिल, सामान या सार्‍यांपेक्षा महत्वाचे आहे, हेच ते मन सांगत असते.

माझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले.

श्रावणातली पहाट.. गारवा अंगाला झोंबतोय, चहाच्या कपावरची वाफ त्या गारव्याशी सलगी करण्‍याचा प्रयत्न करतेय, पावसाच्या सरी मधेच थेंब-थेंबात घसरत तुझी आठवण करुन देत आहेत. आणि या अशा मोहक वातावरणात तु माझ्यापासून कोसो दूर आहेस.

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आपल्या भेटीची आठवण करुन देतो. तुझ्या डोळ्यांची भाषा मला कधीच उमगली नव्हती आणि यामुढेही मला त्यांचे शब्द कळणार नाहीत, पण तुझ्या मनाचा माझ्या मनाशी सुरु असलेला संवाद आजही सुरु असतोच.

माझे मन एकटेच तिकडे दूर-दूर डोकावत असते. त्याला नेमके कोण हवे असते, ते सांगायची त्याची तयारी नसते, पण त्याचा शोध मात्र अविरतपणे सुरु असतो.

मी त्याला अनेकदा रोखण्‍याचा प्रयत्न केला, परंतु माझी बंधनं झुगारत ते तुला शोधत फिरत असते. तुझी चाहुल जरी लागली तरी ते मला तिकडे तुझ्याकडे खेचते.

त्याला वेळेचे भान नाही, त्याला पावसाची जाण नाही, त्याला गारवाही बोचत नाही, आणि निनावी चालणार्‍या माझ्या मनाला रस्त्यांवरचे खडेही टोचत नाहीत. त्याला फक्त आस असते, ती तुझ्या मनाची.

पावसाचे थेंब दोनही हातांच्या ओंजळीत पकडत माझे मन तुला शोधत असते. हातात जमलेले पाणी त्याला तुझ्या पाणीदार डोळ्यातील थेंब वाटतात. पाऊस संपल्यावर माझे मन मग त्याच पाण्यात रंग मिसळत उगाच कॅनव्हॉसवर तुझा चेहरा रेखाटण्‍याचा प्रयत्न करते.

रंगांनाही आता त्या पाण्याची सवय झालीय, दुसरं पाणी टाकलं की चित्र बिघडतं. पांढर्‍या कॅनव्हॉसवर पाण्याचा रंगही मग काळा वाटू लागतो.

जरी तू दूर असलीस तरी ‘माझे मन आता तुझे झाले आहे’ माझा प्राण, तुझा प्राण या ओळी आठवतात आणि कितीतरी वेळ मन तेच गाणे गुणगुणते.

माझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले.
माझा प्राण, तुझा प्राण
नाही आता वेगळाले....

त्‍याच्‍या जीवनसाथीच....!

शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्‍याकाळी टॉर्च आणि धनुष्‍यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्‍याला आदिवासी वस्‍तीच्‍या जवळच्‍या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्‍या कडेला हरण उभे होते. त्‍या हरणावर त्‍याने नेम धरला आणि बाण सोडणार तोच तो थबकला. त्‍याने पुन्‍हा त्‍या हरणाच्‍या डोळयात पाहिले आणि त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण निखळला...

गेले सहा दिवस तो सतत तिथं यायचा शिकारीला निघाला की ते हरण त्‍याला तिथंच उभं असलेलं दिसायचं. तो रोज त्‍या हरणावर लक्ष केंद्रीत करून नेम धरायचा आणि त्‍याच्‍या डोळ्यांतला करुण भाव पाहून त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण निखळायचा. हे असं का घडतयं या विचारानं त्‍याला अस्‍वस्‍थ केलं होतं.

त्‍यानं ठर‍वलं आणि त्‍या जंगलातल्‍या एका थोराड आदिवासी गृहस्‍थाला त्‍यानं विचारलं. त्‍याला सांगितलं की ते हरण रोज तिथं येत आणि तो त्‍याच्‍यावर नेम धरूनही बाण चालवू का शकत नाही.

तो वृध्‍द म्‍हणाला, खरं सांगू हे हरीण रोज आम्‍ही वाजत असलेला ढोल ऐकण्‍यासाठी इथं येतं. वा-याचा आवाज झाला तरीही घाबरून पळून जाणारे भित्रे हरीण ढोल ऐकायला येत हे काही त्‍याला पटलं नाही. त्‍यानं पुन्‍हा विचारलं. हे कसं शक्‍य आहे, हरणासारख्‍या भित्र्या प्राण्‍याने इतकं साहस करणं शक्‍यच नाही. त्‍याच्‍या डोळ्यात तो करूण भाव का असतो, की जो पाहताच शिका-याच्‍या हातातलं धनुष्‍यबाण खाली पडतो. त्‍याची गोंधळलेली अवस्‍था पाहताच तो वृध्‍द म्‍हणाला, ते हरीण इथं येतं आम्‍ही वाजवत असलेला ढोल पाहण्‍यासाठीच. त्‍याच्‍यातल्‍या त्‍या साहस आणि आणि डोळयातल्‍या कारुण्‍याचं कारण एकच आहे... या ढोलावरच कातडं आहे त्‍याच्‍या जीवनसाथीच....!

सोहनी-महिवालच्या प्रेमाची कहाणी

पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्‍याच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतले. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांच्या प्रेमाची कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे.

इज्जत बेगला फिरण्याचा खूप शौक. त्याने आपल्या वडिलांची परवानगी घेऊन देश फिरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एके ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्व काही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव महिवाल पडले. महिवाल अतिशय सुंदर होता. महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.


पण सोहनीच्या आईला ही बाब कळली तेव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्यावरील प्रेमाखातीर जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात जाऊन सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न इतर कुणाशी तरी करून देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.

इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सोहनीला पाठवली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवालने साधूचा वेष धारण करून सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करून महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासंतास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकरातूर सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला आपल्या बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली.


सकाळी मच्छिमारांनी माशांसाठी जाळे टाकले, त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी व महिवालचे परस्परांना बाहूपाशांत घेतलेले मृतदेह मिळाले. गावकर्‍यांनी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी व मुस्लिम लोक मजार म्हणतात.

अर्थात असे असले तरी प्रेम हे प्रेमच असते त्याला धर्म, जातीचे बंधन नसते, हेच खरे.

नल-दमयंती..निःसीम प्रेम.....

विदर्भ देशाचा राजा भीमाची मुलगी दमयंती आणि निषध देशाचा राजा वीरसेन यांचा मुलगा नल हे दोघेही रूपवान होते. ते दोघेही एकमेकांना न पाहता केवळ प्रशंसा ऐकूनच एकमेकांवर प्रेम करायला लागले. राजा भीमाने दमयंतीच्या स्वयंवर सोहळ्याचे आयोजन केले. त्यात इंद्र, वरुण, अग्नी व यम आदी अनेक देवतांना आमंत्रीत केले. दमयंतीशी विवाह करण्यास देवादिकांसह अनेक जण उत्सुक होते. चारही देव स्वयंवरामध्ये नल राजाचे रूप धारण करून आल्याने पाचही जण नलासारखे दिसत असल्याने दमयंती गोंधळली. मात्र तिचा प्रेमावर इतका विश्वास होता की तिने देवाकडून वरदान मागून नलाला ओळखून त्याची पती म्हणून निवड केली.

नल-दमयंती हे निःसीम प्रेमाच्या बळावर एकत्र आले खरे. मात्र काही काळ गेल्यानंतर त्यांच्यावरही विभक्त होण्याची वेळ आली. नल त्याचा भाऊ पुष्कराकडून सारीपाटाच्या खेळात आपले सर्वस्व हरवून बसला. त्यामुळे पुढे ताटातूट झाली. दमयंती एका राजघरण्‍याच्‍या मदतीने तिच्या माहेरी पोचली. दमयंतीचे वडील राजा भीम यांनी नलाला शोध घेण्याच्या उद़देशने दमयंतीच्या दुस-या स्वयंवराची घोषणा केली.

दरम्यानच्या काळात दमयंतीपासून ताटातूट झालेल्या नलाला कर्कोटक नावाच्या विषारी नागाने दंश केल्याने त्याचा रंग काळा पडला. तो पूर्णता कुरूप झाला. त्यामुळे नलाला बाहुक नावाचा सारथी म्हणून विदर्भात पोचला. आपल्या प्रियकरास ओळखणे दमयंतीस काही कठीण नव्हते. तिने नलाला सहज ओळखले. त्याने त्याचा भाऊ पुष्करासोबत पुन्हा सारिपाट खेळून त्याला पराभूत करून आपले गमावलेले सर्वस्व परत मिळविले.

दमयंती केवळ रूपानेच सुंदर नव्हती तर ती मनानेही तितकीच सुंदर होती. तिने आपल्या प्रेमाच्या बळावर पतीला ओळखून पुन्हा प्राप्त केले. इतकेच नव्हे तर त्याने जे-जे गमावले. तेही त्याला पुन्हा मिळवून दिले.

दमयंतीला नलापासून देवच काय कुणीही हिरावून घेऊ शकले नाही. तिचे नलावर असलेले निःसीम प्रेम व त्याच्या विषयी असलेली निष्ठा यामुळे ही प्रेमकथा आजही अजरामर आहे.

लैला आणि मजनू.....प्रेमकहाणी

प्रेम असा विषय निघाला की लैला आणि मजनू ही नावं आली नाही तर नवल. एवढा या नावाचा आणि प्रेमाचा संबंध आहे. किंबहूना प्रेम कसं हवं तर लैला मजनूसारखं असा प्रेमाचा निकषही ठरला आहे. पण हे लैला मजनू नेमके होते कोण? त्यांची प्रेमकहाणी नेमकी आहे तरी काय? हे बर्‍याचदा माहित नसतं. त्या अमर प्रेमाचीच ही कथा.

अरबस्तानातील अब्जोपती शाह अमारीचा मुलगा कॅसला लहानपणापासूनच इश्काचा स्पर्श झालेला. एका ज्योतिषाने त्याला पाहताक्षणी सांगितलं याच्या आयुष्यात प्रेमाला फार महत्त्व आहे. त्यासाठी तो काहीही करेल. ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरावी यासाठी शाह अमारीने खूप प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थ ठरले.

पुढे एकदा दमास्कसमध्ये मदरशात शिकण्यासाठी गेलेल्या मजनूने नाजदच्या शहाची मुलगील लैलाला पाहिलं आणि बेटा पहिल्या कटाक्षात घायाळ झाला. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. मौलवीने त्याला प्रेम बिम झूठ असल्याचं सांगून त्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं सांगतिलं. पण प्रेमात आकंठ बुडालेला कैस ऐकायला कसा तयार होईल? त्याच रोगाची लागण लैलालाही झाली. पुढे याची परिणती लैलाला घरात कोंडून ठेवण्यात झाली. लैलाचा विरह कॅसला सहन होईना. तो वेड्यासारखा भटकू लागला. त्याचे हे प्रेम पाहून लोकांनी त्याला मजनू म्हणायला सुरवात केली. ते नाव आजही टिकून आहे. प्रेम या शब्दाला मजनू हा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो, यातच काय ते आले.

लैला व मजनू यांना वेगळे करण्याचे खूप प्रयत्न झाले. पण निष्फळ ठरले. लैलाचे बख्त नावाच्या व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. पण तिने नवर्‍याला आपण फक्त मजनूचे आहोत, असे स्पष्ट सांगितले. त्याच्याशिवाय आपल्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही, असे सांगितले. बख्तने तिला तलाक दिला. आता मजनूच्या प्रेमाने वेडी झालेली लैला त्याच्या शोधात जंगलात फिरू लागली. अखेरीस तिला मजनू मिळाला तेव्हा दोघेही प्रेमपाशात बद्ध झाले. पण लैलाच्या आईने त्यांना वेगळे केले आणि लैलाला ती घरी घेऊन गेली.

विरहाच्या दुःखानेच लैलाचा मृत्यू झाला. लैलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर मजनूचेही प्राणपाखरू उडून गेले. त्याच्यानंतर त्या दोघांच्या प्रेमाची खोली लोकांना कळून आली. अखेर त्या दोघांना जवळ जवळ दफन करण्यात आले. मात्र त्यांना दफन केले तरी त्यांच्या प्रेमाची कहाणी मात्र अमर झाली आहे.

अधुरी एक कहाणी...

अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू यांची प्रेमकहाणी फार कमी जणांना माहिती आहे. अँड्र्यू हे अतिशय शांत स्वभावाचे पण झुंझार व्यक्तिमत्वाचे होते. प्रतिकूल परिस्थितीतही शांतपणे पण लढाऊ बाण्याने मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव होता. यामुळेच अनेकदा ते टीकेचीही धनी ठरले.
एकदा त्यांची भेट रॅचेल रॉबर्ट्सशी झाली. दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले. मग दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला. पण अँड्र्यू यांचे नशीब नेहमी वेळेवर दगा द्यायचे. कोणतीही गोष्ट त्यांना वेळेवर आणि सरळसोटपणे मिळाली नाही. यावेळीही अगदी तसेच झाले. रॅचेलचा तिच्या पहिल्या पतीशी घटस्फोट झालेला नव्हता. हा घटस्फोट होऊनच जाईल, असे समजून अँड्र्यू यांनी तिच्याशी लग्न केले. पण रॅचेलला घटस्फोट मिळाला नाही. शेवटी हा घटस्फोट मिळवल्यानंतर पुन्हा एकदा अँड्र्यू यांच्याशी लग्न करण्याचा एकमेव पर्याय तिच्यासमोर उरला.

पण खूप प्रयत्नानंतरही हे शक्य झाले नाही. त्यातच अँड्र्यू यांच्या राजकीय विरोधकांनी या घटनेचे खूप भांडवल केले. रॅचेललाही बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. एवढ्या विरोधानंतरही अँड्र्यू आणि रॅचेल एकत्र येऊ शकले नाहीत. अँड्र्यू यांच्या प्रेमाचा विरह सहन न होऊन रॅचेलने मरणाला कवटाळले. तिच्या मृत्यूनंतर अँड्र्यू यांनी पुन्हा लग्न केले नाही. उर्वरित सगळे आयुष्य त्यांनी रॅचेलच्या आठवणीतच काढले.

प्रेमवेड्यांची ही कथा


आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दोन चिनी प्रेमवेड्यांची ही कथा आहे. रूढ नितीनियमांच्या पलीकडे जाऊन हे प्रेमी युगल परस्परांजवळ आले आणि एकमेकांना साथ दिली.

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू चाओजिनच्या.तिला पाहिले आणि तो तिला हृदय देऊन बसला.

दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी पालकांना विचारणा केली. परंतु, होकार तर दूरच पण चहूबाजूंनी विरोधच झाला. शूचेही लुईवर निस्वार्थ प्रेम होते. त्या दोघांनी आपापल्या पालकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. रहाण्यासाठी त्यांनी चीनच्या दक्षिण भागातील एका गुहेत आसरा घेतला.

शूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली. तब्बल पन्नास वर्षे त्याने पायऱ्या खोदण्यात घालवली. आपल्या प्रिय पत्नीला डोंगर चढायला त्रास होऊ नये म्हणून तब्बल 6 हजार पायर्‍या त्याने स्वतः कोरल्या. आजही त्या डोंगरावर त्या पायऱ्या या प्रेमी युगलाची आठवण करून देतात.
love teps
WDWD


एके दिवशी शेतातून घर आल्यानंतर लुई अचानक बेशुध्द पडला. त्याच्या जीवनाचे हे शेवटचे क्षण होते. त्याचा हात त्याची पत्नी शूच्या हातात होता. शू त्याला पाहून सारखी रडत होती. लुईने हसत हसत तिचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला तो निघून गेला. शूचे अश्रू थांबत नव्हते. त्याच्या विरहात तीही नंतर हे जग सोडून गेली.
  शूचे वय लुईपेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. त्यामुळे रोज उंच डोंगर चढायला शूची दमछाक होत होती. याची जाणीव लुईला होती. त्यामुळे त्याने डोंगरावर आल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच डोंगराला पायर्‍या कोरायला सुरवात केली....      


त्यांच्या पायऱ्या मात्र त्या डोंगरात तशाच होत्या. 2001 मध्ये या पायर्‍यांकडे सामजिक कार्य करणार्‍या एका संस्थेचे लक्ष गेले. या पायर्‍या एका व्यक्तीने पन्नास वर्षे खपून हाताने कोरल्या आहेत यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. नंतर वर्ष 2006 मध्ये 'चायनीज वुमन वीकली'ने त्यांच्या प्रेमकथेचा समावेश चीनमधील सर्वश्रेष्ठ 10 प्रेमकथामध्ये केला. चीनच्या सरकारने या 'प्रेमाच्या पायर्‍या'आजही जतन करून ठेवल्या आहेत. ज्या गुहेत हे प्रेमी युगल रहात होते, त्याचे म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे. आजही अनेक प्रेमी युगल या स्मारकाला भेट देण्यासाठी येत असतात.

माझ्या डोळ्यांची काळजी घे.

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.
आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरच न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

ह्यात एकच समाधानाची बाब
म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा,
तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.
मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.
तिने कित्येक वेळेस त्याला म्हटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवटपर्यंत साथ दिली असती."
आणि अचानक एके दिवशी चमत्कार झाला.
कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.
शेवटी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिला दिसू लागले.
सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.
त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.
तो चक्क आंधळा होता.
तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"
तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.
त्याने काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.
तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."

ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली.

प्रेम केलं आहे निभावण्यासाठी...


'मी बी.कॉम आहे आणि तो दहावी नापास. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तो शिकलेला नाही याचं मला काही वाटत नाही. तो त्याच्या कामात चोख आहे. चांगले पैसे कमावतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खूप चांगला आहे. त्याच्या घरात आमच्या प्रेमाबद्दल माहीत आहे; पण पाठिंबा नाही. माझ्या घरचे तयार आहेत, पण तो त्याच्या घरच्यांना समजावून देऊ शकत नाहीये. याचा सगळ्याचा माझ्यावर प्रचंड ताण येतो आहे. सगळ्या कॉलनीला आणि नातेवाईकांमध्ये आमच्या प्रेमाबद्दल माहीत आहे. त्याच्याशी लग्न झालं नाही तर मी काय करू? इतर कुणाचा विचार मी नाही करू शकणार. काय करावं काहीच सुचत नाहीये. हा ताण आता सोसवत नाही. घरातून पळून जाण्याचा विचार मनात येतो. पण आईला सोडून कसं जाऊ? सगळीकडूनच कोंडी झालेली आहे.'

- सुनीताच्या पत्रातून तिची अस्वस्थता जाणवत होती.
प्रेमाची भानगड जोवर घरात माहीत नसते तोवर सगळं ठीक असतं. पण ज्या क्षणी घरच्यांना या सगळ्याबद्दल माहीत होतं खऱ्या अर्थानं गुंते वाढत जातात. आता सुनीताच्या बाबतीतच बोलायचं झालं तर सगळ्या गावाला तिच्या प्रेमाबद्दल माहीत आहे. त्यामुळे त्याच्याशी लग्न झालं नाही तर लोकं काय म्हणतील ही भीती तिला आणि तिच्या घरच्यांना वाटते आहे. त्यांची भीती अगदीच रास्त आहे. लहान गावात विशेषत: अशा वेळी लोकं वाट्टेल ते बोलायला मागेपुढे बघत नाहीत. पण लोकांचा विचार कुठवर करायचा हेही ज्यानं त्यानं ठरवायला पाहिजे. उद्या समजा दुर्दैवानं सुनीताचं लग्न त्या मुलाशी होऊ शकलं नाही तरी त्यामुळे काही जगणं संपत नाही. आयुष्यातला एक दुर्दैवी कालखंड असं समजून पान उलटून पुढे जाता यायलाच पाहिजे. पण अशा परिस्थितीत आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक असतं. सुनीताच्या बाबतीच तिच्या मित्राने त्याच्या आईबाबांशी स्वत:च्या प्रेमाबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. नुसती चर्चा करून थांबून चालणार नाही तर स्वत:च्या मतावर तो ठाम आहे हेही त्याने त्याच्या आणि तिच्या आईबाबांपर्यंत पोचवायला पाहिजे.
सुनीताच्या पत्राचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात विचार करायचा म्हटला तरीही ज्यावेळी असे अवघड प्रसंग येतात, प्रेमाची परीक्षा बघणारा काळ असतो त्यावेळी त्याने आणि तिने एकमेकांचा आधार बनणं, एकमेकांना मानसिक ताकद देणं आणि एकमेकांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण ही लढाई आहे जी आपल्याच घरातल्या माणसांबरोबर लढायची असते. आणि म्हणूनच ही लढाई सगळ्यात अवघड असते. अशा वेळी त्याने आणि तिने सर्वार्धानं एकमेकांची साथ दिली नाही आणि त्यांच्यातला कुणीतरी एक जण जर एकटा पडला तर त्याच्या मनात सुनीताच्या मनात उभे राहतायेत तसले प्रश्न उभे राहतात. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायला अशा वेळी तुम्ही मानसिक अर्थाने असमर्थ असता.
प्रश्न कितीही जटिल असले, समस्या कितीही मोठी असली तरी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढता येऊ शकतो. गरज असते ती एकमेकांची सोबत करण्याची. एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची !
प्रेममंत्र
१) प्रेम केलं आहे निभावण्यासाठी.. हे एकदा मनाशी पक्कं ठरवा म्हणजे मग कुठल्याही समस्येला तोंड देताना पाय डगमगणार नाही.
२) शेवटच्या क्षणापर्यंत समस्येतून बाहेर पडण्याचा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
३) प्रश्न सुटणार नाही असं वाटलं, आणि प्रेम भावनेपेक्षा कुटुंबाच्या सुखदु:खाचा विचार करून प्रेमभंग करण्याचा निर्णय घेतलात तरी त्या नैराश्यातून चटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
४) प्रेम हे आयुष्य असलं तरी प्रेमभंगाने जगणं कधीच थांबत नसतं. तसं ते थांबू नये. त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाची जबाबदारी उचलायची तयारी ठेवा. आणि त्या निर्णयाच्या बऱ्या - वाईट परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा.

प्रेमाचा अंकुर- न जाने कब प्यार हो जाता है !

किशोरावस्थेतून आपण तारूण्यात पदार्पण करतो त्यावेळी जगातील सगळ्या गोष्ट बदललेल्या जाणवू लागतात. जग किती सुंदर आहे, याचा अनुभव येतो. तारूण्य जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देत असते. तारूण्यात तिला 'तो' आणि त्याला 'ती' आवडते अन् पहिल्यात नजरेतच हृदयात प्रेमाचा अंकुर फुलतो.

'प्रेम' काय आहे, हे तेव्हा त्या दोघांनीही कळत नाही. 'प्रेम' ही संकल्पनाच रहस्यमयी आहे. त्यावर मिर्झा गालिब साहेब लिहितात...' इस इश्क के कायदे भी अजब है गालिब, करो तो बेहाल है, न करो तो बेहाल!' 'प्रेम' या अडीच अक्षराच्या शब्दाने फार मोठा इतिहास घडवला आहे. लैला- मजनू, हिर-रांझा, रोमिओ- ज्युलिएट हे इतिहासातील प्रेमी युगल म्हणूनच अजरामर झाले आहेत. 'प्रेम' ही अशी भावना आहे की, तिचा परिणाम हळूहळू जाणवतो. काही जणांच्या मते, पहिल्या नजरेतच प्रेम व्यक्त होते. प्रेमाचा बाण क्षणात 'तिच्या' किंवा 'त्याच्या' हृदयाला छेदतो.
love station

'यह मोहब्बत का तीर है प्यारो, जिगर के पार हो जाता है...पता भी नही चलता, न जाने कब प्यार हो जाता है !' जगाने प्रेमाला कितीही विरोध केला तरी आम्ही त्याच्याविरूध्द नाही, असे तरूण-तरूणी म्हणतात. पहिल्याच नजरेत होणारे प्रेम दोन्ही बाजूला आग लावणारे असते. परंतु, ही आग दोन जीवांना एकत्र आणते. या आगीतच प्रेमी युगल प्रेमात पार बुडून जातात. दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांना अबोध मनाच्या कप्प्यात संपूर्ण आयुष्याची शिदोरी म्हणून बांधून ठेवतात. 'प्रेम' हे परमेश्वराचेच रूप आहे. परंतु, या प्रेमाचा अतिरेक होऊ नका. कारण प्रेम हे आयुष्य घडवतं आणि बिघडवतंही.

पहिल्या नजरेत होणार्‍या प्रेमात महत्त्वाचे म्हणजे टायमिंग आहे. पहिल्या नजरेत होणारे प्रेम ओळखायला फार कठीण असते. केवळ 'तिने' किंवा 'त्याने' आपल्याकडे पाहिले, म्हणजे 'प्रेम' झाले असे नाही तर प्रेमाच्या नजरेला ओळखण्याची कला, दृष्टी आपल्याकडे असणे आवश्यक असते. ही दृष्टी तारूण्याच्या उंबरठ्यावर परमेश्वराकडून मिळालेली अपूर्व भेट आहे. पहिल्या नजरेत 'तिला' किंवा 'त्याला' पाहिल्यानंतर हृदयात तार झंकारली गेली पाहिजे. प्रेमाच्या तरंग लहरी संपूर्ण अंगावरून गेल्या पाहिजेत. अशी प्रेमाच्या भावनेची जाणीव पहिल्या नजरेत झाली पाहिजे.....

Thursday, July 28, 2011

आठवेन मी तुला..

आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,

तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,

दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,

तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,

तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,

तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,

तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,

दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात

तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,

आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी


तुला..
असाच आहे मी

भेटीचा हर्ष...

छान एका बागेत भेटण्याचे ठरले.
मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता
नाक मुरडले.
जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती
आज चक्क सलवार घालून आली होती
बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती
अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले
तू कुठे गेला होतास?रागातच तिचे विचारणे
आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास
कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास
चल बसुया आत
भलताच दिसतोय वेगात
तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या
डोळ्यावर भिरकावत विचारले......
तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?
हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण
असा कसा रे तू अनरोमांटिक
अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक
रागाने उठून गेली ती तरातरा
मीही तिच्या मागे गेलो भराभरा
हातात घेउनी तिचा हात
म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज
कसला चढलाय तुझ्या रुपाला साज
बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......
आवडते मला तुझे रागावणे
काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे
नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे
देशील का मला माझे हवे ते मागणे
काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे
मला हवे आहे तुझ्या ओठांचे तराणे
गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे
हवा आहे तुझा मखमली स्पर्श
वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष
लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली
तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली
चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली
रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली

आनंदवनभुवनी

आनंदवनभुवनी

जन्म दु:खे जरा दुखे |नित्य दुखे पुन्ह्पुन्हा |
ससार त्यागणे |आनंदवनभुवना ||
वेधले चित्त जाणावे |रामवेधी निरंतरी |
रागे हो वीतरागे हो |आनंदवनभुवना ||
संसार वोढीता दुखे |ज्याचे त्यासीच ठाउके |
परंतू येकदा जावे |आनंदवनभुवना ||
न सोसे दुख ते होते | दुख शोक परोपरी |
येकाकी येकदा जावे |आनंद्वनभुवना ||
कष्टलो कष्टलो देवा |पुरे संसार जाहाला |
देहत्यागासी येणे हो | आनंदवनभुवना ||
जन्म ते सोसिले मोठे | अपाय बहुतांपरी |
उपाये धाडिले देवे | आनंदवनभुवना ||
स्वप्नी जे देखिले रात्री | तें तें तैसेची होतसे |
हिंडता फिरता गेलो |आनंदवनभुवना ||
जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|
विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||
स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली |
लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||
विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला |
धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||
हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |
हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||
खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |
कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||
ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||
सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||
त्रैलोक्य चालिले तेथे | देव गंधर्व मानवी |ऋशी मुनी महायोगी |आनंदवनभुवनी ||
आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||
त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||
सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||
देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||
दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||
मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||
राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||
आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छेबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||
वीजई दिस जो आहे | ते दिसी सर्व उठती |अनर्थ मांडला मोठा |आनंदवनभुवनी ||
देवची तुष्टला होता | त्याचे भक्तीस भुलला |
मागुता क्षोभला दुखे | आनंदवनभुवनी ||
कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |
कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||
बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |
अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी ||
पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |
कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||
त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |
कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||
भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |
लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||
येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |
संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||
बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |
मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी ||
बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |
ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||
गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |
निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||
उदंड जाहाले पाणी | स्नान संध्या करावया |
जप तप अनुष्ठाने |आनंदवनभुवनी ||
नाना तपे पुरश्चरणे |नाना धर्म परोपरी |
गाजली भक्ती हे मोठी | आनंदवन भुवनी ||
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |
चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||
बंडपाषांड उडाले |शुध आध्यात्म वाढले |
राम कर्ता राम भोक्ता | आनंदवनभुवनी ||
देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |
पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी ||
रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली |
मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |
नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी ||