Friday, September 28, 2012

संसार माझा सुखाचा???

जीवन आणि संसाराचा  विरह हा एक भाग असतो 
म्हणूनच मनुष्य तेव्हां  आत्म परीक्षण करतो ।
संसारात होते वाटले  माणूस 'स्व' विसरून जातो 
अनुभवास मात्र येते 'स्व' तसाच कायम असतो ।
मी मला कसा,तसेच   दुसऱ्याला कसा वाटतो 
ह्याचे ज्ञान प्राप्त होऊन  'मी' फार तोकडा पडतो ।
जर काहीं विसरत असेल  तर तो दुसऱ्यास विसरतो 
त्याच्याकडे फक्त तो   एक छाया म्हणून बघतो ।
प्रीति,प्रेम,साथी हा   फक्त एक आभास ठरतो 
भावनांनाही त्यांत अखेर   कुठे ही ना वाव उरतो ।
जीवनांत अशा विचाराला  कधींच कुठं थारा नसतो ।
पण 'मी-माझं' म्हण्णार्याला  तो विचार कधीं ना शिवतो 
जीवनांत माणूस एकटा आहे  तो एकटाच रहात असतो ।
हेंच एक सत्य आहे   बाकी सर्व आभासच असतो ।
त्यांच आभासांत राहून   मनुष्य जीवन जगत असतो 
संसार माझा सुखाचा  असेच भासवत  असतो । 
म्हणूनच विरहांत जेव्हां   आत्म परीक्षण मी करतो 
प्रीति -संसारावरील सारा  विश्वासच उडून जातो ।। 

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...